शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच उचंगीच्या घळभरणीचा निर्णय : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 16:02 IST

उचंगी (ता. आजरा) प्रकल्पात घळभरणी करून या हंगामात पाणी अडवायचे म्हटले तर शिल्लक राहिलेल्या १५ टक्के कामासाठीच्या ९ कोटी ६० लाखांच्या खर्चास शासनाने मान्यता देण्याची गरज आहे. यावर सोमवारी (दि.१६) मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होत आहे. त्यांचे आदेश आल्यावरच घळभरणीचा निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच उचंगीच्या घळभरणीचा निर्णय : जिल्हाधिकारीउचंगी प्रकल्पाच्या अडीअडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

कोल्हापूर : उचंगी (ता. आजरा) प्रकल्पात घळभरणी करून या हंगामात पाणी अडवायचे म्हटले तर शिल्लक राहिलेल्या १५ टक्के कामासाठीच्या ९ कोटी ६० लाखांच्या खर्चास शासनाने मान्यता देण्याची गरज आहे. यावर सोमवारी (दि.१६) मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक होत आहे. त्यांचे आदेश आल्यावरच घळभरणीचा निर्णय घेऊ, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.उचंगी प्रकल्पाच्या अडीअडचणीसंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे यांच्यासह जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे, आजऱ्याचे प्रांताधिकारी संपत खिलारी, पाटबंधारे अधीक्षक अभियंता स्मिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती.उचंगी प्रकल्पाचा घळभरणीचा विषय १९९५ पासून प्रलंबित असल्याचा मुद्दा देवणे यांनी काढला. कुपेकर यांनीही प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच कामाची पूर्तता होऊ शकली नसल्याचे सांगितले. ८५ टक्के काम पूर्ण असूनही आणि शिल्लक राहिलेल्या १५ टक्के कामासाठी जवळपास १२ कोटींचा निधी येऊनदेखील तो का खर्च केला जात नाही, अशी विचारणा करत घळभरणीची तारीख निश्चित करा अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चार दिवसांत निधी खर्चाचे नियोजन आणि त्यानंतर आठ दिवसांनी घळभरणीची तारीख निश्चित केली जाईल, असे स्पष्ट केले.प्रकल्पग्रस्तांना आर्थिक पॅकेजचे वाटपजमीन मिळण्यास २०९ पात्र खातेदारांपैकी १२६ जणांना ६७.९३ हेक्टर जमिनीचे वाटप झाले आहे. ४२ जणांना विशेष आर्थिक पॅकेज मंजूर केले आहे. अजून ३५ प्रकल्पग्रस्तांच्या मागणीप्रमाणे आजरा तालुक्यातील जेऊर व चितळे येथील २३.६५ हेक्टर जमिनीचा लेआउट तयार करून उपविभागीय अधिकाऱ्यांनी पॅकेज वाटपाचे काम पूर्ण करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.सांडव्यासाठी वनविभागाकडे पाठपुरावासांडव्याच्या कालव्यासाठी ०.९३ हेक्टर जमिनीची गरज आहे. ही जमीन वनखात्याची असल्याने त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व केंद्रस्थ अधिकारी महाराष्ट्र राज्य नागपूर यांना जागा मागणीचा प्रस्ताव दिला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे पाटबंधारे अभियंता स्मिता माने यांनी सांगितले. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर