शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
5
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
6
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
7
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
8
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
9
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
10
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
11
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
12
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
13
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
14
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
15
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
16
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
17
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
18
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
20
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली

मृत्यूचा आकडा कमी येईना; रूग्णही वाढताहेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:27 IST

कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त आणि मृतांच्या आकड्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत नवे ...

कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त आणि मृतांच्या आकड्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत नवे ८२१ कोरोनाचे रुग्ण सापडले असून, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर जिल्ह्यांतील सहाजणांचा समावेश आहे. शासनाने आता जिल्हा आणि तालुकाबंदी केल्यामुळे याचे परिणाम दिसण्यासाठी आणखी १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोल्हापूर शहरामध्ये २९२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, बुधवार (दि. २१) पेक्षा नगरपालिका क्षेत्रात कमी रुग्ण आढळले आहेत. या ठिकाणी ७३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. करवीर तालुक्यात १३४ रुग्ण आढळले असून, इतर जिल्ह्यातील ६४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये १९०९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २५७२ जणांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले आहेत. १४७० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ५५१८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

चौकट

सर्वाधिक मृत इतर जिल्ह्यांतील

कोल्हापूर

बोंद्रेनगर येथील ६२ वर्षीय महिला, शास्त्रीनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, मंगेशकरनगर येथील ५२ वर्षीय पुरुष

इचलकरंजी

बावने गल्ली येथील ७५ वर्षीय महिला आणि ३२ वर्षीय महिला

हातकणंगले

नवे पारगाव येथील ५५ वर्षीय पुरुष, साजणी येथील ८० वर्षीय पुरुष, रुई येथील ६५ वर्षीय महिला, हुपरी येथील ५० वर्षीय महिला.

करवीर

चिंचवडे येथील ६६ वर्षीय पुरुष, वळिवडे येथील ७५ वर्षीय महिला, उचगाव येथील ७० वर्षीय पुरुष.

आजरा

किणे येथील ७५ वर्षीय पुरुष

शाहूवाडी

चरण येथील ६५ वर्षीय महिला, आक्कोली येथील ५५ वर्षीय महिला.

कागल

कागल येथील ५५ वर्षीय महिला.

राधानगरी

राशिवडे येथील ६५ वर्षीय पुरुष.

शिरोळ

जांभळी येथील ३० वर्षीय पुरुष, शिवाजी चौक टाकवडे येथील ८७ वर्षीय पुरुष.

चंदगड

शिंदी येथील ७२ वर्षीय पुरुष.

इतर जिल्हे

कुर्ला वेस्ट येथील ७२ वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील येथील ५१ वर्षीय पुरुष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील येडगाव येथील ७० वर्षीय पुरुष, फलटण येथील ७० वर्षीय पुरुष, पुरळ सिंधुदुर्ग येथील ७२ वर्षीय पुरुष, वाळवा तालुक्यातील वाशी येथील ७० वर्षीय महिला.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांचा तो निर्णय योग्यच होता

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ६ एप्रिल २०२१ रोजी एका आदेशानुसार अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या किंवा कोल्हापूर जिल्हाअंतर्गत प्रवास करणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक केला होता; परंतु कोणी दबाव टाकला माहीत नाही; पण दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश मागे घेतला. परिणामी आता कोरोना रुग्णांची कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या वाढतच निघाली आहे. अखेर प्रशासनालाच जिल्हाबंदीचा निर्णय घ्यावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांना हाच निर्णय आधी अमलात आणला गेला असता तर रुग्णांची संख्या आटोक्यात राहिली असती, असे वैद्यकीय वर्तुळातून सांगण्यात येते.