शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

वडगावात कोविड सेंटर पालिकेने सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST

सुहास जाधव लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : वडगाव परिसरात रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. ...

सुहास जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : वडगाव परिसरात रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वडगावला कोविड सेंटर होण्यासाठी युद्धपातळीवर पाठपुरावा करायला हवा. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असून खासगी कोविड सेंटर मात्र मोठ्या प्रमाणात सुरू होण्याच्या हालचाली सुरू आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत संवेदनशील दाखवत आमदार, खासदारांनी पाठपुरावा होण्यासाठी प्रयत्न केले. लोकसहभागातून व्यापारी असे असोसिएशन, विजयसिंह यादव प्रतिष्ठान, युवक क्रांती आघाडी अशा अनेकांनी मदतीचा हात दिला.

पालकमंत्री सतेज पाटील याच्या प्रयत्नाने मदत मिळवून दिली.या प्रश्नी तत्कालीन मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी संवेदनशीलता दाखवत पाठपुरावा केला होता. त्यामुळे हे कोविड सेंटर प्रत्यक्ष साकारले होते.

सध्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांवर लाखाहून अधिक खर्च झाला होता. मात्र, पैसे जावू दे पण जीवनदान मिळाले, अशी भावना झाली होती.

दुसऱ्या लाटेत कोविड रुग्णालये सुरू आहेत. भीतीपोटी साधी लक्षणे असणारे ही रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे जागा नाही रुग्णालय हाऊसफुल्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सामान्य नागरिक व सेवाक्षेत्रातील अनेक जणांचा कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे खर्चाचे आकडे ऐकून हतबल झाले आहेत.

यावेळी आणखी पाच कोविड सेंटर सुरू झालेली आहेत. त्यात आणखी चारची भर पडणार आहे पण राज्यात लोकसहभागातून झाकारलेले वडगाव पालिकेचे कोविड सेंटर म्हणून ओळखले जात होते.

येथे मोफत उपचारांबरोबरच जेवण, नाष्टाची सोयही होती. त्यामुळे सामान्यांना आधार ठरलेले हे रुग्णालय होते.

पूर्वी पालिकेने दुरुस्ती केलेल्या धन्वंतरी रुग्णालयास पालिकेने कोविड सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे हक्कांची जागा पालिकेने गमावली आहे तर आता जनरेट्यामुळे नवीन जागा शोधण्यासाठी चाचपणी सुरू आहे. मंगल कार्यालय किंवा डाॅ. प्रवीण हेंद्रे यांचे सध्या बंद असलेले रुग्णालय हे पर्याय पालिकेस खुले आहेत. मात्र, ही सर्व प्रक्रिया पाहता महिन्याहून अधिक कालावधी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर झपाट्याने कोरोनाची संख्या वाढत असताना सामान्यांना आधार देणारे रुग्णालय आवश्यक आहे. हे सुरू होण्यासाठी आवश्यक तेवढी गती लोकप्रतिनिधींनी घेतलेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिक धास्तावले आहेत.