शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ठरवाठरवी अन् जमवाजमवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 23:40 IST

चंद्रकांत कित्तुरे आ मचं ठरलयं, आपलं ठरलंय, आम्हीबी ठरीवलंय, जनतेनं ठरवलंय... अशा वाक्यांची सध्या रेलचेल आहे. ज्याच्या त्याच्या तोंडात ...

चंद्रकांत कित्तुरेआ मचं ठरलयं, आपलं ठरलंय, आम्हीबी ठरीवलंय, जनतेनं ठरवलंय... अशा वाक्यांची सध्या रेलचेल आहे. ज्याच्या त्याच्या तोंडात सहज बोलता बोलता ठरवाठरवीचीच भाषा असल्याचे दिसते. या ठरवाठरवीला इतके महत्त्व का यावे? तर त्याला कारण ठरलं आहे ते लोकसभा निवडणुकीचं. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक आणि विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्षातून ठरवण्याची भाषा ज्याच्या त्याच्या तोंडी झाली. येवढेच काय, सतेज पाटील यांचा वाढदिवस तर ‘आम्ही ठरवलंय, आमचं ठरलंय’ हे सांगण्यासाठीच साजरा केला गेला की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती होती. कारण वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती, फ्लेक्स, होर्डिंग्ज, व्हॉट्सअ‍ॅपवरील संदेशही आम्ही तुमच्यासोबत आहोत, आमच ठरलंय हे सांगणारेच होते. अगदी जाणता राजा शरद पवारांनाही त्याची दखल घ्यावी लागली. ‘तुमचं ठरलंय तर आम्हीबी ध्यानात ठेवलंय’ हे त्यांचे बोल बरेच काही सांगून जातात. ते काय ध्यानात ठेवतात आणि कोणता डाव कसा टाकतात हे येणारा काळच सांगेल. कॉँगेस-राष्टÑवादी आघाडीनेही ‘आमचं ठरलंय’ला उत्तर देण्यासाठी ‘जनतेनं ठरवलंय’ असं घोषवाक्य तयार केलं आहे. त्याचा प्रचार आणि प्र्रसार मतदारांपर्यंत करण्यासाठी झाडून सारी यंत्रणा कामाला लागली आहे. कुणी काहीही ठरवलं असलं तरी मतदारांनी काय ठरवलंय याच उत्तर पाहण्यासाठी आपल्याला २३ मे पर्यंत थांबावं लागणार आहे हे मात्र खरं!कोणतीही निवडणूक म्हटले की जय, पराजय असतोच. या निवडणुकीसाठीची तयारी करण्यासाठी इच्छुक उमेदवार खूप आधीपासून कामाला लागलेले असतात. प्रथम आपली उमेदवारी कशी पक्की होईल हे पाहण्यासाठी नेत्यांची मनधरणी, कार्यकर्त्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणे, आपणच कसे योग्य उमेदवार आहोत, निवडून येऊ शकतो हे पटवून देण्याचा प्रयत्न ते करीत असतात. त्यात जो बाजी मारेल, त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते. त्यानंतर सुरू होते ती उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची, कार्यकर्त्यांची, पैशाची जमवाजमव. त्यानंतर सुरू होतो तो प्रचाराचा धुमधडाका. बरं निवडून येणंही सोपं नसतं. विरोधी उमेदवार प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे शोधून त्यावर प्रहार करायला टपलेलाच असतो. अशा निवडणुकांमध्ये एकमेकांचे उट्टे काढायलाही अनेकजण टपलेले असतात. कुणीतरी कधीतरी या नेतेमंडळींकडून दुखावलेला असतो. एखादे काम घेऊन गेले तर त्याची दखल घेतली गेलेली नसते. त्यावेळी काही बोलता येत नाही; पण निवडणुकांमध्ये त्याचा वचपा काढण्याची संधी छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना असते. ती साधण्याचा प्रयत्न ते करीत असतात. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत मात्र लोकसभेला मदत करूनही महाडिकांनी विधानसभेला आपल्या विरोधात प्रचार केल्यामुळे सतेज पाटील यांनी यावेळी आघाडीधर्माला तिलांजली देत महाडिकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे आणि त्यातूनच ‘आमचं ठरलंय’ हे घोषवाक्य लोकप्रिय झाले आहे.सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम ऐन बहरात आहे. प्रचारसभा, पदयात्रा, घरभेटीसह मतदारांपर्यंत पोहोचण्याचे सर्व फंडे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते राबवत आहेत. त्यांचे लक्ष्य एकच आहे की, आपल्याला विजयाप्रत नेतील इतक्या मतदारांची जमवाजमव करण्यासाठी प्रथम कार्यकर्त्यांची जमवाजमव करणे. ती झाली की त्यांना हवी ती रसद देऊन मतदारांपर्यंत पोहोचवावे लागते. सध्याच्या धकाधकीच्या वेगवान जगात कार्यकर्त्यांची जमवाजमव करणे वाटते तेवढे सोपे नाहीे. कारण कामधाम सोडून फिरायला वेळ आहे कोणाकडे, असा सवाल सर्वसामान्य नागरिक सहजच विचारतात. मात्र, राजकारणाचा किडा ज्याच्या डोक्यात सतत वळवळत असतो तो किंवा देशसेवा, समाजसेवा करण्याची आवड, ध्येय ज्याने ठरवलेले असते असे तरुण कार्यकर्ते प्रत्येक राजकीय पक्षाकडे असतात. त्या तरुणांची मदत अशा जमवाजमवीला सर्वाधिक होते. अशी जमवाजमव करण्यात जो यशस्वी होतो, तो निवडणुकीतही बाजी मारून जातो.हे एका खासदारासाठीचे झाले. समजा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. त्रिशंकू संसद अस्तित्वात आली, तर सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे बहुमत मिळविण्याकरिता खासदारांची जमवाजमव करावी लागते. ही जमवाजमव राजकीय पक्ष करतात. सध्याच्या निवडणुकीतील ओपिनियन पोलचे निष्कर्ष पाहता २३ मे नंतर अशी खासदारांची जमवाजमव केली जातानाही देशाला पाहायला मिळणार आहे.