शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पंचगंगा नदीपात्रात मृत माशांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 23:42 IST

कुरुंदवाड : येथील पंचगंगा नदीला पुन्हा दूषित पाणी आले आहे. काळेकुट्ट पाण्यामुळे पाण्याला उग्र वास सुटला असून, नदीपात्रात मृत ...

कुरुंदवाड : येथील पंचगंगा नदीला पुन्हा दूषित पाणी आले आहे. काळेकुट्ट पाण्यामुळे पाण्याला उग्र वास सुटला असून, नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. एकीकडे पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी आमदार उल्हासपाटील यांचा पंचगंगा नदी संगम ते उगम जागर पदयात्रा सुरू असताना याप्रश्नाकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी जागर आंदोलन काळातच नदी प्रदूषणाचा प्रश्न तीव्र झाल्याने प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.पंचगंगा नदी शिरोळ-हातकणंगले तालुक्याला वरदान ठरली आहे. मात्र, या नदीमध्ये कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंत शहरातील सांडपाणी व औद्योगिकीकरणाचे रसायनयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पंचगंगा नदी ही गटारगंगा बनली आहे. नदी प्रदूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसत आहे.प्रदूषित पाण्यामुळे शेतीबरोबर माणसांच्या आरोग्यावरही विपरीतपरिणाम होत असल्याने गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पंचगंगा काठावरीलविविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी प्रदूषणविरोधी आंदोलन केले. मात्र, आंदोलकांचा आंदोलनातीलसातत्याचा अभाव, राजकीय पाठबळाचा अभाव, प्रदूषण नियंत्रण मंडळांचे औद्योगिक कारखान्याशी असलेले लागेबांधे, आदी कारणामुळेप्रदूषण मंडळाच्या नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जुजबी कारवाईमुळेहा नदी प्रदूषण प्रश्न दिवसेंदिवस वाढतच गेला.नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरुपी सुटावा. त्यासाठी ठोस निर्णय व अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमदार उल्हास पाटील यांनी शुक्रवारपासून सोमवारअखेर कुरुंदवाड येथीलपंचगंगेचा संगम ते प्रयाग चिखली येथील उगमापर्यंत जागर पदयात्रा काढली आहे. कृषीभूषण बुधाजीराव मुळीक, खासदार उदयनराजे भोसले यांच्या सहभागाने पंचगंगा काठच्या नागरिकांच्या प्रतिसादामुळे पदयात्रा गाजत आहेत. या प्रश्नाला राजकीय ताकद लागल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न सुटण्याची शक्यता नागरिकांत मानली जात असताना आंदोलन काळात पंचगंगा पुन्हा दूषित पाण्याने ग्रासली आहे.