शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हल्ल्यातील जखमी गुरसाळेचा मृत्यू

By admin | Updated: March 22, 2015 01:12 IST

इचलकरंजीचे गँगवॉर : खुनाचा गुन्हा दाखल करणार

इचलकरंजी : पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू ऊर्फ राजशील सत्यवान गुरसाळे (वय ३५, रा. शाहूनगर, चंदूर) याचा कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी दुपारी मृत्यू झाला. या हल्ल्याप्रकरणी अटक केलेले महेश भाकरे, राहुल उबाळे, नितीन बुरांडे व रियाज शेख हे चौघेजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या चौघांवर शिवाजीनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करणार आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी, शाहूनगर गल्ली नं. १२ येथील सराईत गुन्हेगार राजशील गुरसाळे हा हॉटेल बंद करून घरासमोर थांबला असताना शुक्रवारी (दि. १३) त्याच्यावर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महेश भाकरे, राहुल उबाळे, नितीन बुरांडे व रियाज शेख यांनी राजशील याच्यावर सशस्त्र हल्ला चढविला. या चौघांनी लाठ्या, काठ्या, लोखंडी सळ्या, मागाचे मार व दगड, आदींचा वापर करत गुरसाळे याला गंभीर जखमी केले होते. यावेळी राजशील याची पत्नी राजलक्ष्मी ही घराबाहेर आली. हल्लेखोरांनी तिच्यावरही हल्ला केला होता. राजशील गंभीर जखमी झाल्याने व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. गत नऊ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी गुरसाळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हल्ल्याप्रकरणी उबाळे, बुरांडे, भाकरे व शेख या चौघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली होती. (प्रतिनिधी)