शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

मनकर्णिकेवरील अतिक्रमण हटवा, नाहीतर शिवसेना स्टाईलने हटवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 21:51 IST

shivsena kolhapur- करवीर निवासिनी श्री अंबाबाईपुढे कोणी मोठे नाही, मंदिरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाच्या कामात आडकाठी करू नका, तुमचे १० फूट अतिक्रमण तातडीने हटवून घ्या, अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने ते हटवू, असा इशारा बुधवारी शिवसेनेने माउली लॉजच्या मालकांना दिला. यावेळी मालक रमेश आंबार्डेकर यांनी भागीदार यांच्याशी चर्चा करून सोमवारपर्यंत निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.

ठळक मुद्देमनकर्णिकेवरील अतिक्रमण हटवा, नाहीतर शिवसेना स्टाईलने हटवू माउली लॉजच्या मालकांना इशारा, सोमवारपर्यंत निर्णय घेण्याची ग्वाही

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईपुढे कोणी मोठे नाही, मंदिरातील मनकर्णिका कुंडाच्या उत्खननाच्या कामात आडकाठी करू नका, तुमचे १० फूट अतिक्रमण तातडीने हटवून घ्या, अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने ते हटवू, असा इशारा बुधवारी शिवसेनेने माउली लॉजच्या मालकांना दिला. यावेळी मालक रमेश आंबार्डेकर यांनी भागीदार यांच्याशी चर्चा करून सोमवारपर्यंत निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.अंबाबाई मंदिराच्या परिसरात सध्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडाच्या खुदाईचे काम सुरू आहे. वास्तुरचनेचा अलौकिक नमुना असलेल्या या कुंडाच्या १० फूट जागेवर माउली लॉजचे अतिक्रमण झाले आहे. हे अतिक्रमण हटवून कुंडाच्या उत्खननासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले होते. मात्र, मालकांनी या बाजूकडील खुदाईवर न्यायालयातून स्थगिती आणली आहे.

देवस्थान समितीने ही बाब पत्रकार परिषदेद्वारे प्रकाशात आणल्यानंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या वतीने बुधवारी मालकांना जाब विचारण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, अंबाबाईपेक्षा कोणी मोठे नाही, लॉजचे लायसन्स, कंप्लिशन सर्टिफिकेट, बांधकाम परवाना यापैकी कोणत्याही बाबी पूर्ण नाहीत, शिवाय अतिक्रमण झाल्याचे मोजणीत निदर्शनास आले आहे. तरी तातडीने कुंडाच्या खुदाईसाठी सहकार्य करत अतिक्रमण हटविण्यात यावे, अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने ते हटवू.यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुजित चव्हाण, शिवाजीराव जाधव, नरेश तुळशीकर, अभिजित भुकशेठ, स्मिता सावंत, दीपाली शिंदे, पुष्पा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.कन्नड फलक हटविले..माउली लॉजसह परिसरातील काही यात्री निवास, धर्मशाळांवर लावण्यात आलेले कन्नड भाषेतील फलक फाडून टाकण्यात आले. काहीना काळे फासण्यात आले. महाराष्ट्राची सीमा ओलांडल्यावर एकही फलक मराठीत दिसत नाही, कोल्हापुरात राहून येथे कन्नड फलक लावण्याचे कारणच काय, मराठी भाषेचा अभिमान आहे की नाही, अशी विचारणा करत हे फलक फाडून टाकण्यात आले. कोल्हापुरात ज्या दुकानांवर कन्नड फलक दिसतील, ते फाडले जातील, असेही संजय पवार यांनी बजावले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर