शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

शासकीय कार्यालयात रिक्त जागांमुळे कामाचा बोजवारा

By admin | Updated: May 10, 2017 00:19 IST

शाहूवाडी तालुका : विकासकामे राबविताना अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत, नागरिकांची गैरसोय

राजाराम कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्क --मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात बहुसंख्य शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदाची संख्या मोठी आहे. त्यामुळे विकासकामे राबविताना अधिकाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जागा भरण्यासाठी शासन यंत्रणा ढिम्म असून, लोकप्रतिनिधी या प्रश्नी आवाज उठविताना दिसत नाहीत. रिक्त जागांमुळे कामाचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यात बारा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यापैकी पशुवैद्यकीय अधिकाºयांची सहा पदे गेल्या सात वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी योग्य उपचाराअभावी पशुधन धोक्यात येत आहे. बांबवडे, भेडसगाव, आंबा, माण, मांजरे, करंजपेण, परळे निनाई, शित्तूर, वारूण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर मलकापुरात ग्रामीण रुग्णालय आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या सतरा जागांची आवश्यकता असताना त्यापैकी दोन कत्रांटी, तर पाच कायमस्वरूपी डॉक्टर आहेत. दहा जागा रिक्त आहेत. तरीदेखील आरोग्य विभागाचे काम चांगले आहे. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, तर डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २७४ प्राथमिक शाळा आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी गटशिक्षणधिकारी पद महत्त्वाचे आहे; मात्र हे पद गेली दोन वर्ष रिक्त आहे. विस्तार अधिकार यांची चार, तर केंद्रप्रमुखांची बारा, अध्यापकांची ६२ पदे रिक्त आहेत. शाहूवाडी तहसील कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. याचा परिणाम कामावर होत असून, नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. शाहूवाडी पोलीस ठाण्याचा कारभार फक्त ४५ पोलिसांवर अवलंबून आहे. तालुक्यात दोन लाखांच्या जवळपास लोकसंख्या असताना, पोलीस संख्या कमी आहे. पोलीसपाटलांची २३ पदे रिक्त आहेत. १ शाहूवाडी पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाकडे गेली दोन वर्षे बाल विकास अधिकारीपद रिक्त आहे, तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे आहेत. २ तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा आहेत. मलकापूर, बांबवडे, माण, आंबा, करंजफेण, भेडसगाव, सोंडोली, सरूड, नांदगाव अशा शाखा आहेत. या शाखांमध्येदेखील पूर्ण क्षमतेने कर्मचारीवर्ग नाही. काही शाखांत तीन कर्मचाºयांवर कारभार चालत आहे. ग्राहकांचा वेळेचा अपव्यय होत आहे. ३ १४२ महसुली गावे, २२५ वाड्यावस्त्यांसाठी केवळ २९ तलाठी कार्यरत आहेत. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची संख्या भरणे अत्यावश्यक आहे, तरच कामांचा उरक होईल व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.