शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST

यड्राव : महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या थकीत पगारासह स्टाफिंग पॅटर्नच्या विषयी समिती स्थापन केली आहे. तसेच त्रिपक्षीय समितीही पगारवाढीसाठी ...

यड्राव : महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या थकीत पगारासह स्टाफिंग पॅटर्नच्या विषयी समिती स्थापन केली आहे. तसेच त्रिपक्षीय समितीही पगारवाढीसाठी गठित केली असून पगारवाढीचा निर्णय लवकरच होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रातिनिधिक मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.

साखर कामगारांच्या प्रश्नांसाठी जिल्ह्यातील साखर कारखाना कामगार संघटना व साखर कारखान्यांना शिष्टमंडळासह भेटी सुरू आहेत. यावेळी काळे यांनी ही माहिती दिली.

ते पुढे म्हणाले, शासनाला त्रिपक्षीय समिती नेमणे, थकीत पगार, स्टाफिंग पॅटर्न व बंद कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्यासाठी संपाची नोटीस दिली होती. त्यास अनुसरून जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय पक्षीय समिती नेमून पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. या समितीच्या एक-दोन बैठकीत अंतिम निर्णय लवकरच होईल.

जयप्रकाश दांडेगावकर यांच्या पुढाकाराने सहकारमंत्री व कामगारमंत्री यांच्या आदेशाने साखर कामगारांच्या थकीत पगार, स्टाफिंग पॅटर्न व बंद कारखान्याबाबत शासनाने साखर आयुक्त व कामगार आयुक्त व साखर महासंघाचे कार्यकारी संचालक यांची समिती नेमून अहवाल मागितला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यावर साखर कामगारांचे सर्व प्रश्न सुटणे सोयीचे होणार आहे. या शिष्टमंडळात प्रातिनिधिक मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, सर्जेराव हळदकर, आझाद शेख, बाळू बनगे, प्रदीप शिंदे यांचा सहभाग होता.

चौकट - साखर कामगारांसाठी नव्याने येत असलेला स्टॉपिंग पॅटर्न जुन्या साखर कारखान्यांसाठी चालणार नाही व अत्याधुनिक कारखान्यांसाठी तो कसा आहे, हे अधिकारी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा निघणार आहे, असे प्रतिनिधिक मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले.

फोटो - २३०१२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळी - जयसिंगपूर येथे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते तात्यासाहेब काळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, सर्जेराव हळदकर, आझाद शेख, बाळू बनगे, प्रदीप शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.