शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

विभागात कृषिपंपांची ७४७ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:13 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वीज बिले भरण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने कृषिपंपांच्या थकबाकीचा आकडा वाढत ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वीज बिले भरण्यास शेतकऱ्यांनी हात आखडता घेतल्याने कृषिपंपांच्या थकबाकीचा आकडा वाढत चालला आहे. सद्य:स्थितीत राज्यात २५ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यात कोल्हापूर विभागाचा वाटा ७४७ कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरात या थकबाकीत १२५ कोटी रुपयांची भर पडली आहे. कोल्हापूर, सांगलीसारख्या सधन जिल्ह्यांनी बिले भरण्यास टाळाटाळ केल्याने ‘महावितरण’च्या कारभाराचा डोलारा सांभाळायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे.सध्या पाणी व कोळशाच्या अपुºया पुरवठ्यामुळे वीजनिर्मिती घटल्याने राज्यात २५00 मेगावॅटचा तुटवडा आहे. परिणामी राज्यभरात भारनियमन सुरू असून शेतीपंपासाठीच्या पुरवठ्यातही दोन तासांनी कपात केली आहे. शेतीपंपाची थकबाकी वसूल होत नसल्यानेही त्यांच्या पुरवठ्यात कपात केली जात आहे. आॅगस्टअखेर कोल्हापूर विभागात ६२३ कोटींची थकबाकी होती. आतापर्यंत ती ७४७ कोटींवर गेली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यांची १६४, तर सांगलीची ५८२ कोटी इतकी थकबाकी झाली आहे.इतर जिल्ह्यांपेक्षा ही थकबाकी कमी असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. सोलापूर, नगर, लातूर, नाशिक, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांत प्रत्येकी हजार ते १५०० कोटींच्या वर थकबाकी असून वसुली होत नसल्याने त्याचा सेवेस फटका बसत आहे. कृषी संजीवनी योजनेसारखी सवलत पुन्हा लागू होईल, या अपेक्षेने बिले भरण्याकडे कानाडोळा होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वसुलीला ब्रेक‘महावितरण’ने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली, पण ही कनेक्शन तोडू नयेत, असे आदेश राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी काढले आहेत. ट्रान्स्फॉर्मर जळाला तर २५ हजारांच्या आत थकबाकी असणाºयांना तीन हजार, तर त्यावरील थकबाकी असणाºयांकडून पाच हजार रुपये भरून ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त करून वीजजोडणी पूर्ववत करण्याचेही आदेशात म्हटले आहे. यानंतर वसुली थांबली असून, विभागात एप्रिलपासून केवळ नऊ कोटी रुपयेच वसूल झाले आहेत.जिल्हा कृषिपंप थकबाकीकोल्हापूर १ लाख ४३ हजार २६१ १६४ कोटीसांगली २ लाख २५ हजार ८६४ ५८२ कोटी