शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’चा करार रद्दचा ‘कुमुदा’चा निर्णय

By admin | Updated: January 23, 2016 00:47 IST

अविनाश भोसले यांची माहिती : राजकीय कारस्थानामुळे त्रस्त

कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी व शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वत:ची मालमत्ता गहाण ठेवून ‘दौलत’ सुरू करण्याचा उद्देश होता; पण कोणाच्या तरी इच्छेखातर व महत्त्वाकांक्षेपोटी, राजकीय हेतूने संचालकांविरोधात चाललेला प्रकार पाहता हा कारखाना चालविण्यास घेण्याबाबत जिल्हा बॅँकेशी केलेला करार रद्द करीत आहे, अशी माहिती कुमुदा शुगर्स प्रा. लि.चे डॉ. अविनाश भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकातून दिली. ‘कुमुदा’ने एक कोटी बयाणा रक्कम भरून भाडेतत्त्वावर चालविण्याबाबत जिल्हा बॅँकेशी करार केला होता. कारखाना ताब्यात घेताना दहा कोटी रुपये व उर्वरित पंधरा कोटी मार्चअखेर भरण्याची तयारी त्यांनी दर्शविली होती; पण त्यानंतर ‘दौलत’अंतर्गत राजकारणामुळे अडथळे निर्माण करण्याचे काम काही मंडळींनी केले. जिल्हा बॅँकेचे कर्ज भागविण्यासाठी स्वत:ची मालमत्ता तारण ठेवून कर्ज काढण्याचे नियोजन केले होते; पण काही मंडळींचे ‘दौलत’ सुरूच होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यांना कंटाळून कारखाना चालविण्यास घेण्याचा निर्णय रद्द करत असून भविष्यात शेतकरी व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर करून प्रतिसाद दिल्यास याबाबत पुनर्विचार करू, असेही डॉ. भोसले यांनी म्हटले आहे. ‘कुमुदा’ने उदयसिंगराव गायकवाड साखर कारखाना व रयत साखर कारखाना भाड्याने चालविण्यास घेतले होते. त्यापैकी ‘गायकवाड’ वार्षिक भाड्याने घेतला होता; त्यामुळे तो सोडला आहे. कारखान्याची दीर्घमुदतीच्या कराराच्या अपेक्षेने केलेली भांडवली गुंतवणूक परत मिळत नसल्याने व राज्य बॅँकेने कारखाना उशिरा ताब्यात दिल्याने त्यांच्याकडील दिलेले चेकचे स्टॉप पेमेंट करण्यात आले होते. तसेच रयत कारखान्याचा करार १८ वर्षांचा असून याबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. ‘रयत’च्या एफआरपी ऊस बिलाबाबतची थकीत रक्कमही साखरेचे दर ढासळल्याने राहिली आहे. सदर रयत कारखाना संचालक मंडळाने कराराचा भंग करून दुसऱ्या कंपनीस चालविण्यास दिला आहे. त्यामुळे थकीत एफआरपी कर्ज मंजुरीमध्ये अडचण येत आहे. ‘दौलत’ चालविण्यास घेण्याची तयारी दाखविल्याने आयर्न शुगर लि. ही स्वतंत्र असणाऱ्या कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे राजकीय कारस्थान आहे. अशा वृत्तीमुळे कारखान्याबाबतचा करार रद्द करण्याचा विचार करीत असल्याचे डॉ. भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.