शहरं
Join us  
Trending Stories
1
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
2
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
3
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
4
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
5
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
6
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
7
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
8
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
9
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
10
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
11
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
12
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
13
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
14
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
15
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
16
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
17
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
18
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
19
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
20
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 

महापालिकेत विभागीय चौकशीची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:20 IST

कोल्हापूर : महापालिकेत तुम्ही कितीही घोटाळे केलेत तरी काहीही कारवाई होत नाही, अशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता बनली आहे. त्यात ...

कोल्हापूर : महापालिकेत तुम्ही कितीही घोटाळे केलेत तरी काहीही कारवाई होत नाही, अशी अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता बनली आहे. त्यात आता विभागीय चौकशीचीही भीती राहिलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास पंचवीसहून अधिक कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी प्रलंबित आहे. ती केव्हा पूर्ण होणार, असा संतप्त सवाल चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले कर्मचारी विचारत आहेत.

महानगरपालिकेत गेल्या २० वर्षांत अनेक प्रकारचे घोटाळे झाले; परंतु त्यांच्यावर व्यक्तिपरत्वे पांघरूण घालण्याचा प्रयत्न झाला. केएमटी यंत्रशाळेकडील डिझेल घोटाळा आणि अलीकडेच घडलेला घरफाळा घोटाळा या प्रकरणांतच काय ती जबाबदार कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिक्षा झाली. पण त्यानंतर घडलेल्या प्रकरणांवर मात्र पांघरूण घालण्याचे काम होत आहे. गेल्या २० वर्षांत २५ कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तन, गैरव्यवहार, गैरहजर, डी. पी.तील फेरफार अशा प्रकरणांवर तत्कालीन आयुक्तांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले.

डॉ. अभिजित चौधरी आयुक्त असताना त्यांनी या प्रलंबित असलेल्या विभागीय चौकशा लवकर व्हाव्यात म्हणून सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असलेले आनंदराव सूर्यवंशी व किरण गौतम यांची नेमणूक केली. या गोष्टीलाही आता अडीच वर्षांचा काळ उलटून गेला आहे. तरीही या चौकशांना काही गती मिळाली नाही. गेल्या वर्षभरात तर कोविडच्या साथीमुळे हे काम बंदच आहे.

एखाद्या प्रकरणात कर्मचारी अथवा अधिकारी सापडला तर त्याची विभागीय चौकशी लावून त्याच्यावर कारवाईची खातेअंतर्गत प्रक्रिया सुरू होते; पण अशा चौकशांना ‘खो’ घालण्याचा प्रयत्न महापालिकेतूनच सुरू होतो. महापालिकेत ज्याचे राजकीय वजन जास्त, त्याची तर चौकशी गुंडाळूनच ठेवली जाते. परंतु ज्याचा वशिला नाही अशा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना मात्र पिसत बसावे लागते. त्यांना प्रमोशन मिळत नाही. जर एखादा कर्मचारी निवृत्त झाला तर त्याला ग्रॅच्युइटीची रक्कम तसेच रजेचा पगार दिला जात नाही. त्यामुळेच चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आणि सेवानिवृत्त झालेले कर्मचारी चौकशी कधी पूर्ण करणार, असा सवाल विचारीत आहेत.

- कायदा काय सांगतो?

- एखाद्या कर्मचाऱ्याकडून कसूर झाल्यास ४५ दिवसांत दोषारोपपत्र द्यायचे आहे.

- जर विभागीय चौकशीचे आदेश झाले तर तीन महिन्यांत ती पूर्ण करावी.

- काही कारणांनी तीन महिन्यांत चौकशी पूर्ण झाली नाही तर तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाते.

- विभागीय चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याने शिक्षेची शिफारस आयुक्तांकडे करायची असते.