शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

आजीबाईचा बटवा अन्‌ कोरोनाला हटवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:28 IST

कोल्हापूर : पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेल्या आजीबाईंच्या बटव्यामध्ये कोरोनासारख्या जैविक शस्त्रापासून लढण्याचीदेखील ताकद आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या या संकटावर मात ...

कोल्हापूर : पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेल्या आजीबाईंच्या बटव्यामध्ये कोरोनासारख्या जैविक शस्त्रापासून लढण्याचीदेखील ताकद आहे. गेल्यावर्षी सुरू झालेल्या या संकटावर मात करण्यासाठी, या आजारापासून दूर राहण्यासाठी हळद, दूध, गरमपाणी आल्याचा रस, मिठाच्या गुळण्या, मसाल्यांचा वापर करून केलेले काढे, आयुर्वेदिक काढे यांचा घराघरांत वापर केला जात आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट सुरू झाले आणि त्यापासून वाचण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजनांवर विचारमंथन सुरू झाले. ही महामारी आधुनिक असली तरी त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांसाठी भारतीय संस्कृतीची जीवनशैली असलेली आयुर्वेद आणि पारंपरिक उपचार पद्धतीच कामाला आली. यामुळे जगभरात पुन्हा एकदा आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित झाले. अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये या रोगाशी लढण्याची प्रतिकारशक्ती अधिक दिसून आली याचे कारण म्हणजे घराघरांत वापरले जाणारे मसाले. प्रत्येक स्वयंपाकघरात अगदी रोज वापरल्या जाणाऱ्या या मसाल्यांनी व जेवणात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे कोरोनाविरोधातील लढाईत मोलाचे योगदान आहे. वेगवेगळ्या आजारांवर केल्या जाणाऱ्या घरगुती उपायांचा खजिना असतो तो आजीबाईच्या बटव्यात. कुटुंबातील वयोवृद्ध आजीकडून सुना, लेकी, नातींपर्यंत सगळ्यांकडे हा बटवा असतोच. आता कोरोना काळातही या आजीबाईच्या या बटव्याने कुटुंबाचे सुरक्षाकवच म्हणूनच जबाबदारी पेलली आहे.

--

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण - ९९ हजार १९८

कोरोनामुक्त झालेले रुग्ण - ८२ हजार २८३

सध्या उपचार घेत असलेले रूग्ण : १३ हजार ५२१

कोरोनामृत्यू : ३ हजार ३९१

--

आजीबाईच्या बटव्यात काय

गेल्यावर्षी कोरोना सुरू झाला तेव्हापासून मी रोज तुळस, हळद, आलं, लवंग, दालचिनी आणि गूळ घालून केलेला काढा पिते. घराच्या कुंडीत गवतीचहा लावला आहे. रोज चहात आलं आणि गवती चहा घालून पिते. जेवणात हळद आणि आल्याचा वापर वाढविला आहे.

सुमन कमते (राजारामपुरी)

-

आमच्या घरातील चारजण पॉझिटिव्ह आले. मी आणि लहान नातींना कोरोना होऊ नये म्हणून रोज गरम पाण्यात हळद आणि आल्याचा रस घालून पित होतो. रात्री झोपताना गरम दूध, हळद, गुळवेलचे चाटण करून खात होतो. रोज न चुकता वाफ आणि डॉक्टरांनी सांगितलेले आयुर्वेदिक काढे घेतले. य घरगुती उपायांमुळे आम्ही कोरोनाला दूर ठेवू शकलो.

अनुराधा काशीद (देवकर पाणंद)

--

माझं वय ८५. काही महिन्यांपूर्वी मला कोरोना झाला. एकीकडे डॉक्टरांचे उपचार सुरू होते, दुसरीकडे आम्ही घरगुती उपायदेखील सुरू ठेवले. मी रोज ताजं ताक, हिरव्या भाज्यांचे सूप पित होते. हळद दूध, आयुर्वेदिक काढे पित होते. भाज्या आणि फळांमुळे ताकद वाढली. कोरोनातून बरे झाल्यानंतरदेखील मी हा आहार कायम ठेवला आहे, त्यामुळे आता मी पूर्णत: तंदुरुस्त आहे.

उमा परुळेकर

---

कशाचा काय फायदा

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या : रोग प्रतिबंधक उपाय. मीठ हे जंतुनाशक असल्याने गरम पाणी आणि मिठाच्या गुळण्या केल्याने घश्यातील जंतू मरतात. घश्याला आराम मिळतो.

हळद : हळदीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे शरीरात जंतुरोधक म्हणून काम करते. त्यामुळे काढ्यात, गरम पाण्यात किंवा दुधात हळद घालून त्याचे सेवन केले जाते.

अद्रकचा रस : आल्याचा रसदेखील जंतुरोधक म्हणून काम करते. सर्दी, खोकला, घश्यात खवखव असेल तर पूर्वीपासून आपल्याकडे आल्याच्या रसात मध घालून पितात. वरील त्रासापासून आराम मिळतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

--

आपल्याकडे ऋतुमानातील बदलानुसार आहार केला जातो. जेवणात वापर केल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या मसाल्यांसह वनौषधींपासून बनविले जाणारे काढे कोरोनापासून बचाव करतात. आयुर्वेद आणि भारतीय जीवनशैलीचे महत्त्व यानिमित्ताने जगाला समजले आहे.

डॉ. सुनील पाटील (आयुर्वेदाचार्य)

--