शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

हातकणंगले तालुक्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: September 24, 2015 00:04 IST

आढावा बैठक : पिकांची अवस्था वाईट; आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी

हातकणंगले : तालुक्यामध्ये खरीपाच्या पिकाची अवस्था वाईट आहे. पीक आणेवारी ५० टक्क्यापेक्षा खाली आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवली आहे. अशा स्थितीमध्ये तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह गावोगावच्या सरपंचांनी केली. तालुक्यातील ६२ गावातील आढावा बैठकीमध्ये करणेत आली. पंचायत समितीच्या बचत भवन हॉलमध्ये झालेल्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. सुजित मिणचेकर होते.प्रास्ताविक गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी केले. सभापती राजेश पाटील यांनी पाणीटंचाईचा आढावा घेताना तालुक्यात खरीपाचे उत्पादन ५० टक्के पेक्षा खाली आहे. पावसाअभावी पिके करपली आहेत. विहिरी, बोअरलाही पाणी नाही. वारणा आणि पंचगंगा नदीवरून पाणी उपसा करणारी मोजकीच गावे आहेत. हालोंडी-तासगावपासून मजले-तारदाळपर्यंतची वीस-पंचवीस गावे माळरानावर असून त्यांना बारमाही पाणीटंचाई भासते. यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. तालुक्याची सध्याची स्थिती पाहता तालुक्यामध्ये दुष्काळी स्थिती आहे. तरी तालुका दुष्काळी जाहीर करून न्याय द्यावा, अशी मागणी या बैठकीत केली.जि. प. सदस्य शहाजी पाटील यांनीही २३ गावामध्ये भीषण पाणीटंचाई आहे. त्यांना पाणी देण्यासाठी कायमची उपाययोजना आवश्यक असलेचे मत व्यक्त केले. उसभापती प्रभावती पाटील, सदस्य रंगराव खांडेकर आणि विविध गावच्या सरपंचांनी तालुक्यातील पाणी स्थिती आणि जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था पाहता यावर्षी तालुक्यातील दुष्काळी स्थिती पाहता शेतकरीवर्गाची पीक कर्जे आणि इतर कर्जे माफ करण्याची मागणी केली.पाणीपुरवठाचे उपअभियंता बाळासाहेब कांबळे म्हणाले, खासगी विहिरी, उपसा सिंचन योजनासह इतर पाण्याचे स्त्रोत शासनाच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेऊन नागरिकांना पाणीपुरवठा कारावा लागणार असल्याचे मत व्यक्त केले.सुजित मिणचेकर यांनी तालुक्याच्या उत्तर-दक्षिण विस्ताराचा विचार करून मध्यवर्ती केंद्रीय पाणी योजना राबविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून भविष्यात तालुक्यासाठी दोनशे ते तीनशे कोटीची एकच पाणी योजना सुरू करण्यासाठी विचार असल्याचे मत व्यक्त केले.आढावा बैठकीला जि. प. सदस्य सौ. प्रमोदिनी जाधव, डॉ. सुमन मिणचेकर, पंचायत समिती सदस्य संतोष भोरे, सौ. मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तालुक्यातील दुष्काळी स्थिती आणि पाणीटंचाई आढावा बैठकीसाठी तालुका पंचायत समितीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीला २२ पंचायत सदस्यांपैकी चार आणि ११ जि. प. सदस्यांपैकी २ सदस्य हजर होते. पाणीटंचाईचे गांभीर्य १८ पंचायत समिती आणि ९ जि. प. सदस्यांना नाही हे या बैठकीमध्ये दिसून आले.