शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

शासकीय कार्यालयात रिक्त जागांमुळे कामाचा बोजवारा

By admin | Updated: May 10, 2017 00:19 IST

शाहूवाडी तालुका : विकासकामे राबविताना अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत, नागरिकांची गैरसोय

राजाराम कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्क --मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात बहुसंख्य शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदाची संख्या मोठी आहे. त्यामुळे विकासकामे राबविताना अधिकाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जागा भरण्यासाठी शासन यंत्रणा ढिम्म असून, लोकप्रतिनिधी या प्रश्नी आवाज उठविताना दिसत नाहीत. रिक्त जागांमुळे कामाचा बोजवारा उडाला आहे. तालुक्यात बारा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यापैकी पशुवैद्यकीय अधिकाºयांची सहा पदे गेल्या सात वर्षांपासून रिक्त आहेत. परिणामी योग्य उपचाराअभावी पशुधन धोक्यात येत आहे. बांबवडे, भेडसगाव, आंबा, माण, मांजरे, करंजपेण, परळे निनाई, शित्तूर, वारूण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर मलकापुरात ग्रामीण रुग्णालय आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या सतरा जागांची आवश्यकता असताना त्यापैकी दोन कत्रांटी, तर पाच कायमस्वरूपी डॉक्टर आहेत. दहा जागा रिक्त आहेत. तरीदेखील आरोग्य विभागाचे काम चांगले आहे. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक, तर डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २७४ प्राथमिक शाळा आहेत. या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी गटशिक्षणधिकारी पद महत्त्वाचे आहे; मात्र हे पद गेली दोन वर्ष रिक्त आहे. विस्तार अधिकार यांची चार, तर केंद्रप्रमुखांची बारा, अध्यापकांची ६२ पदे रिक्त आहेत. शाहूवाडी तहसील कार्यालयात रिक्त पदांची संख्या मोठी आहे. याचा परिणाम कामावर होत असून, नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. शाहूवाडी पोलीस ठाण्याचा कारभार फक्त ४५ पोलिसांवर अवलंबून आहे. तालुक्यात दोन लाखांच्या जवळपास लोकसंख्या असताना, पोलीस संख्या कमी आहे. पोलीसपाटलांची २३ पदे रिक्त आहेत. १ शाहूवाडी पंचायत समितीच्या महिला बालकल्याण विभागाकडे गेली दोन वर्षे बाल विकास अधिकारीपद रिक्त आहे, तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे आहेत. २ तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा आहेत. मलकापूर, बांबवडे, माण, आंबा, करंजफेण, भेडसगाव, सोंडोली, सरूड, नांदगाव अशा शाखा आहेत. या शाखांमध्येदेखील पूर्ण क्षमतेने कर्मचारीवर्ग नाही. काही शाखांत तीन कर्मचाºयांवर कारभार चालत आहे. ग्राहकांचा वेळेचा अपव्यय होत आहे. ३ १४२ महसुली गावे, २२५ वाड्यावस्त्यांसाठी केवळ २९ तलाठी कार्यरत आहेत. तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची संख्या भरणे अत्यावश्यक आहे, तरच कामांचा उरक होईल व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.