शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

आढावा बैठक : पिकांची अवस्था वाईट; आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी

हातकणंगले : तालुक्यामध्ये खरीपाच्या पिकाची अवस्था वाईट आहे. पीक आणेवारी ५० टक्क्यापेक्षा खाली आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवली आहे. अशा स्थितीमध्ये तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह गावोगावच्या सरपंचांनी केली. तालुक्यातील ६२ गावातील आढावा बैठकीमध्ये करणेत आली. पंचायत समितीच्या बचत भवन हॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. सुजित मिणचेकर होते.प्रास्ताविक गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी केले. सभापती राजेश पाटील यांनी पाणीटंचाईचा आढावा घेताना तालुक्यात खरीपाचे उत्पादन ५० टक्के पेक्षा खाली आहे. पावसाअभावी पिके करपली आहेत. विहिरी, बोअरलाही पाणी नाही. वारणा आणि पंचगंगा नदीवरून पाणी उपसा करणारी मोजकीच गावे आहेत. हालोंडी-तासगावपासून मजले-तारदाळपर्यंतची वीस-पंचवीस गावे माळरानावर असून त्यांना बारमाही पाणीटंचाई भासते. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तालुक्याची सध्याची स्थिती पाहता तालुक्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे. तरी तालुका दुष्काळी जाहीर करून न्याय द्यावा, अशी मागणी या बैठकीत केली.जि. प. सदस्य शहाजी पाटील यांनीही २३ गावामध्ये भीषण पाणीटंचाई आहे. त्यांना पाणी देण्यासाठी कायमची उपाययोजना आवश्यक असलेचे मत व्यक्त केले. उसभापती प्रभावती पाटील, सदस्य रंगराव खांडेकर आणि विविध गावच्या सरपंचांनी तालुक्यातील पाणी स्थिती आणि जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था पाहता यावर्षी तालुक्यातील दुष्काळी स्थिती पाहता शेतकरीवर्गाची पीक कर्जे आणि इतर कर्जे माफ करण्याची मागणी केली.पाणीपुरवठाचे उपअभियंता बाळासाहेब कांबळे म्हणाले, खासगी विहिरी, उपसा सिंचन योजनासह इतर पाण्याचे स्त्रोत शासनाच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेऊन नागरिकांना पाणीपुरवठा कारावा लागणार असल्याचे मत व्यक्त केले.सुजित मिणचेकर यांनी तालुक्याच्या उत्तर-दक्षिण विस्ताराचा विचार करून मध्यवर्ती केंद्रीय पाणी योजना राबविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून भविष्यात तालुक्यासाठी दोनशे ते तीनशे कोटीची एकच पाणी योजना सुरू करण्यासाठी विचार असल्याचे मत व्यक्त केले.आढावा बैठकीला जि. प. सदस्य सौ. प्रमोदिनी जाधव, डॉ. सुमन मिणचेकर, पंचायत समिती सदस्य संतोष भोरे, सौ. मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तालुक्यातील दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाई आढावा बैठकीसाठी तालुका पंचायत समितीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला २२ पंचायत सदस्यांपैकी चार आणि ११ जि. प. सदस्यांपैकी २ सदस्य हजर होते. पाणीटंचाईचे गांभीर्य १८ पंचायत समिती आणि ९ जि. प. सदस्यांना नाही हे या बैठकीमध्ये दिसून आले.