शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

शिवाजी विद्यापीठाकडून ठरावांच्या अंमलबजावणीला दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) विविध ठराव मंजूर केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) विविध ठराव मंजूर केले जातात. मात्र, या ठरावांच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याचे वास्तव आहे. दोन-तीन वर्षे कार्यवाही होत नाही. विद्यापीठाचे सर्वोच्च अधिकार मंडळ असलेल्या अधिस‌भेमध्ये ज्या दृष्टिकोनातून या ठरावांबाबत सदस्य निर्णय घेतात, त्याकडे विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये अधिसभेमध्ये विविध ३३ ठराव मंजूर केले आहेत. त्यातील १९ ठरावांवर अद्याप कार्यवाही सुरू असून १३ ठरावांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे. अद्याप कार्यवाही सुरू असलेल्या ठरावांमध्ये अधिकतर संख्या गेल्या दोन वर्षांतील आहे. अधिसभा झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये त्याचा इतिवृतांत तयार केला जातो. या सभेतील निर्णय, ठरावांवरील पुढील कार्यवाही विषयानुसार अभ्यास मंडळे, विद्या परिषद अथवा व्यवस्थापन परिषदेकडून केली जाते. मात्र, या अधिकार मंडळांकडे ठराव सादर होण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई आणि दुर्लक्ष होते. अनेकदा अपेक्षित वेळेत ठराव सादर होत नाहीत. त्यामुळे साहजिकच त्यावरील अंमलबजावणी लवकर होत नाही. त्याचा फटका विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि एकूणच विद्यापीठाला बसत असल्याचे वास्तव आहे. अधिसभेतील ठराव, निर्णयांच्या अंमलबजावणीची कार्यवाही प्रशासनाने वेळेत करणे आवश्यक आहे.

चौकट

या ठरावांवर अद्याप कार्यवाही सुरू

अधिसभेने मंजूर केलेल्या १९ ठरावांवर अद्याप कार्यवाही सुरू आहे. त्यात सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करणे, खेळाडूंना १५ ते १५ ग्रेस गुण देणे, क्रीडा अधिविभागांमधील रिक्त पदे भरणे, महाविद्यालयातील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविणे, नवीन विनाअनुदानित महाविद्यालयांना आर्थिक निधी देणे, पेटंट कायदेतज्ज्ञ नेमणे, विद्यापीठाच्या निधीतून नियमित कर्मचारी नियुक्त करणे, कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजना सुरू करणे, संलग्नित महाविद्यालयातील प्रशासकीय सेवकांसाठी विद्यापीठात कॉमन रूम उपलब्ध करणे, कोअर इन्फो सोल्युशनवर कारवाई करणे, विद्यापीठातील पदवी प्रदान सभागृह वापरण्याबाबतची नियमावली करणे, आदींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया

अधिसभा हे विद्यापीठाचे सर्वोच्च सभागृह आहे. त्यातील ठरावांची लवकर अंमलबजावणी होणे अपेक्षित असते. मात्र, काही ठराव होऊन दोन- तीन वर्षे झाली, तरी त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्याला प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत असल्याचे दिसते. प्रशासनाने अधिसभेला गृहित धरून काम करणे योग्य नाही. त्यामध्ये प्रशासनाने बदल करावा.

-डॉ. एस. डी. डेळेकर, सदस्य, अधिसभा