शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अंत्यविधीसाठी दाखल्याची सक्ती नव्हे मरणयातना!, कुटुंब प्रमुखाची माहिती ग्राह्य धरण्याची तरतूद

By भीमगोंड देसाई | Updated: December 15, 2023 14:02 IST

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : जन्म, मृत्यू नोंदणी कायद्यानुसार एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या माहितीनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक असताना ...

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : जन्म, मृत्यू नोंदणी कायद्यानुसार एखाद्याचा मृत्यू घरी झाल्यास कुटुंब प्रमुखाच्या माहितीनुसार अंत्यविधी करणे बंधनकारक असताना बेकायदेशीरपणे महापालिका आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकाऱ्याच्या दाखल्याची सक्ती करत आहे. परिणामी वैद्यकीय दाखला मिळेपर्यंत मृतदेह तासनतास घरीच ठेवावा लागत आहे. यामध्ये दाखला मिळवण्याच्या व्यवस्थेबद्दल पुरेसे ज्ञान नसणाऱ्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे. त्यांना नाहक कोणाकडे तरी जाऊन दाखल्यासाठी याचना करावी लागत आहे.

माणसाचे कायदेशीर आयुष्य निश्चित करण्यासाठी जन्म आणि मृत्यू नोंद अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी कायदा आहे. या कायद्यानुसार या नोंदी करणे बंधनकारक आहे. कायद्यातील तरतुदीनुसार घरी मृत्यू झाल्यास कुटुंब प्रमुखांनी मयताची माहिती दिल्यानंतर अंत्यविधी आणि मृत्यू नोंद करणे आवश्यक आहे.मात्र येथील महापालिका आरोग्य प्रशासन ज्यांच्या घरी मयत झाले आहेत त्यांच्या नातेवाइकांनाच वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला आणा, अन्यथा अंत्यसंस्कार करता येणार नाही, अशी नियमबाह्य आडकाठी लावत आहे. अशीच कार्यपद्धती राबवावी, असे कोठेही कायद्यात नाही, तरी महापालिका प्रशासन नातेवाइकांना वेठीस धरत असल्याचे समोर आले आहे.कायद्यातील पळवाट शोधून काही जण मालमत्ता व इतर कारणांसाठी जिवंत असणारे व्यक्ती मयत दाखवतील, घरात घातपाताने मयत होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून महापालिका प्रशासन सरसकट सर्वांनाच घरी मयत झाली तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा दाखला आणा, अन्यथा तुम्हाला अंत्यसंस्कार करता येणार नाही, असा स्वयंघोषित नियम लावत आहे. परिणामी दाखला मिळाला नाही तर अंत्यसंस्कार रखडत आहे. याकडे लक्ष वेधून महापालिका प्रशासन गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

दवाखान्यात मृत्यू झाल्यास दाखला मिळतो..दवाखान्यात मृत्यू झाल्यास किंवा शवविच्छेदन झाल्यास मृत्यूचा दाखला सहजपणे मिळतो. पण घरी मृत्यू झाल्यास दाखल्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे. शोध घेऊन दाखला मिळवावा, अशी कायद्यात कोठेही म्हटलेले नसताना महापालिका अशी का सक्ती करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मृत्यू प्रमाणपत्राचा उपयोग काय?वडिलोपार्जित हक्क आणि संपत्ती या विषयाचा निर्णय घेणे, विम्याच्या दाव्यासाठी, कुटुंबाचे निवृत्तिवेतन मिळण्यासाठी मृत्यू दाखला प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. यामुळे मृत्यू नोंद २१ दिवसांच्या आत करून घ्यावी लागते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर