शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आषाढीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:43 IST

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रविवारच्या आठवडी बाजारावर झाला आहे. सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली होती. मात्र, आषाढ महिन्यामुळे दुकानामध्ये उपवासाच्या पदार्थांना मागणी जास्त होती, तर भाज्यांची आवकजास्त आल्याने दरांत घसरण झाली आहे.बाजारात भाजीपाल्यासह फळांच्या दरामध्ये उतरण झाली आहे. डाळिंब प्रतिकिलो ३० रुपये ...

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रविवारच्या आठवडी बाजारावर झाला आहे. सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली होती. मात्र, आषाढ महिन्यामुळे दुकानामध्ये उपवासाच्या पदार्थांना मागणी जास्त होती, तर भाज्यांची आवकजास्त आल्याने दरांत घसरण झाली आहे.बाजारात भाजीपाल्यासह फळांच्या दरामध्ये उतरण झाली आहे. डाळिंब प्रतिकिलो ३० रुपये होते. त्यांची आवक मोठ्या प्रमाणात आली आहे. ओली मिरची, ढबू मिरची, कारली, भेंडी, वरणा, दोडका, वाल, बिनीस, फ्लॉवर, पडवळ, दुधी भोपळा, शेवग्याची शेंग, कांदापात, मेथी, पोकळा, शेपू व पिकॅडोर यांमध्ये उतरण झाली आहे; पण वांग्याच्या दरामध्ये किंचित वाढ झाली आहे. वांगी २५ रुपये प्रतिकिलो होती. टोमॅटो दहा रुपये प्रतिकिलो, गवार ३० रुपये, आले ५० रुपये तर कोथिंबिरीची पेंढी पाच रुपये होती. याचबरोबर घेवडा निम्म्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात तो ५० रुपये होता, तो आता २५ रुपये झाला आहे. गाजरांचा दर स्थिर प्रतिकिलो २५ रुपये होता.दुसरीकडे, उपवासाची एक नंबरची वरी ८० रुपये प्रतिकिलो, सावाभगर ७२ रुपयांना तर शाबू ६० रुपये, ५६ रुपये; शेंगदाणे ६० ते ७० रुपयांच्या घरात होते. खजूर ११० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत, राजगिरा ८० रुपये असा दर होता. याला ग्राहकांकडून मागणी होती. याचबरोबर शेंगतेल १२५ रुपये, सरकी तेल ९० रुपये, तर तूरडाळ ७० रुपये, हरभरा डाळ ६० रुपये अशी होती. ड्रायफ्रुट व तांदळाचे दर जैसे थे होते. फळांमध्ये संत्री, मोसंबी, चिकू यांच्या दरांत घसरण; तर पेरू, पपईचे दर जैसे थे आहेत; पण सीताफळाच्या दरांत वाढ झाली आहे. ढिगाचा दर ४०० रुपये होता.मका कणसांचा दर झाला दीडपटपावसाळ्यात जिभेला चव देणाऱ्या मक्याच्या कणसांच्या दरात वाढ झाली आहे.गेल्या आठवड्यात शेकड्याचादर ४२५ रुपये होता, तो ७०० रुपयांच्या घरात गेला आहे.त्यामुळे कणसांच्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मात्र, ओल्या भुईमुगाच्या शेंगेच्या दहा किलोंच्या पोत्याचा दर ३८० रुपये झाला आहे. तो गेल्या आठवड्यात ४५० इतका होता.