शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

लोकशाही भांडवलदारांचे बाहुल

By admin | Updated: December 9, 2014 00:31 IST

अवि पानसरे व्याख्यानमाला

कोल्हापूर : जागतिकीकरणानंतर भांडवलदारांचे राजकीय व्यवस्थेवरील नियंत्रण वाढले आहे़ त्यामुळे लोकशाही भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनली असून राज्यसंस्थेची धोरणे ही गोरगरीब जनतेपेक्षा भांडवलदारांना पूरक ठरत आहेत़ परिणामी त्यांचा राजकारणातील हस्तक्षेप वाढला आहे़ या पार्श्वभूमीवर लोकशाही प्रबळ करण्यासाठी केवळ निवडणूक म्हणजे लोकशाही हा समज खोडून घटनेतील तत्त्वाप्रमाणे लोकशाहीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ़ अरुणा पेंडसे यांनी केले़ श्रमिक प्रतिष्ठानतर्फे येथील शाहू स्मारक भवनात आयोजित कॉम्रेड अवि पानसरे व्याखानमालेत ‘भांडवल व भारतीय लोकशाहीचे भवितव्य’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रा़ आशा कुकडे होत्या़ डॉ़ पेंडसे म्हणाल्या, राजकारणी आश्वासने पाळत नाहीत, कारण त्यांचे धोरण भांडवलधार्जिणे असते़ स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही स्थिती कायम आहे. पण जागतिकीकरणानंतर भांडवलदारांचा राजकीय व्यवस्थेवर दबाव वाढला आहे़ त्यांना सर्वसामान्य जनतेच्या कल्याणापेक्षा आपले हितच महत्त्वाचे वाटत असल्यामुळे त्यांना लोकशाहीशी काही देणे-घेणे नाही़ त्यांना कोणतीही शाही चालते़़़ भले मग ती हुकुमशाहीही असो!़ या प्रक्रियेत मध्यमवर्गालाही कॅप्चर करण्यात भांडवलदार यशस्वी झाले आहेत़ डॉ़ पेंडसे म्हणाल्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी, जमीन संपादन कायद्याला भांडवलदारांनी विरोध केला़ केंद्रातील सरकार तर भांडवलदारांचे सरकार असल्याप्रमाणे आपली धोरणे राबवित आहे़ गृहनिर्माण, भूसंपादन करताना भांडवलदारांना अनुकुल असेच धोरण राबविले जात असून आदिवासी, गोरगरीब व कामगारांचे हक्क डावलले आहेत़ खनिज उत्खननासाठी तिथल्या आदिवासींना स्थलांतरण करण्यास भाग पाडले जात असून लोकशाहीच्या आडून लोकशाहीच बदलण्याचे हे कारस्थान आहे़ लोकांच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया रोखण्यासाठी उत्पादनांचे विकेंद्रीकरण करून कामगारांना संघटन करण्यापासून दूर ठेवले जात आहे़ या बाबी डोळसपणे तपासल्या पाहिजेत, असे पेंडसे यांनी सांगितले. सध्या लोकशाही पैशांवर चालत असल्याची खंत व्यक्त करुन प्रा़ कुकडे म्हणाल्या, अदानींनी भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड पैसा पुरविला़ आता मोदी त्यांचे ऋण फेडत आहेत़ पंतप्रधान मोदी साध्वीच्या ‘अपशब्दा’चे समर्थन करीत आहेत. घटनेतील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व समतेच्या तत्त्वांच्या प्रचारासाठी लोकचळवळ उभारणे आवश्यक आहे़