शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

अंत्यविधीसाठी दाखल्याची सक्ती नव्हे मरणयातना!, कुटुंब प्रमुखाची माहिती ग्राह्य धरण्याची तरतूद

By भीमगोंड देसाई | Updated: December 15, 2023 14:02 IST

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : जन्म, मृत्यू नोंदणी कायद्यानुसार एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या माहितीनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक असताना ...

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जन्म, मृत्यू नोंदणी कायद्यानुसार एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या माहितीनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक असताना बेकायदेशीरपणे महापालिका आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दाखल्याची सक्ती करत आहे. परिणामी वैद्यकीय दाखला मिळेपर्यंत मृतदेह तासनतास घरीच ठेवावा लागत आहे. यामध्ये दाखला मिळवण्याच्या व्यवस्थेबद्दल पुरेसे ज्ञान नसणाऱ्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे. त्यांना नाहक कोणाकडे तरी जाऊन दाखल्यासाठी याचना करावी लागत आहे.

माणसाचे कायदेशीर आयुष्य निश्चित करण्यासाठी जन्म आणि मृत्यू नोंद अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी कायदा आहे. या कायद्यानुसार या नोंदी करणे बंधनकारक आहे. कायद्यातील तरतुदीनुसार घरी मृत्यू झाल्यास कुटुंब प्रमुखांनी मयताची माहिती दिल्यानंतर अंत्यविधी आणि मृत्यू नोंद करणे आवश्यक आहे.मात्र येथील महापालिका आरोग्य प्रशासन ज्यांच्या घरी मयत झाले आहेत त्यांच्या नातेवाइकांनाच वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला आणा, अन्यथा अंत्यसंस्कार करता येणार नाही, अशी नियमबाह्य आडकाठी लावत आहे. अशीच कार्यपद्धती राबवावी, असे कोठेही कायद्यात नाही, तरी महापालिका प्रशासन नातेवाइकांना वेठीस धरत असल्याचे समोर आले आहे.कायद्यातील पळवाट शोधून काही जण मालमत्ता व इतर कारणांसाठी जिवंत असणारे व्यक्ती मयत दाखवतील, घरात घातपाताने मयत होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासन सरसकट सर्वांनाच घरी मयत झाली तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला आणा, अन्यथा तुम्हाला अंत्यसंस्कार करता येणार नाही, असा स्वयंघोषित नियम लावत आहे. परिणामी दाखला मिळाला नाही तर अंत्यसंस्कार रखडत आहे. याकडे लक्ष वेधून महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

दवाखान्यात मृत्यू झाल्यास दाखला मिळतो..दवाखान्यात मृत्यू झाल्यास किंवा शवविच्छेदन झाल्यास मृत्यूचा दाखला सहजपणे मिळतो. पण घरी मृत्यू झाल्यास दाखल्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. शोध घेऊन दाखला मिळवावा, अशी कायद्यात कोठेही म्हटलेले नसताना महापालिका अशी का सक्ती करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मृत्यू प्रमाणपत्राचा उपयोग काय?वडिलोपार्जित हक्क आणि संपत्ती या विषयाचा निर्णय घेणे, विम्याच्या दाव्यासाठी, कुटुंबाचे निवृत्तिवेतन मिळण्यासाठी मृत्यू दाखला प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. यामुळे मृत्यू नोंद २१ दिवसांच्या आत करून घ्यावी लागते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर