शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

लोकशाही भांडवलदारांचे बाहुल

By admin | Updated: December 9, 2014 00:31 IST

अवि पानसरे व्याख्यानमाला

कोल्हापूर : जागतिकीकरणानंतर भांडवलदारांचे राजकीय व्यवस्थेवरील नियंत्रण वाढले आहे़ त्यामुळे लोकशाही भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनली असून राज्यसंस्थेची धोरणे ही गोरगरीब जनतेपेक्षा भांडवलदारांना पूरक ठरत आहेत़ परिणामी त्यांचा राजकारणातील हस्तक्षेप वाढला आहे़ या पार्श्वभूमीवर लोकशाही प्रबळ करण्यासाठी केवळ निवडणूक म्हणजे लोकशाही हा समज खोडून घटनेतील तत्त्वाप्रमाणे लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ़ अरुणा पेंडसे यांनी केले़ श्रमिक प्रतिष्ठानतर्फे येथील शाहू स्मारक भवनात आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याखानमालेत ‘भांडवल व भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा़ आशा कुकडे होत्या़ डॉ़ पेंडसे म्हणाल्या, राजकारणी आश्वासने पाळत नाहीत, कारण त्यांचे धोरण भांडवलधार्जिणे असते़ स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही स्थिती कायम आहे. पण जागतिकीकरणानंतर भांडवलदारांचा राजकीय व्यवस्थेवर दबाव वाढला आहे़ त्यांना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणापेक्षा आपले हितच महत्त्वाचे वाटत असल्यामुळे त्यांना लोकशाहीशी काही देणे-घेणे नाही़ त्यांना कोणतीही शाही चालते़़़ भले मग ती हुकुमशाहीही असो!़ या प्रक्रियेत मध्यमवर्गालाही कॅप्चर करण्यात भांडवलदार यशस्वी झाले आहेत़ डॉ़ पेंडसे म्हणाल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, जमीन संपादन कायद्याला भांडवलदारांनी विरोध केला़ केंद्रातील सरकार तर भांडवलदारांचे सरकार असल्याप्रमाणे आपली धोरणे राबवित आहे़ गृहनिर्माण, भूसंपादन करताना भांडवलदारांना अनुकुल असेच धोरण राबविले जात असून आदिवासी, गोरगरीब व कामगारांचे हक्क डावलले आहेत़ खनिज उत्खननासाठी तिथल्या आदिवासींना स्थलांतरण करण्यास भाग पाडले जात असून लोकशाहीच्या आडून लोकशाहीच बदलण्याचे हे कारस्थान आहे़ लोकांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया रोखण्यासाठी उत्पादनांचे विकेंद्रीकरण करून कामगारांना संघटन करण्यापासून दूर ठेवले जात आहे़ या बाबी डोळसपणे तपासल्या पाहिजेत, असे पेंडसे यांनी सांगितले. सध्या लोकशाही पैशांवर चालत असल्याची खंत व्यक्त करुन प्रा़ कुकडे म्हणाल्या, अदानींनी भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड पैसा पुरविला़ आता मोदी त्यांचे ऋण फेडत आहेत़ पंतप्रधान मोदी साध्वीच्या ‘अपशब्दा’चे समर्थन करीत आहेत. घटनेतील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व समतेच्या तत्त्वांच्या प्रचारासाठी लोकचळवळ उभारणे आवश्यक आहे़