शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

ग्राहक धोरण २४ रोजी जाहीर करा

By admin | Updated: December 19, 2014 00:45 IST

सूर्यकांत गवळी : मुख्यमंत्र्यांकडे मागणी, शासकीय यंत्रणांशी संवाद

कोल्हापूर : ग्राहक दिनादिवशीच म्हणजे २४ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे ग्राहक धोरण जाहीर करावे, अशी मागणी ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी यांनी आज, गुरुवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात विविध शासकीय यंत्रणांशी संवाद साधण्यासाठी बैठक आयोजित केली होती. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.गवळी म्हणाले, ग्राहक चळवळीचे जाळे विणण्यासाठी तसेच ग्रामीण भागात ही चळवळ मोठी करावी, रुजावी या हेतूने १६ नोव्हेंबरपासून नागपूर येथून दौरा सुरू केला आहे. ‘एक जिल्हा, एक दिवस’ या स्वरुपात नागपूर, मुंबई, ठाणे, अमरावती, नाशिक या विभागांत जिल्हावार भेटी दिल्या आहेत. राज्यात १२ ठिकाणी ग्राहक संरक्षण समित्या स्थापन झाल्या आहेत. ज्या ठिकाणी झालेल्या नाहीत तेथे त्वरित कराव्यात, अशा सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मनीषा देशपांडे, दीपक खाडे, रवी पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्षांच्या सूचनागवळी म्हणाले, ग्राहक संरक्षण विभाग स्वतंत्रपणे करावा, याला वेळ लागणार असेल तर या विभागासाठी स्वतंत्रपणे सचिव नियुक्त करावेत.या विभागाला स्वतंत्रपणे बजेट तरतुद करावी, ग्राहकांचे प्रश्न वा फसवणुकीबाबत त्यांना त्वरित न्याय मिळावा यासाठी तालुका, जिल्हा स्तरावर ग्राहकदूत किंवा ग्राहक संपर्कप्रमुख नेमावेत.२४ डिसेंबरला भारतीय ग्राहक दिन व १५ मार्च जागतिक ग्राहक दिन साजरे करावेत, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद २४ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यांतून स्थापन कराव्यात व महिन्याला बैठका व्हाव्यात. ग्राहकांच्या प्रबोधनासाठी प्रत्येक कार्यालयाने चार प्रदर्शने भरवावीत, आदी मागण्यांसाठी शासनाकडे प्रयत्न केले जाणार आहेत.