शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दर्शनरांगांतही ‘सीसीटीव्ही’-- अंबाबाई मंदिरबाबत ‘देवस्थान’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:47 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनरांगांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय

ठळक मुद्देवातानुकूलित यंत्रणा, बॅरिकेटिंग करणारदगडाची सुटलेली अडक किंवा धोकादायक परिसराबाबतही तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव दर्शनरांगांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे. रांगेतील भाविकांना त्रास होऊ नये यासाठी वातानुकूलित यंत्रणा, पाण्याची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय सुवर्णपालखीच्या सुरक्षेसाठी दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत.

अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला आता सहा दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने युद्धपातळीवर तयारी सुरू असून, गुरुवारी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, अभियंता सुदेश देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दराडे उपस्थित होते. याप्रसंगी महाद्वारामधील चिंचा-आवळेवाल्यांसह सर्व दुकानदारांनी केलेले अतिक्रमण दोन दिवसांच्या आत काढून घेण्याच्या सूचना दिल्या.

अंबाबाईच्या मुख्य दर्शनाची रांग सरलष्कर भवन येथून पुढे जाते. या दर्शनरांगेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे भर उन्हातही भाविकांना गारवा अनुभवता येणार आहे.याशिवाय मंदिराच्या चारीही दरवाजांतून भाविकांची होणारी ये-जा, एखाद्या दगडाची सुटलेली अडक किंवा धोकादायक परिसराबाबतही तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना दिली.दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनातगरुड मंडपातून मुखदर्शनाची रांग जाते, येथेच भाविकांचे अभिषेक असतात; शिवाय सुवर्णपालखीदेखील आहे. त्यामुळे येथे सुवर्णपालखीच्या सुरक्षेसाठी दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात असतील. शिवाय बॅरिकेटिंग लावण्यात येणार आहेत. परिसरातील फरशी तापू नये यासाठी त्यावर एखादे रसायन टाकता येईल का, याचाही विचार केला जात आहे.