शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जातीयवादी सरकार हद्दपार करा: रमेश बागवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:14 IST

हातकणंगले / आळते : नोटाबंदी, प्लास्टिक बंदी, जीएसटी अशा जाचक अटी लावून देशातील सर्वसामान्य जनतेला भाजप सरकारने हैराण केले आहे. गो-हत्याच्या नावाखाली जातीय तणाव निर्माण करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम गेल्या चार वर्षांत या सरकारने केली आहे. अशाप्रकारांमुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. अशा या जातीयवादी सरकारला देशातून ...

हातकणंगले / आळते : नोटाबंदी, प्लास्टिक बंदी, जीएसटी अशा जाचक अटी लावून देशातील सर्वसामान्य जनतेला भाजप सरकारने हैराण केले आहे. गो-हत्याच्या नावाखाली जातीय तणाव निर्माण करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम गेल्या चार वर्षांत या सरकारने केली आहे. अशाप्रकारांमुळे देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे. अशा या जातीयवादी सरकारला देशातून हद्दपार करा, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले.हातकणंगले येथे आयोजित केलेल्या राष्टÑीय कॉँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बागवे बोलत होते.ते म्हणाले, मोदी सरकारने देशातील तरुणांना व शेतकऱ्यांना खोटी, मोठमोठी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल केली. शेतकºयांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शेतकºयांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम या सरकारने केले. सामान्य माणसांचे भले करण्यापेक्षा उद्योगपतींना आश्रय देऊन देशाची लूट करण्याचे काम गेल्या चार वर्षांमध्ये हे सरकार करीत आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था धाब्यावर बसवून संविधान बदलण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे, हे सरकार सर्वच पातळ््यांवर अपयशी ठर आहे असे रमेश बागवे यांनी सांगितले.यावेळी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये कॉँग्रेसची राजकीय स्थिती आता भक्कम होत असून गटतट विसून एकदिलाने काम केल्यास जिल्ह्यातून काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार येतील.यावेळी राज्याच्या सरचिटणीस अ‍ॅड. मनीषा रोटे, बाजीराव सातपुते, भगवान जाधव, राजूबाबा आवळे, बादशहा मुजावर, संदीप कारंडे, अरुण जानवेकर, डॉ. सनत खोत यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास अमर पाटील, उत्तम पाटील, बाळगोंडा पाटील, शकील अत्तार, शशिकांत खवरे, राजू कचरे, विद्याताई चव्हाण, मनीषा पांडव, रमेश पाटोळे, युवराज पाटील, भैरू पवार, सुरेश नाईक, राजू भोसले, एस. के. माळी, पोपट इंगवले, दौलत पाटील, बबन पाटील, बाळासाहेब खाडे, संजय आवळे यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.