शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

जिल्ह्यात ९२५ कोटींची कर्जमाफी

By admin | Updated: June 25, 2017 00:20 IST

आकडेवारी तयार : ९० हजार शेतकऱ्यांना पूर्ण लाभ : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील तब्बल १ लाख १० हजार थकबाकीदारांना सुमारे ९२५ कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. यातील दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या ९० हजार शेतकऱ्यांचे शंभर टक्के म्हणजेच ६२५ कोटी १८ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांनाही २५ हजार किंवा २५ टक्के मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात जून २0१६ अखेर दीड लाखावरील शेती, शेती पुरक मध्यम मुदतीचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख १० हजार आहे. त्यांचे सुमारे ९२५ कोटींचे कर्ज थकीत आहे. जिल्हा बॅँक व जिल्ह्यातील १४ राष्ट्रीयीकृत बॅँकांमधील हे थकीत शेतकरी कर्जदार आहेत. यातील ९० हजार ४१९ शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे ६२५ कोटी १८ लाखांचे थकीत कर्ज आहे. ते शंभर टक्के माफ होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. (दीड लाखावरील २0 हजार शेतकऱ्यांच्या कर्जसवलतीचा आकडा ३८४ कोटींवर आहे. त्यामुळे एकूण कर्जमाफी ९२५ कोटींच्या घरात जाते.)३० हजार शेतकऱ्यांचे थकीत कर्ज दीड लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना दीड लाखापर्यंचे कर्ज माफ होईल, पण उरलेले कर्ज थकीत राहणार असल्याने त्यांचा सात-बारा कोरा होणार नाही. जिल्ह्यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख ४८ हजार २१२ आहे. या शेतकऱ्यांनी २0१५-१६ मध्ये शेती व शेतीपूरक मध्यम मुदतीच्या ८९९ कोटींच्या कर्जाची परतफेड केली आहे. या शेतकऱ्यांना २५ हजार किंवा २५ टक्के मदतीचा लाभ मिळणार आहे.दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळून पुन्हा सधनतेकडे वाटचाल करण्यास शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मदत मिळणार आहे. - पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप