शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

जिल्ह्यात ९२५ कोटींची कर्जमाफी

By admin | Updated: June 25, 2017 00:20 IST

आकडेवारी तयार : ९० हजार शेतकऱ्यांना पूर्ण लाभ : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील तब्बल १ लाख १० हजार थकबाकीदारांना सुमारे ९२५ कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. यातील दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या ९० हजार शेतकऱ्यांचे शंभर टक्के म्हणजेच ६२५ कोटी १८ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांनाही २५ हजार किंवा २५ टक्के मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात जून २0१६ अखेर दीड लाखावरील शेती, शेती पुरक मध्यम मुदतीचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख १० हजार आहे. त्यांचे सुमारे ९२५ कोटींचे कर्ज थकीत आहे. जिल्हा बॅँक व जिल्ह्यातील १४ राष्ट्रीयीकृत बॅँकांमधील हे थकीत शेतकरी कर्जदार आहेत. यातील ९० हजार ४१९ शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे ६२५ कोटी १८ लाखांचे थकीत कर्ज आहे. ते शंभर टक्के माफ होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. (दीड लाखावरील २0 हजार शेतकऱ्यांच्या कर्जसवलतीचा आकडा ३८४ कोटींवर आहे. त्यामुळे एकूण कर्जमाफी ९२५ कोटींच्या घरात जाते.)३० हजार शेतकऱ्यांचे थकीत कर्ज दीड लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना दीड लाखापर्यंचे कर्ज माफ होईल, पण उरलेले कर्ज थकीत राहणार असल्याने त्यांचा सात-बारा कोरा होणार नाही. जिल्ह्यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख ४८ हजार २१२ आहे. या शेतकऱ्यांनी २0१५-१६ मध्ये शेती व शेतीपूरक मध्यम मुदतीच्या ८९९ कोटींच्या कर्जाची परतफेड केली आहे. या शेतकऱ्यांना २५ हजार किंवा २५ टक्के मदतीचा लाभ मिळणार आहे.दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळून पुन्हा सधनतेकडे वाटचाल करण्यास शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मदत मिळणार आहे. - पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप