शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

जाग्यावर बसून डेंग्यूचा सर्व्हे

By admin | Updated: November 7, 2014 23:50 IST

दिलीप टिपुगडे : करवीर पंचायत समिती सभा

कसबा बावडा : शिक्षक संघटनेचा दबाव टाकत काही शिक्षकांनीच प्राथमिक शिक्षणाचे वाटोळे केले, असा आरोप तानाजी आंग्रे यांनी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत करत शिक्षकांना नोकरीच्या ठिकाणी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती पूनम जाधव होत्या. तसेच करवीर तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. याला सर्वस्वी शिक्षकच जबाबदार आहेत असा थेट आरोप तानाजी आंग्रे, सरदार मिसाळ आणि जयसिंग काशीद यांनी केला. तालुक्यातील हे चित्र बदलायचे असेल, तर शिक्षकांना ते ज्या शाळेत आहेत तिथेच राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी केली. आंग्रे यांच्या प्रश्नावर दिलीप टिपुगडे यांनी आक्षेप घेत शिक्षकांना अशी सक्ती करण्यापेक्षा शाळेची गुणवत्ता कशी वाढेल याकडे शिक्षकांनी लक्ष द्यावे, असे सुचविले. तसेच सदस्यांनी एखादी शाळा दत्तक घ्यावी व त्यावर लक्ष ठेवावे, अशी सूचना केली. यावर शिक्षण अधिकारी रवींद्र चौगले व गटविकास अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी पंधरा दिवसांत याबाबत तपासणी केली जाईल, असे आश्वासन दिले. सध्या सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण आढळत असताना तालुक्यात या आजाराबाबत काय उपाययोजना केली, असा सवाल दत्तात्रय टिपुगडे यांनी करत प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी जाग्यावर बसून सर्व्हे करतात, असा आरोप केला. यावर डॉ. नलवडे यांनी असा कोणताही प्रकार होत नसल्याचा खुलासा केला. पंचायतमधील ४० वर्षांवरील कर्मचाऱ्यांनी तसेच सदस्यांनी आरोग्य तपासणी शिबिर लवकरच घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पहिलीपासून विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज सुरू करा, अशी मागणी स्मिता गवळी यांनी केली. जीवन प्राधिकरणावरून ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या घरगुती पाणीपुरवठा नळाना सक्तीने मीटर बसवा, अशी मागणी दिलीप टिपुगडे यांनी केली. बांधकाम विभागाच्या ९८ कामांना मंजुरी मिळाली असून, ८४ कामांना लवकरच सुरुवात होणार असल्याचे बांधकाम विभागाचे जे. डी. यादव यांनी सांगितले. शिये ते रामानंदनगर रस्ता उखडला असल्याचे जयसिंग काशीद यांनी सांगितले. कृषी विभागाकडून योजनांची माहिती व्यवस्थित दिली जात नाही, असा आरोपही यावेळी सदस्यांकडून करण्यात आला. ३००० रुपये दराचा ठराव या सभेत उसाला किमान तीन हजार रुपये दर मिळावा असा ठराव एकमताने आणि टाळ्यांच्या गजरात करण्यात आला. लवकरच या ठरावाची प्रत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. बांधकाम, शिक्षणचे कर्मचारी धारेवर या सभेत बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन, कृषी, आदी विभागांवर चर्चा झाली असली तरी सर्वाधिक चर्चा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागावर झाली. या दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांना यावेळी चांगलेच धारेवर धरण्यात आले.