शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच उचंगीच्या घळभरणीचा निर्णय : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 16:02 IST

उचंगी (ता. आजरा) प्रकल्पात घळभरणी करून या हंगामात पाणी अडवायचे म्हटले तर शिल्लक राहिलेल्या १५ टक्के कामासाठीच्या ९ कोटी ६० लाखांच्या खर्चास शासनाने मान्यता देण्याची गरज आहे. यावर सोमवारी (दि.१६) मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होत आहे. त्यांचे आदेश आल्यावरच घळभरणीचा निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच उचंगीच्या घळभरणीचा निर्णय : जिल्हाधिकारीउचंगी प्रकल्पाच्या अडीअडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

कोल्हापूर : उचंगी (ता. आजरा) प्रकल्पात घळभरणी करून या हंगामात पाणी अडवायचे म्हटले तर शिल्लक राहिलेल्या १५ टक्के कामासाठीच्या ९ कोटी ६० लाखांच्या खर्चास शासनाने मान्यता देण्याची गरज आहे. यावर सोमवारी (दि.१६) मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होत आहे. त्यांचे आदेश आल्यावरच घळभरणीचा निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.उचंगी प्रकल्पाच्या अडीअडचणीसंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे यांच्यासह जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, आजऱ्याचे प्रांताधिकारी संपत खिलारी, पाटबंधारे अधीक्षक अभियंता स्मिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती.उचंगी प्रकल्पाचा घळभरणीचा विषय १९९५ पासून प्रलंबित असल्याचा मुद्दा देवणे यांनी काढला. कुपेकर यांनीही प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच कामाची पूर्तता होऊ शकली नसल्याचे सांगितले. ८५ टक्के काम पूर्ण असूनही आणि शिल्लक राहिलेल्या १५ टक्के कामासाठी जवळपास १२ कोटींचा निधी येऊनदेखील तो का खर्च केला जात नाही, अशी विचारणा करत घळभरणीची तारीख निश्चित करा अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांत निधी खर्चाचे नियोजन आणि त्यानंतर आठ दिवसांनी घळभरणीची तारीख निश्चित केली जाईल, असे स्पष्ट केले.प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेजचे वाटपजमीन मिळण्यास २०९ पात्र खातेदारांपैकी १२६ जणांना ६७.९३ हेक्टर जमिनीचे वाटप झाले आहे. ४२ जणांना विशेष आर्थिक पॅकेज मंजूर केले आहे. अजून ३५ प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे आजरा तालुक्यातील जेऊर व चितळे येथील २३.६५ हेक्टर जमिनीचा लेआउट तयार करून उपविभागीय अधिकाऱ्यांनी पॅकेज वाटपाचे काम पूर्ण करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.सांडव्यासाठी वनविभागाकडे पाठपुरावासांडव्याच्या कालव्यासाठी ०.९३ हेक्टर जमिनीची गरज आहे. ही जमीन वनखात्याची असल्याने त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी महाराष्ट्र राज्य नागपूर यांना जागा मागणीचा प्रस्ताव दिला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे पाटबंधारे अभियंता स्मिता माने यांनी सांगितले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर