शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST

यड्राव : महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या थकीत पगारासह स्टाफिंग पॅटर्नच्या विषयी समिती स्थापन केली आहे. तसेच त्रिपक्षीय समितीही पगारवाढीसाठी ...

यड्राव : महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या थकीत पगारासह स्टाफिंग पॅटर्नच्या विषयी समिती स्थापन केली आहे. तसेच त्रिपक्षीय समितीही पगारवाढीसाठी गठित केली असून पगारवाढीचा निर्णय लवकरच होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रातिनिधिक मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.

साखर कामगारांच्या प्रश्नांसाठी जिल्ह्यातील साखर कारखाना कामगार संघटना व साखर कारखान्यांना शिष्टमंडळासह भेटी सुरू आहेत. यावेळी काळे यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, शासनाला त्रिपक्षीय समिती नेमणे, थकीत पगार, स्टाफिंग पॅटर्न व बंद कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी संपाची नोटीस दिली होती. त्यास अनुसरून जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय पक्षीय समिती नेमून पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. या समितीच्या एक-दोन बैठकीत अंतिम निर्णय लवकरच होईल.

जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पुढाकाराने सहकारमंत्री व कामगारमंत्री यांच्या आदेशाने साखर कामगारांच्या थकीत पगार, स्टाफिंग पॅटर्न व बंद कारखान्याबाबत शासनाने साखर आयुक्त व कामगार आयुक्त व साखर महासंघाचे कार्यकारी संचालक यांची समिती नेमून अहवाल मागितला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यावर साखर कामगारांचे सर्व प्रश्न सुटणे सोयीचे होणार आहे. या शिष्टमंडळात प्रातिनिधिक मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, सर्जेराव हळदकर, आझाद शेख, बाळू बनगे, प्रदीप शिंदे यांचा सहभाग होता.

चौकट - साखर कामगारांसाठी नव्याने येत असलेला स्टॉपिंग पॅटर्न जुन्या साखर कारखान्यांसाठी चालणार नाही व अत्याधुनिक कारखान्यांसाठी तो कसा आहे, हे अधिकारी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा निघणार आहे, असे प्रतिनिधिक मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले.

फोटो - २३०१२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळी - जयसिंगपूर येथे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते तात्यासाहेब काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, सर्जेराव हळदकर, आझाद शेख, बाळू बनगे, प्रदीप शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.