शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाडमध्ये तंटामुक्त समिती निवडीतून एकीचे दर्शन

By admin | Updated: October 9, 2015 00:38 IST

राजकारण बाजूला : अध्यक्षपदाची निवड सलग नऊवेळा बिनविरोध करण्यात यश

गणपती कोळी--कुरुंदवाड दत्तवाड (ता. शिरोळ) येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बंडा माने यांची सलग नवव्यांदा बिनविरोध निवड झाली. एकीकडे अध्यक्ष निवडीवरून अनेक गावांत वाद निर्माण होत असतात. तसेच नुकत्याच झालेल्या गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय ईर्ष्या पेटलेली असताना विरोधी आघाडीतील असूनही माने यांना पुन्हा अध्यक्षपदावर नियुक्त केल्याने विकासकामांत नेतेमंडळी व ग्रामस्थांचे राजकारणविरहित एकीचे दर्शन झाले आहे. हा आदर्श इतर गावांनी घेण्यासारखा आहे.गावात राजकीय ईर्ष्या मोठी. गावात अनेक गट-तट राजकारणात सक्रिय आहेत. तसेच जवळच कर्नाटकचा सीमाभाग असल्याने गुन्हेगारीचे प्रमाणही जास्त आहे, अशा परिस्थितीतही राज्यात आदर्शवत ठरेल, अशी गावातील तंटामुक्त समिती कार्यरत आहे. बंडा माने हे राष्ट्रीय कॉँग्रेसचे कार्यकर्ते असून, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द गाजविली आहे. गावातील ज्येष्ठ व न्यायिक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची प्रतिमा असल्याने २००४ मध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यावेळेपासून आजतागायत प्रत्येकवर्षी ग्रामसभेत ग्रामस्थांबरोबर सर्वच राजकीय मंडळींनी त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याने सलग नऊ वर्षे अध्यक्षपदाची धुरा ते सांभाळत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत माने व ‘स्वाभिमानी’चे आदिनाथ हेमगिरे यांच्या नेतृत्वाखाली दत्तवाड ग्राम विकास आघाडी विरोधात भवानीसिंह घोरपडे (सरकार) व संताजी घोरपडे सरकार यांच्या राजर्षी शाहू पॅनेल यांच्यात लढत होऊन सरकारचे पॅनेल विजयी झाले. ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापनेसाठी दोन्ही आघाड्यांच्या नेतेमंडळींची राजकीय ईर्ष्या शिगेला पोहोचली होती. सरकार गटाची सत्ता आल्याने तंटामुक्त अध्यक्ष बदलतील, अशी शक्यता होती. मात्र, दोन्ही सरकारांनी सर्वच गटांच्या नेतेमंडळींची बैठक घेऊन व राजकारण बाजूला ठेवून या पदावर पुन्हा माने यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि राजकारणविरहित विकासकामे करण्यासाठी झालेल्या एकीचे दर्शन राज्यातच आदर्शवत ठरले आहे.योजनाच वादाला कारणीभूतगावातील तंटे गावातच मिटावेत व पोलीस, न्यायालयावरील कामाचा ताण कमी होऊन गावात शांतता नांदावी, नागरिकांत समजूतदारपणा वाढावा, या उद्देशाने सुमारे नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्तसमिती स्थापन केली. प्रारंभीच्या काळात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यानंतर तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीवरून अनेक गावांत वाद-विवादांबरोबर हाणामारीही होऊ लागली. त्यामुळे या निवडीच्या राजकारणावरून अनेक गावांत राजकीय कुरघोडीतून योजनाच वादाला कारणीभूत ठरू लागली.