शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाकडून ठरावांच्या अंमलबजावणीला दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) विविध ठराव मंजूर केले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी या घटकांच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत (सिनेट) विविध ठराव मंजूर केले जातात. मात्र, या ठरावांच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याचे वास्तव आहे. दोन-तीन वर्षे कार्यवाही होत नाही. विद्यापीठाचे सर्वोच्च अधिकार मंडळ असलेल्या अधिस‌भेमध्ये ज्या दृष्टिकोनातून या ठरावांबाबत सदस्य निर्णय घेतात, त्याकडे विद्यापीठ प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

गेल्या तीन वर्षांमध्ये अधिसभेमध्ये विविध ३३ ठराव मंजूर केले आहेत. त्यातील १९ ठरावांवर अद्याप कार्यवाही सुरू असून १३ ठरावांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे. अद्याप कार्यवाही सुरू असलेल्या ठरावांमध्ये अधिकतर संख्या गेल्या दोन वर्षांतील आहे. अधिसभा झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये त्याचा इतिवृतांत तयार केला जातो. या सभेतील निर्णय, ठरावांवरील पुढील कार्यवाही विषयानुसार अभ्यास मंडळे, विद्या परिषद अथवा व्यवस्थापन परिषदेकडून केली जाते. मात्र, या अधिकार मंडळांकडे ठराव सादर होण्यास विद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई आणि दुर्लक्ष होते. अनेकदा अपेक्षित वेळेत ठराव सादर होत नाहीत. त्यामुळे साहजिकच त्यावरील अंमलबजावणी लवकर होत नाही. त्याचा फटका विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि एकूणच विद्यापीठाला बसत असल्याचे वास्तव आहे. अधिसभेतील ठराव, निर्णयांच्या अंमलबजावणीची कार्यवाही प्रशासनाने वेळेत करणे आवश्यक आहे.

चौकट

या ठरावांवर अद्याप कार्यवाही सुरू

अधिसभेने मंजूर केलेल्या १९ ठरावांवर अद्याप कार्यवाही सुरू आहे. त्यात सौरऊर्जा प्रकल्प निर्माण करणे, खेळाडूंना १५ ते १५ ग्रेस गुण देणे, क्रीडा अधिविभागांमधील रिक्त पदे भरणे, महाविद्यालयातील प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविणे, नवीन विनाअनुदानित महाविद्यालयांना आर्थिक निधी देणे, पेटंट कायदेतज्ज्ञ नेमणे, विद्यापीठाच्या निधीतून नियमित कर्मचारी नियुक्त करणे, कुलगुरू संशोधन प्रोत्साहन योजना सुरू करणे, संलग्नित महाविद्यालयातील प्रशासकीय सेवकांसाठी विद्यापीठात कॉमन रूम उपलब्ध करणे, कोअर इन्फो सोल्युशनवर कारवाई करणे, विद्यापीठातील पदवी प्रदान सभागृह वापरण्याबाबतची नियमावली करणे, आदींचा समावेश आहे.

प्रतिक्रिया

अधिसभा हे विद्यापीठाचे सर्वोच्च सभागृह आहे. त्यातील ठरावांची लवकर अंमलबजावणी होणे अपेक्षित असते. मात्र, काही ठराव होऊन दोन- तीन वर्षे झाली, तरी त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्याला प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत असल्याचे दिसते. प्रशासनाने अधिसभेला गृहित धरून काम करणे योग्य नाही. त्यामध्ये प्रशासनाने बदल करावा.

-डॉ. एस. डी. डेळेकर, सदस्य, अधिसभा