शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

वडगावात कोविड सेंटर पालिकेने सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST

सुहास जाधव लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगाव परिसरात रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. ...

सुहास जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : वडगाव परिसरात रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वडगावला कोविड सेंटर होण्यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा करायला हवा. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून खासगी कोविड सेंटर मात्र मोठ्या प्रमाणात सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत संवेदनशील दाखवत आमदार, खासदारांनी पाठपुरावा होण्यासाठी प्रयत्न केले. लोकसहभागातून व्यापारी असे असोसिएशन, विजयसिंह यादव प्रतिष्ठान, युवक क्रांती आघाडी अशा अनेकांनी मदतीचा हात दिला.

पालकमंत्री सतेज पाटील याच्या प्रयत्नाने मदत मिळवून दिली.या प्रश्नी तत्कालीन मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी संवेदनशीलता दाखवत पाठपुरावा केला होता. त्यामुळे हे कोविड सेंटर प्रत्यक्ष साकारले होते.

सध्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांवर लाखाहून अधिक खर्च झाला होता. मात्र, पैसे जावू दे पण जीवनदान मिळाले, अशी भावना झाली होती.

दुसऱ्या लाटेत कोविड रुग्णालये सुरू आहेत. भीतीपोटी साधी लक्षणे असणारे ही रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे जागा नाही रुग्णालय हाऊसफुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सामान्य नागरिक व सेवाक्षेत्रातील अनेक जणांचा कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे खर्चाचे आकडे ऐकून हतबल झाले आहेत.

यावेळी आणखी पाच कोविड सेंटर सुरू झालेली आहेत. त्यात आणखी चारची भर पडणार आहे पण राज्यात लोकसहभागातून झाकारलेले वडगाव पालिकेचे कोविड सेंटर म्हणून ओळखले जात होते.

येथे मोफत उपचारांबरोबरच जेवण, नाष्टाची सोयही होती. त्यामुळे सामान्यांना आधार ठरलेले हे रुग्णालय होते.

पूर्वी पालिकेने दुरुस्ती केलेल्या धन्वंतरी रुग्णालयास पालिकेने कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हक्कांची जागा पालिकेने गमावली आहे तर आता जनरेट्यामुळे नवीन जागा शोधण्यासाठी चाचपणी सुरू आहे. मंगल कार्यालय किंवा डाॅ. प्रवीण हेंद्रे यांचे सध्या बंद असलेले रुग्णालय हे पर्याय पालिकेस खुले आहेत. मात्र, ही सर्व प्रक्रिया पाहता महिन्याहून अधिक कालावधी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर झपाट्याने कोरोनाची संख्या वाढत असताना सामान्यांना आधार देणारे रुग्णालय आवश्यक आहे. हे सुरू होण्यासाठी आवश्यक तेवढी गती लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिक धास्तावले आहेत.