शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

इचलकरंजीत दुसऱ्या लाटेतील मृत्यूसंख्या शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:25 IST

तपासणी, सूचना, बैठका सुरू मात्र पदरी अपयशच अतुल आंबी लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : देशातील सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजी ...

तपासणी, सूचना, बैठका सुरू मात्र पदरी अपयशच

अतुल आंबी

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : देशातील सर्वाधिक मृत्यूदर इचलकरंजी शहराचा आहे. याकडे प्रशासन खरोखरच गांभीर्याने बघत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. दुसऱ्या लाटेत पहिल्या तीन महिन्यातच मृत्यूचा आकडा शंभरी पार गेला. मृत्यूदर कमी करण्याबाबत टास्क फोर्स कडून तपासणी, सूचना, नेत्यांच्या बैठका व प्रशासनाकडून धडपड सुरू असल्याचा आव आणला गेला. परंतु प्रत्यक्षात मृत्यूदर कमी करण्यात अद्याप तरी अपयशच आले आहे.

पहिल्या लाटेत सहा महिन्यात १९४ जणांचे मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत पहिल्या तीन महिन्यातच १०० जणांचे मृत्यू झाले. यामध्ये ३० ते ५० या वयोगटातील २४ लोकांचाही समावेश आहे. त्यामुळे सध्या पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांचे संपर्क शोधणे सध्या कागदोपत्री सुरू आहे, असे दिसते. कारण जे नगरपालिका प्रशासनाला शोधून सापडत नाहीत, ते आता रस्त्यावर सापडत आहेत. सहज मॉर्निंग वॉक करणारे दोन दिवसांत ५ पॉझिटिव्ह आढळले. रस्त्यावर विनाकारण फिरणारे तपासले तर त्यात ही ५ पॉझिटिव्ह सापडले. जर नियमानुसार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग झाले आहे, तर मग हे पॉझिटिव्ह आले कोठून?

मृत्यूदर तर इतका वाढला आहे की, तो संशोधनाचा विषय बनला आहे. वेळीच उपचारासाठी दाखल न होणे हे त्यातील प्रमुख कारण आहे. त्यानंतर त्या रुग्णाला योग्य उपचार केले जातात का? वागणूक कशी दिली जाते? आजूबाजूला असलेले रुग्ण मृत्युमुखी पडले तर त्यातून निर्माण झालेल्या भयाला रोखण्यासाठी काही उपाय करता येतील का? योग्य उपचार व रुग्णांची काळजी घेण्यासाठी आवश्यक स्टाफ आहे का, याबाबत कोणतीच सुधारणा होताना दिसत नाही.

केवळ चर्चा, बैठका व कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्यात सर्व घटक गुंतलेले दिसतात. कोणाशी कोणाला देणेघेणे नाही. जे जबाबदारीने करत आहेत, त्यांची ताकद अशा बेजबाबदार व्यक्तींपुढे किती चालणार? त्यामुळे तेही हतबल झाल्याचे दिसत आहे.

कोविड केंद्रात साधी नियमित लागणारी औषधे ही उपलब्ध नाहीत. हा रोग काय नागरिकांनी आणला का? तो बळावण्यात शासनाचा ही बेजबाबदारपणा तितकाच कारणीभूत आहे. मग आता घ्या की जबाबदारी अशी लोकभावना निर्माण होत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच गांभीर्याने पाहावे ; अन्यथा पुढे याहूनही वाईट परिस्थिती निर्माण होईल.

चौकट

लसीकरणाच्या मागणीचे स्टेट्स

शहरात मृत्यूदर जास्त आहे. तसेच लोकसंख्या, क्षेत्रफळ याचा विचार करून प्रशासनाने ताबडतोब १८ वर्षांवरील लसीकरणास स्वतंत्रपणे सुरूवात करावी, अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत सोशल मीडियावरून संदेश पसरवून स्टेट्स, डीपी ठेवले जाते? आहेत.

प्रतिक्रिया

मृत्यूदर कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाला तत्काळ रुग्णालयात पोहचविणे सुरू आहे. तसेच रुग्णांचे संपर्क शोधून त्यांची तपासणी केली जाते आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार काम सुरू असून, नागरिकांनीही वेळेत उपचारासाठी दाखल व्हावे. डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य अधिकारी

उपाययोजना

आयजीएम रुग्णालयात रुग्णांना मानसिक धैर्य देण्यासाठी सेवाभारती केंद्रातील पद्धतीनुसार समुपदेशन व योग प्राणायाम देण्यासाठी सामाजिक संस्थांना सोबत घेऊन लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाने उपक्रम राबवणे.

वॉर्डमध्ये आजूबाजूचे रुग्ण मृत झाल्यास त्याची मनात निर्माण होणारी भीती कमी करण्यासाठी दोन बेडच्या मध्ये पडदे लावणे.

रुग्णांच्या प्रकृतीत होणाऱ्या बदलानुसार तत्काळ उपचारात बदल करणे व रुग्णाला मानसिक आधार देणे, यासाठी आवश्यक स्टाफची नियुक्ती करणे.

वेळेत रुग्ण दाखल होण्यासाठी खासगी रुग्णालयांना सक्त सूचना देणे. त्यांच्याकडून प्राथमिक उपचारात वाया जाणारा वेळ वाचवणे.

फोटो ओळी

२००५२०२१-आयसीएच-०३ १८ वर्षांवरील लसीकरण करा, अशा मागणीचे स्टेट्स सोशल मीडियावर ठेवले जाते आहेत.