शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

जिल्ह्यात ९२५ कोटींची कर्जमाफी

By admin | Updated: June 25, 2017 00:20 IST

आकडेवारी तयार : ९० हजार शेतकऱ्यांना पूर्ण लाभ : नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील तब्बल १ लाख १० हजार थकबाकीदारांना सुमारे ९२५ कोटींची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे. यातील दीड लाखापर्यंतचे कर्ज असलेल्या ९० हजार शेतकऱ्यांचे शंभर टक्के म्हणजेच ६२५ कोटी १८ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांनाही २५ हजार किंवा २५ टक्के मदत मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात जून २0१६ अखेर दीड लाखावरील शेती, शेती पुरक मध्यम मुदतीचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख १० हजार आहे. त्यांचे सुमारे ९२५ कोटींचे कर्ज थकीत आहे. जिल्हा बॅँक व जिल्ह्यातील १४ राष्ट्रीयीकृत बॅँकांमधील हे थकीत शेतकरी कर्जदार आहेत. यातील ९० हजार ४१९ शेतकऱ्यांचे दीड लाखापर्यंतचे ६२५ कोटी १८ लाखांचे थकीत कर्ज आहे. ते शंभर टक्के माफ होणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होणार आहे. (दीड लाखावरील २0 हजार शेतकऱ्यांच्या कर्जसवलतीचा आकडा ३८४ कोटींवर आहे. त्यामुळे एकूण कर्जमाफी ९२५ कोटींच्या घरात जाते.)३० हजार शेतकऱ्यांचे थकीत कर्ज दीड लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना दीड लाखापर्यंचे कर्ज माफ होईल, पण उरलेले कर्ज थकीत राहणार असल्याने त्यांचा सात-बारा कोरा होणार नाही. जिल्ह्यात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख ४८ हजार २१२ आहे. या शेतकऱ्यांनी २0१५-१६ मध्ये शेती व शेतीपूरक मध्यम मुदतीच्या ८९९ कोटींच्या कर्जाची परतफेड केली आहे. या शेतकऱ्यांना २५ हजार किंवा २५ टक्के मदतीचा लाभ मिळणार आहे.दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळून पुन्हा सधनतेकडे वाटचाल करण्यास शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मदत मिळणार आहे. - पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप