शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

कोल्हापूर जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींत घट,: पडताळणीसाठी स्वतंत्र समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:25 IST

कोल्हापूर : हुंडा किंवा अन्य कारणांमुळे महिलेवर सासरच्या मंडळींकडून केल्या जाणाºया हिंसाचाराच्या घटनेत ४९८ कलम लागले की संबंधित व्यक्तींना थेट अटक केली जाते. मात्र महिलांकडून या कायद्याचा होणारा गैरवापर

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : हुंडा किंवा अन्य कारणांमुळे महिलेवर सासरच्या मंडळींकडून केल्या जाणाºया हिंसाचाराच्या घटनेत ४९८ कलम लागले की संबंधित व्यक्तींना थेट अटक केली जाते. मात्र महिलांकडून या कायद्याचा होणारा गैरवापर थांबविण्यासाठी कोल्हापूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कुटुंब कल्याण समितीमुळे या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत समितीकडे ११ प्रकरणे दाखल झाली असून, त्यांतील चार प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीतून अजूनही भारतामध्ये महिलांवरील हिंसेचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. विवाहानंतर हुंडा किंवा तत्सम स्वरूपातील वस्तूंसाठी किंवा अन्य कोणत्याही कारणात्सव महिलेचा शारीरिक किंवा मानसिक छळ केला जातो. त्यातून आत्महत्या किंवा सासरच्या व्यक्तींकडून स्त्रीची हत्या करण्यापर्यंतचे प्रकार घडतात. अशा घटनांना आळा बसावा यासाठी कायद्यात कलम ४९८ ची तरतूद आहे. या कलमाखाली गुन्हा दाखल झाला की संशयितांना थेट अटक करण्याची तरतूद आहे.

सासरी हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नसताना गैरसमज, आकस, अंतर्गत कलहासारख्या कारणावरूनही सासरच्या मंडळींना अडकविण्याच्या उद्देशाने ४९८ कलमाचा आधार घेतला जातो. तक्रारीत नाव घातल्याने या घटनेशी संबंध नसलेल्या व्यक्तींनाही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. परिणामी संपूर्ण कुटुंबाची बदनामी होतेच; शिवाय कुटुंबाची व मुलांची वाताहत होते. अशाच एका प्रकरणात गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या कुटुंबावर ४९८ कलम लावण्यापूर्वी त्याची सत्यासत्यता पडताळण्यात यावी व त्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश दिला.

या आदेशानुसार देशात सर्वत्र जिल्हास्तरीय कुटुंब कल्याण समिती स्थापन करण्यात आली आहे. कोल्हापुरात आॅक्टोबर २०१७ मध्ये कोल्हापूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरणांतर्गत ही कुटुंब कल्याण समिती स्थापन झाली.

पाच महिन्यांतील घटना --दाखल झालेल्या केसेस : ११ --गुन्हा दाखल झालेल्या केसेस : ४ --प्रलंबित : ६अखत्यारीत नसलेले प्रकरण : १तोपर्यंत अटक नाहीयापूर्वी महिलेने तक्रार केली की, पोलीस संबंधित कुटुंबाला तातडीने अटक करीत. आता मात्र असे होत नाही. पोलिसांकडे तक्रार आली की, ते कुटुंब कल्याण समितीला पत्र पाठवितात. समिती तक्रारदार महिला व ज्यांच्याविरोधात तक्रार केली आहे, त्यांना बोलावून चौकशी करते. मध्यस्थाची भूमिका घेत समुपदेशनाचे काम केले जाते. मात्र खरेच महिलेचा छळ झाल्याचे लक्षात आले तर गुन्हा दाखल करण्यासंबंधीचा अहवाल दिला जातो. त्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल होऊन अटक केली जाते. ही सगळी प्रक्रिया एक महिन्याच्या आत केली जाते.अशी आहे समिती...कुटुंब कल्याण समिती त्रिसदस्यीय असून त्यात समाजसेवक, निवृत्त शासकीय अधिकारी, विधि स्वयंसेवक किंवा इतरपैकी व्यक्तींची निवड केली जाते. कोल्हापुरात सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी कोरगावकर, निवृत्त पोलीस उपअधीक्षक पंढरीनाथ मांडरे, माजी प्राचार्य हरी वनमोरे हे या समितीचे सदस्य आहेत. जिल्हा न्यायाधीश हे समितीचे अध्यक्ष असतात. एक वर्षानंतर समितीची पुनर्रचना केली जाते.

कौटुंबिक हिंसाचारविरोधी ४९८ कलमाचा गैरवापर होऊ नये म्हणून दाखल तक्रारीची निष्पक्षपातीपणे पडताळणी करण्यासाठी कुटुंब कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. समिती यात समुपदेशकाची भूमिका पार पाडत तडजोडीचा प्रयत्न करते. महिलेवर खरेच अन्याय झाला असेल तर महिन्याच्या आत तसा अहवाल पाठविला जातो.- उमेशचंद्र मोरे (न्यायाधीश, सचिव, कोल्हापूर जिल्हा विधि सेवा प्राधिकरण)