शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जाग्यावर बसून डेंग्यूचा सर्व्हे

By admin | Updated: November 7, 2014 23:50 IST

दिलीप टिपुगडे : करवीर पंचायत समिती सभा

कसबा बावडा : शिक्षक संघटनेचा दबाव टाकत काही शिक्षकांनीच प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे केले, असा आरोप तानाजी आंग्रे यांनी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत करत शिक्षकांना नोकरीच्या ठिकाणी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती पूनम जाधव होत्या. तसेच करवीर तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. याला सर्वस्वी शिक्षकच जबाबदार आहेत असा थेट आरोप तानाजी आंग्रे, सरदार मिसाळ आणि जयसिंग काशीद यांनी केला. तालुक्यातील हे चित्र बदलायचे असेल, तर शिक्षकांना ते ज्या शाळेत आहेत तिथेच राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली. आंग्रे यांच्या प्रश्नावर दिलीप टिपुगडे यांनी आक्षेप घेत शिक्षकांना अशी सक्ती करण्यापेक्षा शाळेची गुणवत्ता कशी वाढेल याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे, असे सुचविले. तसेच सदस्यांनी एखादी शाळा दत्तक घ्यावी व त्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना केली. यावर शिक्षण अधिकारी रवींद्र चौगले व गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी पंधरा दिवसांत याबाबत तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले. सध्या सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण आढळत असताना तालुक्यात या आजाराबाबत काय उपाययोजना केली, असा सवाल दत्तात्रय टिपुगडे यांनी करत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी जाग्यावर बसून सर्व्हे करतात, असा आरोप केला. यावर डॉ. नलवडे यांनी असा कोणताही प्रकार होत नसल्याचा खुलासा केला. पंचायतमधील ४० वर्षांवरील कर्मचाऱ्यांनी तसेच सदस्यांनी आरोग्य तपासणी शिबिर लवकरच घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पहिलीपासून विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज सुरू करा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली. जीवन प्राधिकरणावरून ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या घरगुती पाणीपुरवठा नळाना सक्तीने मीटर बसवा, अशी मागणी दिलीप टिपुगडे यांनी केली. बांधकाम विभागाच्या ९८ कामांना मंजुरी मिळाली असून, ८४ कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे बांधकाम विभागाचे जे. डी. यादव यांनी सांगितले. शिये ते रामानंदनगर रस्ता उखडला असल्याचे जयसिंग काशीद यांनी सांगितले. कृषी विभागाकडून योजनांची माहिती व्यवस्थित दिली जात नाही, असा आरोपही यावेळी सदस्यांकडून करण्यात आला. ३००० रुपये दराचा ठराव या सभेत उसाला किमान तीन हजार रुपये दर मिळावा असा ठराव एकमताने आणि टाळ्यांच्या गजरात करण्यात आला. लवकरच या ठरावाची प्रत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. बांधकाम, शिक्षणचे कर्मचारी धारेवर या सभेत बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, कृषी, आदी विभागांवर चर्चा झाली असली तरी सर्वाधिक चर्चा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागावर झाली. या दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांना यावेळी चांगलेच धारेवर धरण्यात आले.