शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
3
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
4
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
5
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
6
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
7
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
8
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
9
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
10
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
11
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
12
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
13
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
14
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
15
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
16
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
17
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
18
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
19
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
20
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला

हेरिटेज कमिटी बरखास्त करून निर्णयाची चौकशी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST

कोल्हापूर : महानगरपालिका स्तरावर काम करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेली हेरिटेज समिती बरखास्त करून या समितीने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची राज्य ...

कोल्हापूर : महानगरपालिका स्तरावर काम करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेली हेरिटेज समिती बरखास्त करून या समितीने आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांची राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी येथील प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.

यापूर्वी दोन वेळा तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समिती बरखास्त करण्याची मागणी केली होती, त्याचीच आठवण शनिवारी पुन्हा करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, ‘तत्कालीन राज्य सरकारतर्फे अमरजा निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त केली होती. परंतु दुर्दैवाने कोल्हापुरातील संरक्षित वास्तू सुरक्षित राहिलेल्या नाहीत. त्याला कारण समितीच्या अध्यक्षांची कामकाजाची पद्धत कारणीभूत ठरली आहे. त्या त्यांचे कामकाज कोणाच्या तरी दबावाखाली करीत आहेत. तसेच त्या स्वत: आर्किटेक्ट असल्यामुळे त्यांना काही सरकारी कामे मिळाली आहेत. त्यामुळे संरक्षित वास्तूबाबत त्या कायदेशीर निर्णय घेताना दिसत नाहीत. त्यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकामाचे कंत्राट घेतले होते. त्यांनी या इमारतीचा काही भाग डीपी रोडवर बांधला आहे.’

अंबाबाई मंदिर परिसरातील बांधकामाबाबत काही तक्रारी केल्यानंतर बांधकाम थांबविले. परंतु नंतर त्यांच्यावर कायदेशीर कोणतीही कारवाई न करता त्यांना समितीने बांधकामाची परवानगी दिली. म्हणूनच निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती बरखास्त करावी आणि त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची चौकशी करावी, असेही देसाई यांनी निवेदनात म्हटले आहे.

पंचगंगा घाटाबाबत तक्रारी गायब?

पंचगंगा घाट विकासाचे काम थांबविल्याबद्दल कोल्हापूर शहर कृती समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यावेळी कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांनी हेरिटेज समितीकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सहायक संचालकांनी हे बांधकाम थांबवायला सांगितल्याचे स्पष्टीकरण दिले. जेव्हा कृती समितीचे सदस्य सहायक संचालक रामचंद्र महाजन यांना भेटले तेव्हा हेरिटेज समितीने आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत असे सांगितले खरे, पण त्या तक्रारी कोणी केल्या होत्या याची माहिती मिळत नसल्याचे सांगितले होते. मग तक्रारी कोणी केल्या होत्या की नाही, की समितीनेच बनाव केला होता असा प्रश्न निर्माण झाला आहे.