शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

पलूसमध्ये विहीर मंजुरीसाठी ५० हजार रुपयांची मागणी

By admin | Updated: May 23, 2015 00:29 IST

जिल्हा परिषद सभा : टक्केवारीमुळे ‘रोहयो’चा बोजवारा--लोकमतचा दणका

सांगली : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करून देण्यासाठी अधिकारी ५० हजार रूपयांची लाच घेत आहेत. पलूस तालुक्यात मंजूर तीनशे विहिरींपैकी ६० टक्के विहिरींना केवळ टक्केवारी घेऊनच अधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याचा गौप्यस्पोट जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी केला. आटपाडी तालुक्यातील विहिरी आणि शेततळ्यांमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप रणधीर नाईक यांनी करून अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा बुरखा सभागृहात फाडला. या सदस्यांच्या भूमिकेला अन्य सदस्यांनीही पाठिंबा दिला. रोजगार हमीतील घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.जि. प. सभागृहात अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षस्थेखाली सर्वसाधारण सभा झाली. यावेळी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा सदस्यांनी आरोप करून, जिल्ह्यातील सर्वच कामांच्या चौकशीची मागणी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी, पळसखेड येथे विहिरी आणि शेततळ्यामध्ये घोटाळा झाला आहे. याप्रकरणी शाखा अभियंत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगितले.हेमंत पाटील म्हणाले की, विहिरीसाठी अर्ज केल्यानंतर त्या प्रस्तावांना सहा महिने मंजुरी मिळत नाही. पण, अधिकाऱ्यांची ठरलेली रक्कम दिल्यानंतर लगेच मंजुरी मिळते. मंजुरीनंतर ३० हजार आणि अंतिम बिलाच्यावेळी २० हजार रूपये देण्याची तयारी दर्शविणाऱ्यांना तासात मंजुरी मिळत आहे. या पध्दतीने एका दिवसात ५० विहिरींना मंजुरी दिल्याची यादीच त्यांनी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. पलूस पंचायत समितीचे सभापती विजय कांबळे, सुरेश मोहिते यांनीही अधिकाऱ्यांच्या गैरकारभारावर नाराजी व्यक्त करून, किती प्रस्ताव आहेत याची कल्पनाही देत नसल्याची खंत व्यक्त केली. (प्रतिनिंधी)‘लोकमत’च्या वृत्ताची दखलवाटपाऐवजी शेती अवजारांचा केला साठा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. ६ मे रोजी वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी सभागृहात बातमीचे कात्रण दाखवून कृषी विभागाचा भोंगळ कारभार सुधारणार कधी?, असा अध्यक्षांना सवाल केला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे गैरहजर असल्यामुळे सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ते कोणत्याही सभेला उपस्थित राहत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय झाला. जि. प. अध्यक्षा होर्तीकर यांनी, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन दिले.