शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

कुरुंदवाडमधील बेघरांना जागा द्या नगराध्यक्षांकडे मागणी : लालबावटा युनियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:51 IST

कुरुंदवाड : शहरातील बेघर कुटुंबांना राहण्यासाठी जागा मिळावी व त्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा; अन्यथा राज्य शेतमजूर लालबावटा युनियनच्यावतीने लाभार्थ्यांच्या कुटुंबासह पालिकेवर मोर्चा काढून बेमुदत कामकाज बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगराध्यक्ष जयराम पाटील यांना देण्यात आला.निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बेघरांना जागा मिळावी, यासाठी संघटनेच्या वतीने यापूर्वी आंदोलने केली होती. या ...

ठळक मुद्देलाभार्थ्यांच्या कुटुंबासह नगरपालिकेवर मोर्चा

कुरुंदवाड : शहरातील बेघर कुटुंबांना राहण्यासाठी जागा मिळावी व त्यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा; अन्यथा राज्य शेतमजूर लालबावटा युनियनच्यावतीने लाभार्थ्यांच्या कुटुंबासह पालिकेवर मोर्चा काढून बेमुदत कामकाज बंद करण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगराध्यक्ष जयराम पाटील यांना देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बेघरांना जागा मिळावी, यासाठी संघटनेच्या वतीने यापूर्वी आंदोलने केली होती. या आंदोलनाची दखल घेत पालिकेने सभागृहाचा ठराव करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे; मात्र त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींनी केला नसल्याने प्रस्ताव रखडला आहे. या प्रस्तावाचा पाठपुरावा करून बेघरांना जागा मिळवून द्यावे, अन्यथा लाभार्थ्यांच्या मुलांबाळांसह पालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, बांधकाम सभापती प्रा. सुनील चव्हाण उपस्थित होते. शिष्टमंडळाचे नेतृत्व लालबावटा शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसो कसबे यांनी केले. शिष्टमंडळात अरुण मांजरे, आक्काताई मोहिते, सविता कोथळे, सुषमा साबळे, महादेवी भंडारी, तबसुम शेख, जैथून बागवान, आदी सहभागी झाले होते.क्रीडांगणाची शिवसेनेकडून मागणीकुरुंदवाड : शहराला क्रीडा परंपरा आहे; मात्र, क्रीडांगणच नाही. त्यामुळे खेळाडूंच्या सोयीसाठी पालिकेने क्रीडांगण उभारावे, अशी मागणी शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांना दिले. नगराध्यक्ष पाटील यांनी त्यासाठी जागेचा शोध घेऊन क्रीडांगण उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेना शहराध्यक्ष राजू आवळे यांनी केले. निवेदनात कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर आहे. येथील खेळाडू प्रत्येक खेळात पारंगत असून, आपल्या कामगिरीची चमक सातासमुद्रापार केली आहे. खेळाडूंना खेळाच्या सरावासाठी पालिकेचे तबक उद्यान आहे. मात्र, या मैदानाला सहा महिने तळ्याचे स्वरूप आलेले असते. त्यामुळे विविध खेळांतील खेळाडूंना खेळाचा सराव करता येत नाही.पालिकेची विविध ठिकाणी आरक्षित जागा आहे. या जागांचा शोध घेऊन अद्ययावत क्रीडांगण करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, बांधकाम सभापती प्रा. सुनील चव्हाण उपस्थित होते.पाठपुरावा नाहीपालिकेने ठराव करून प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला आहे; मात्र त्याचा पाठपुरावा झाला नसल्याने प्रस्ताव रखडला आहे.