शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

मृत्यूचा आकडा कमी येईना; रूग्णही वाढताहेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:27 IST

कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त आणि मृतांच्या आकड्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत नवे ...

कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त आणि मृतांच्या आकड्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत नवे ८२१ कोरोनाचे रुग्ण सापडले असून, २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर जिल्ह्यांतील सहाजणांचा समावेश आहे. शासनाने आता जिल्हा आणि तालुकाबंदी केल्यामुळे याचे परिणाम दिसण्यासाठी आणखी १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोल्हापूर शहरामध्ये २९२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून, बुधवार (दि. २१) पेक्षा नगरपालिका क्षेत्रात कमी रुग्ण आढळले आहेत. या ठिकाणी ७३ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. करवीर तालुक्यात १३४ रुग्ण आढळले असून, इतर जिल्ह्यातील ६४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

गेल्या २४ तासांमध्ये १९०९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, २५७२ जणांचे स्राव तपासणीसाठी देण्यात आले आहेत. १४७० जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून, सध्या ५५१८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

चौकट

सर्वाधिक मृत इतर जिल्ह्यांतील

कोल्हापूर

बोंद्रेनगर येथील ६२ वर्षीय महिला, शास्त्रीनगर येथील ७२ वर्षीय पुरुष, मंगेशकरनगर येथील ५२ वर्षीय पुरुष

इचलकरंजी

बावने गल्ली येथील ७५ वर्षीय महिला आणि ३२ वर्षीय महिला

हातकणंगले

नवे पारगाव येथील ५५ वर्षीय पुरुष, साजणी येथील ८० वर्षीय पुरुष, रुई येथील ६५ वर्षीय महिला, हुपरी येथील ५० वर्षीय महिला.

करवीर

चिंचवडे येथील ६६ वर्षीय पुरुष, वळिवडे येथील ७५ वर्षीय महिला, उचगाव येथील ७० वर्षीय पुरुष.

आजरा

किणे येथील ७५ वर्षीय पुरुष

शाहूवाडी

चरण येथील ६५ वर्षीय महिला, आक्कोली येथील ५५ वर्षीय महिला.

कागल

कागल येथील ५५ वर्षीय महिला.

राधानगरी

राशिवडे येथील ६५ वर्षीय पुरुष.

शिरोळ

जांभळी येथील ३० वर्षीय पुरुष, शिवाजी चौक टाकवडे येथील ८७ वर्षीय पुरुष.

चंदगड

शिंदी येथील ७२ वर्षीय पुरुष.

इतर जिल्हे

कुर्ला वेस्ट येथील ७२ वर्षीय महिला, खंडाळा तालुक्यातील येथील ५१ वर्षीय पुरुष, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील येडगाव येथील ७० वर्षीय पुरुष, फलटण येथील ७० वर्षीय पुरुष, पुरळ सिंधुदुर्ग येथील ७२ वर्षीय पुरुष, वाळवा तालुक्यातील वाशी येथील ७० वर्षीय महिला.

चौकट

जिल्हाधिकाऱ्यांचा तो निर्णय योग्यच होता

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ६ एप्रिल २०२१ रोजी एका आदेशानुसार अन्य जिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या किंवा कोल्हापूर जिल्हाअंतर्गत प्रवास करणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल बंधनकारक केला होता; परंतु कोणी दबाव टाकला माहीत नाही; पण दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश मागे घेतला. परिणामी आता कोरोना रुग्णांची कोल्हापूर जिल्ह्यातील संख्या वाढतच निघाली आहे. अखेर प्रशासनालाच जिल्हाबंदीचा निर्णय घ्यावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांना हाच निर्णय आधी अमलात आणला गेला असता तर रुग्णांची संख्या आटोक्यात राहिली असती, असे वैद्यकीय वर्तुळातून सांगण्यात येते.