शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

हेरिटेज कमिटी बरखास्त करून निर्णयाची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST

कोल्हापूर : महानगरपालिका स्तरावर काम करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेली हेरिटेज समिती बरखास्त करून या समितीने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची राज्य ...

कोल्हापूर : महानगरपालिका स्तरावर काम करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेली हेरिटेज समिती बरखास्त करून या समितीने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी येथील प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.

यापूर्वी दोन वेळा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती, त्याचीच आठवण शनिवारी पुन्हा करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘तत्कालीन राज्य सरकारतर्फे अमरजा निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली होती. परंतु दुर्दैवाने कोल्हापुरातील संरक्षित वास्तू सुरक्षित राहिलेल्या नाहीत. त्याला कारण समितीच्या अध्यक्षांची कामकाजाची पद्धत कारणीभूत ठरली आहे. त्या त्यांचे कामकाज कोणाच्या तरी दबावाखाली करीत आहेत. तसेच त्या स्वत: आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांना काही सरकारी कामे मिळाली आहेत. त्यामुळे संरक्षित वास्तूबाबत त्या कायदेशीर निर्णय घेताना दिसत नाहीत. त्यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकामाचे कंत्राट घेतले होते. त्यांनी या इमारतीचा काही भाग डीपी रोडवर बांधला आहे.’

अंबाबाई मंदिर परिसरातील बांधकामाबाबत काही तक्रारी केल्यानंतर बांधकाम थांबविले. परंतु नंतर त्यांच्यावर कायदेशीर कोणतीही कारवाई न करता त्यांना समितीने बांधकामाची परवानगी दिली. म्हणूनच निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती बरखास्त करावी आणि त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करावी, असेही देसाई यांनी निवेदनात म्हटले आहे.

पंचगंगा घाटाबाबत तक्रारी गायब?

पंचगंगा घाट विकासाचे काम थांबविल्याबद्दल कोल्हापूर शहर कृती समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यावेळी कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी हेरिटेज समितीकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सहायक संचालकांनी हे बांधकाम थांबवायला सांगितल्याचे स्पष्टीकरण दिले. जेव्हा कृती समितीचे सदस्य सहायक संचालक रामचंद्र महाजन यांना भेटले तेव्हा हेरिटेज समितीने आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत असे सांगितले खरे, पण त्या तक्रारी कोणी केल्या होत्या याची माहिती मिळत नसल्याचे सांगितले होते. मग तक्रारी कोणी केल्या होत्या की नाही, की समितीनेच बनाव केला होता असा प्रश्न निर्माण झाला आहे.