शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

कोल्हापुरातील करवीर भूमिअभिलेखमध्ये जमिनीपेक्षा पैसे मोजणी तेजीत

By भीमगोंड देसाई | Updated: February 7, 2024 13:32 IST

महसूल, पालकमंत्र्यांकडे तक्रार : ओळखपत्र नसल्याने दलाल, कर्मचारी कोण संभ्रम

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : करवीर भूमी उपअधीक्षक कार्यालयात वरकमाईचा दर तेजीत असल्याची तक्रार निखिल पाटील, शशिकांत जाधव, अमोल पाटील, गणेश कुलकर्णी यांनी महसूल, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, भूमिअभिलेख उपसंचालक यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, पत्रातील आरोप, तक्रारीसंबंधी ‘लोकमत’ने मंगळवारी कार्यालयात जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ओळखपत्र वापरत नसल्याने कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि दलाल कोण हे कळत नसल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांना मोजणी, पोटहिश्श्यासाठी प्रचंड हेलपाटे मारावे लागतात, नकाशासाठी मनमानी पद्धतीने पैशाची मागणी करणे, वेळेत नकाशे दिले जात नाहीत, मोजणी अहवाल वेळेत दिले जात नाही, शासकीय कागद असूनही मोजणी अर्जासाठी झेरॉक्स सेंटरकडे पाठवले जाते, असे चित्र दिसले.पत्रात म्हटले आहे, उपअधीक्षकांनी आपल्याच कार्यालयातील कर्मचारी एजंट म्हणून नेमले आहेत. पोट हिस्से, बिगरशेती, गुंठेवारी अशी पैसे मिळवून देणारी कामे हेच कर्मचारी करतात. काही कर्मचारी मोजणी करताना मोजणी अर्जदारास तुझी जमीन जाते, तू चुकीचे मार्किंग केले आहेस, तुझे बिनशेती क्षेत्र कमी बसत आहे, असे सांगून पैशाची मागणी करतात. नवीन मोजणी अर्ज देण्यासाठी आलेल्यास मुख्यालय सहायक मोजणीचे चलन देण्यास विलंब करतात.वेगवेगळ्या त्रुटी काढल्या जातात. लवकर काम करून देण्याचे कारण सांगून दहा हजारांची मागणी करतात. काही दलाल कार्यालयात फिरून नवीन मोजणी अर्जदारांना गाठतात. बाहेरच व्यवहार ठरवून स्वत: मोजणी करून देतात. बिगरशेती मोजणी, कजाप, पोटहिश्श्यासाठी दहा हजार ते दोन लाख रुपयांची मागणी केली जाते. मोजणीचे चलन मंजूर करताना आराखड्यातील सगळेच प्लॉटचे पैसे भरावे लागतील, असे सांगून पैसे उकळतात. कार्यालयातील दोन कर्मचारी प्रकरण ठरवून वसुलीची रक्कम निश्चित करतात. पैसे उकळणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना महत्त्वाच्या कामकाजाचे टेबल दिले आहे. सूर्यकांत आणि नितीन सुट्टीच्या दिवशी खासगी मोजणी करून शासनाचा महसूल बुडवत असल्याची तक्रार आहे.

कजापचा दर तीन हजारचलन काढताना प्रत्येक प्लॉटला आणि मोजणीस येणाऱ्यास प्रत्येकी १५०० रुपये, तपासणी करणाऱ्यास २ हजार, मुख्य दलाल कुमार कजाप करण्यास प्रत्येक प्लॉटला तीन हजार रुपये मागत असल्याचा आरोप पत्रात केला आहे.

पत्रातील आरोप तथ्यहीन आणि आकसापोटी केले आहेत. दबाव टाकण्यासाठी विघ्नसंतोषी लोकांनी पत्रातून आरोप केले आहेत. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची तक्रार ऐकून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. - किरण माने, उप अधीक्षक, भूमिअभिलेख, करवीर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर