शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

कच्च्या साखरेस निर्यात अनुदानाचा निर्णय

By admin | Updated: February 19, 2015 23:38 IST

चार हजार अनुदान : देशातून १४ लाख टन निर्यात

कोल्हापूर : केंद्र सरकारने गुरुवारी आणखी चौदा लाख टन कच्ची साखर निर्यातीस मंजुरी दिल्याने त्याचा स्थानिक बाजारपेठेत साखरेचे दर वाढण्यास काही प्रमाणात उपयोग होणार आहे परंतु त्याबद्दल साखर कारखानदारीतून ‘दात टोकरून पोट भरत नाही..’ अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. केंद्र शासनाने अनुदानाची घोषणा केली असून त्याचा अधिकृत अध्यादेश निघण्यासाठी कांही दिवसांचा अवधी लागू शकतो.केंद्र सरकारने कच्ची साखर निर्यात करण्यासाठी टनास चार हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील हंगाम आता संपण्याच्या मार्गावर आहे. यापुढील काळात जे कारखाने कच्ची साखर तयार करतील व जे पहिल्यांदा अनुदानासाठी प्रस्ताव सादर करतील त्यांनाच या अनुदानाचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे कारखानदारीस या निर्णयाचा तातडीने काही लाभ होणार नाही परंतु देशांतर्गत बाजारातील साखर निर्यात होणार म्हटल्यावर स्थानिक बाजारपेठेत साखरेचे दर काही प्रमाणात वाढू शकतात. सध्या साखरेचा क्विंटलचा दर २४०० रुपयांपर्यंत आला आहे. साखर विकून जे पैसे उपलब्ध होतील, त्यानुसार कारखाने एफआरपी देण्याचा प्रयत्न करत आहेत. कायद्याने चौदा दिवसांत बिले देण्याचे बंधन असतानाही दोन बिले एकत्र करून शेतकऱ्यांना पैसे दिले जात आहेत. केंद्र सरकारने कारखान्यांना ठोस अनुदान दिल्याशिवाय कित्येक कारखान्यांना ‘एफआरपी’ही देता येणार नाही परंतु त्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करायला हवा होता. त्या पातळीवर सगळे ठप्प आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह रघुनाथदादा पाटील यांची संघटनाही सुरुवातीच्या टप्प्यात आंदोलन करून थकली आहे. राज्य शासन दादच द्यायला तयार नाही. स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारला पाठिंबा दिला असल्याने राज्यातही ते त्यांच्यासोबतच असल्याने धड आंदोलन करता येत नाही व दरही मिळवता येत नाही, अशी कोंडी त्यांची झाली आहे.