शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सोळाशे जणांच्या मानधनास ‘क्षय’

By admin | Updated: November 9, 2014 01:07 IST

कामावर परिणाम : चार महिन्यांची कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूर सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यात अपुऱ्या मानधनावर आणि सुविधांशिवाय काम करणाऱ्या सुमारे सोळाशे कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधनच मिळालेले नाही. ऐन दिवाळीचा सण घेतलेल्या हातउसन्यावर काढावा लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. मानधन मिळले नसल्याने क्षयरोगासारख्या सामाजिक व्याधी निवारणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामावरही परिणाम झाला. राज्य तसेच केंद्र सरकारच्या पातळीवर निधी मंजुरीबाबतचा उदासीनपणा पाहता, आणखी किती प्रतीक्षा करायची, असा प्रश्न कर्मचाऱ्यांतून होत आहे. राज्यातील जिल्ह्यांत सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांत एकूण सोळाशे कर्मचारी काम करीत आहेत. क्षयरोगासंबंधी जनजागृती, रुग्णांची माहिती संकलन, उपचार करणे, आदी कामे या कर्मचाऱ्यांकरवी करून त्यांचा राज्यपातळीवरील डाटा केला जातो. २००० सालापासून हे काम सुरू आहे. प्रत्येक वर्षी एप्रिल किंवा आॅक्टोबरमध्ये निधी येतो, पण यंदा मात्र तो चार महिने मिळालेला नाही. मुळात मानधन कमी, त्यात कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. त्यात काही सुधारणा होणे अपेक्षित असताना, सरकारनेही दखल घेतली नाही.