शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आजरा दंगलीतील गुन्हे मागे घेणार : मुंबईतील बैठकीत निर्णय, प्रकाश आबिटकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:18 IST

कोल्हापूर : आजऱ्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम समाजातील ७४ जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुंबई येथे गुरुवारी झालेल्या या संदर्भातील

कोल्हापूर : आजऱ्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम समाजातील ७४ जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुंबई येथे गुरुवारी झालेल्या या संदर्भातील समितीच्या बैठकीत झाला. आमदार प्रकाश आबिटकर यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला होता. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनामध्ये झालेल्या या समितीच्या बैठकीला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे उपस्थित होते.

चायनीज गाड्यावरील भांडणानंतर २००८ मध्ये आजऱ्यामध्ये दंगल घडली होती. त्यानंतर पाच दिवसांचा कर्फ्यू लावला गेला. दोन्ही समाजांतील ७४ जणांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते.या सर्वांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न सुरू केले होते; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील याबाबतच्या समितीने दोन वेळा हा प्रस्ताव अपात्र ठरविला होता. 

आबिटकर यांनी बदलत्या परिस्थितीमध्ये दोन्ही समाजांच्या युवकांच्या करिअरचा प्रश्न, तणाव निवळल्याच्या परिस्थितीची मांडणी करून राज्यस्तरीय समितीकडे हे गुन्हे काढून घेण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अशा पद्धतीचे गुन्हे मागे घेण्याबाबत १२ आॅगस्ट २०१६ रोजी झालेल्या शासन आदेशाचा संदर्भ घेत अनवधानाने झालेल्या या घटनेतील संबंधितांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आबिटकर यांनी केसरकर यांच्याकडे केली होती.‘लोकमत’ने मांडला विषयदोन्ही समाजांच्या ७४ जणांवर गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये युवकांचे प्रमाण मोठे आहे. यातील अनेकांना नोकºयांमध्ये अडचण निर्माण झाली. अनेकांना पासपोर्टही मिळाले नाहीत. यामुळे हे सर्वजण अक्षरश: हवालदिल झाले होते. याबाबत 30 नोव्हेंबर २०१७ रोजी ‘लोकमत’ने विशेष वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत आमदार आबिटकर यांनी ३ डिसेंबर रोजी दोन्ही समाजांच्या प्रमुखांची आजरा येथे बैठक घेतली होती. या बैठकीतही अनेकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले होते.आजऱ्यामध्ये अनवधानाने घडलेल्या या प्रकारामध्ये अनेक युवक, नागरिक अडकले होते. गुन्हे दाखल झाल्याने नऊ वर्षे न्यायालयीन लढा सुरू होता. मात्र, अनेकांच्या रोजगारामध्ये, नोकºयांमध्ये, पासपोर्ट मिळविण्यामध्ये गुन्हे दाखल झाल्याने अडचणी निर्माण होत होत्या. याप्रकरणी फारशी चर्चा न करता हे गुन्हे मागे घेतले जावेत यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या कामी महत्त्वाची भूमिका बजावली आणि अखेर माझ्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले. - प्रकाश आबिटकर, आमदार