शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आषाढीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 23:43 IST

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रविवारच्या आठवडी बाजारावर झाला आहे. सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली होती. मात्र, आषाढ महिन्यामुळे दुकानामध्ये उपवासाच्या पदार्थांना मागणी जास्त होती, तर भाज्यांची आवकजास्त आल्याने दरांत घसरण झाली आहे.बाजारात भाजीपाल्यासह फळांच्या दरामध्ये उतरण झाली आहे. डाळिंब प्रतिकिलो ३० रुपये ...

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम रविवारच्या आठवडी बाजारावर झाला आहे. सकाळपासून पावसाच्या रिपरिपीमुळे ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली होती. मात्र, आषाढ महिन्यामुळे दुकानामध्ये उपवासाच्या पदार्थांना मागणी जास्त होती, तर भाज्यांची आवकजास्त आल्याने दरांत घसरण झाली आहे.बाजारात भाजीपाल्यासह फळांच्या दरामध्ये उतरण झाली आहे. डाळिंब प्रतिकिलो ३० रुपये होते. त्यांची आवक मोठ्या प्रमाणात आली आहे. ओली मिरची, ढबू मिरची, कारली, भेंडी, वरणा, दोडका, वाल, बिनीस, फ्लॉवर, पडवळ, दुधी भोपळा, शेवग्याची शेंग, कांदापात, मेथी, पोकळा, शेपू व पिकॅडोर यांमध्ये उतरण झाली आहे; पण वांग्याच्या दरामध्ये किंचित वाढ झाली आहे. वांगी २५ रुपये प्रतिकिलो होती. टोमॅटो दहा रुपये प्रतिकिलो, गवार ३० रुपये, आले ५० रुपये तर कोथिंबिरीची पेंढी पाच रुपये होती. याचबरोबर घेवडा निम्म्यावर आला आहे. गेल्या आठवड्यात तो ५० रुपये होता, तो आता २५ रुपये झाला आहे. गाजरांचा दर स्थिर प्रतिकिलो २५ रुपये होता.दुसरीकडे, उपवासाची एक नंबरची वरी ८० रुपये प्रतिकिलो, सावाभगर ७२ रुपयांना तर शाबू ६० रुपये, ५६ रुपये; शेंगदाणे ६० ते ७० रुपयांच्या घरात होते. खजूर ११० रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत, राजगिरा ८० रुपये असा दर होता. याला ग्राहकांकडून मागणी होती. याचबरोबर शेंगतेल १२५ रुपये, सरकी तेल ९० रुपये, तर तूरडाळ ७० रुपये, हरभरा डाळ ६० रुपये अशी होती. ड्रायफ्रुट व तांदळाचे दर जैसे थे होते. फळांमध्ये संत्री, मोसंबी, चिकू यांच्या दरांत घसरण; तर पेरू, पपईचे दर जैसे थे आहेत; पण सीताफळाच्या दरांत वाढ झाली आहे. ढिगाचा दर ४०० रुपये होता.मका कणसांचा दर झाला दीडपटपावसाळ्यात जिभेला चव देणाऱ्या मक्याच्या कणसांच्या दरात वाढ झाली आहे.गेल्या आठवड्यात शेकड्याचादर ४२५ रुपये होता, तो ७०० रुपयांच्या घरात गेला आहे.त्यामुळे कणसांच्या ग्राहकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. मात्र, ओल्या भुईमुगाच्या शेंगेच्या दहा किलोंच्या पोत्याचा दर ३८० रुपये झाला आहे. तो गेल्या आठवड्यात ४५० इतका होता.