शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

कळंबा टोल नाका हटवा : आयुक्त

By admin | Updated: October 27, 2014 00:15 IST

टोल समिती, ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर / कळंबा : कळंबा टोलनाका हा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याने तो तेथून हटवावा व महापालिकेच्या हद्दीमध्ये स्थलांतरित करावा, असा आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी काल (शनिवार) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले. आज, रविवारी या आदेशाचे पत्र महामंडळाला दिले. या आदेशाची प्रत दुपारी टोलविरोधी कृती समितीचे बाबा पार्टे, नगरसेवक मधुकर रामाणे यांनी टोलनाक्यावरील बंदोबस्तासाठी असलेले करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना दिली. तत्पूर्वी, सकाळी टोलवसुली सुरू झाल्याचे समजताच सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांनी या नाक्यावरील लोखंडी बॅरेकेटस हटवून संताप व्यक्त केला.कंपनीने सायंकाळी हा टोलनाका हटविण्यासाठी साहित्य आणले होते, पण, रात्री उशिरापर्यंत टोल नाका हटविण्यात आला नव्हता. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी, कळंबा साई मंदिर येथे टोलनाक्यासाठी पाहणी केली. पण हा टोलनाका उभा करण्यास स्थानिक नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. त्यामुळे या टोलनाक्याच्या प्रश्नावरून वातावरण तापले आहे. दरम्यान, शाहू टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांच्याकडे आयआरबी कंपनीच्या ओळखपत्राची विचारणा करत कर्मचारी व पोलिसांना टोल समितीच्या कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.यावेळी वातावरण तणावपूर्ण बनून काही काळ टोलवसुली बंद राहिली.कळंबा येथे आयआरबी कंपनीने कळंबे तर्फ ठाणे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत टोलनाका उभा केला आहे. मात्र, या टोलनाक्याची परवानगी घेतली नसून तो महापालिकेच्या हद्दीत स्थलांतरित करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यावरून काल (शनिवार) टोल समितीचे निमंत्रक निवास साळोखे व प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच विश्वास गुरव, समितीतील कार्यकर्ते, सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये एन. डी. पाटील यांनी उद्या, सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयआरबीने परवानगी घ्यावी व टोलवसुली बंद करावी अन्यथा, टोलनाका उखडू, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना फोनद्वारे दिला होता. आज, रविवारी सकाळी कळंबा टोलनाक्यावर वसुली सुरू झाली. हा प्रकार टोल समितीच्या कार्यकर्त्यांना समजले. त्यानुसार बाबा पार्टे, अजित सासने, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, रमेश मोरे आले. समितीचे कार्यकर्ते येताच पाहून नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी वसुली बंद करून तेथून धूम ठोकली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी लोखंडी बॅरेकेटस तेथून हटवून शेजारील मोकळ्या जागेत टाकल्या. यावेळी बाबा पार्टे यांनी, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे एमएसआरडीसीला पत्र तेथील बंदोबस्तासाठी असलेले पोलीस अधिकाऱ्यांना दिले.त्यानंतर दुपारी टोल समितीचे कार्यकर्ते शाहू टोलनाक्याकडे रवाना झाले. त्यांनी तेथील टोलनाक्याकडे आयआरबीच्या ओळखपत्राविषयी विचारणा केली. त्यावेळी कर्मचाऱ्यांकडे देसाई गु्रपची ओळखपत्रे असल्याचे निदर्शनास आले. यावेळी दिलीप देसाई व बाबा पार्टे यांनी, टोलनाक्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यावेळी तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कॉन्स्टेबल इकबाल महात यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी हा प्रकार वरिष्ठ पोलीसांना सांगा, असे म्हटल्यावर कृती समितीतील कार्यकर्त्यांचा पारा चढला. त्यावरून पोलीस व कार्यकर्त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर सर्वजण राजारामपुरी पोलीस ठाण्यास गेले. त्याठिकाणी पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांच्या कानावर हा प्रकार घातला. दिलीप देसाई यांनी, या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना ‘देसाई ग्रुप’ची ओळखपत्रे आहेत. त्यांना आयआरबीची अधिकृत ओळखपत्रे हवी. त्यांना आमचा आक्षेप नाही, असे सांगितले. त्यावर देशमुख यांनी, याबाबत आयआरबीकडून प्राथमिक माहिती घेतो, असे उत्तर दिले.साई मंदिराजवळील जागेबाबत स्थानिक नगरसेवकांचा विरोध शाहू टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना आयआरबीच्या ओळखपत्राची विचारणाकाही काळ टोल वसुली बंद