शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आजरा दंगलीतील गुन्हे मागे घेणार : मुंबईतील बैठकीत निर्णय, प्रकाश आबिटकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:18 IST

कोल्हापूर : आजऱ्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम समाजातील ७४ जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुंबई येथे गुरुवारी झालेल्या या संदर्भातील

कोल्हापूर : आजऱ्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम समाजातील ७४ जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुंबई येथे गुरुवारी झालेल्या या संदर्भातील समितीच्या बैठकीत झाला. आमदार प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला होता. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनामध्ये झालेल्या या समितीच्या बैठकीला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे उपस्थित होते.

चायनीज गाड्यावरील भांडणानंतर २००८ मध्ये आजऱ्यामध्ये दंगल घडली होती. त्यानंतर पाच दिवसांचा कर्फ्यू लावला गेला. दोन्ही समाजांतील ७४ जणांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते.या सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न सुरू केले होते; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील याबाबतच्या समितीने दोन वेळा हा प्रस्ताव अपात्र ठरविला होता. 

आबिटकर यांनी बदलत्या परिस्थितीमध्ये दोन्ही समाजांच्या युवकांच्या करिअरचा प्रश्न, तणाव निवळल्याच्या परिस्थितीची मांडणी करून राज्यस्तरीय समितीकडे हे गुन्हे काढून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अशा पद्धतीचे गुन्हे मागे घेण्याबाबत १२ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या शासन आदेशाचा संदर्भ घेत अनवधानाने झालेल्या या घटनेतील संबंधितांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आबिटकर यांनी केसरकर यांच्याकडे केली होती.‘लोकमत’ने मांडला विषयदोन्ही समाजांच्या ७४ जणांवर गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये युवकांचे प्रमाण मोठे आहे. यातील अनेकांना नोकºयांमध्ये अडचण निर्माण झाली. अनेकांना पासपोर्टही मिळाले नाहीत. यामुळे हे सर्वजण अक्षरश: हवालदिल झाले होते. याबाबत 30 नोव्हेंबर २०१७ रोजी ‘लोकमत’ने विशेष वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत आमदार आबिटकर यांनी ३ डिसेंबर रोजी दोन्ही समाजांच्या प्रमुखांची आजरा येथे बैठक घेतली होती. या बैठकीतही अनेकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले होते.आजऱ्यामध्ये अनवधानाने घडलेल्या या प्रकारामध्ये अनेक युवक, नागरिक अडकले होते. गुन्हे दाखल झाल्याने नऊ वर्षे न्यायालयीन लढा सुरू होता. मात्र, अनेकांच्या रोजगारामध्ये, नोकºयांमध्ये, पासपोर्ट मिळविण्यामध्ये गुन्हे दाखल झाल्याने अडचणी निर्माण होत होत्या. याप्रकरणी फारशी चर्चा न करता हे गुन्हे मागे घेतले जावेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली आणि अखेर माझ्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले. - प्रकाश आबिटकर, आमदार