शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

‘दत्त दालमिया’च्या कामगारांचा वनवास संपला : ‘त्या’ १३७ कामगारांच्या मागणीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:30 IST

पोर्ले तर्फ ठाणे : त्यांनी न्यायहक्कांसाठी कोणत्याही दबावाची तमा बाळगली नाही. ज्या-ज्या वेळी अन्याय झाला

ठळक मुद्दे२७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लढ्याला यश; नेमणूक पत्रे प्रदान दालमिया कंपनीचा सकारात्मक निर्णय व कामगारांच्या एकजुटीमुळे कामगारांचा जटील प्रश्न

सरदार चौगुले।पोर्ले तर्फ ठाणे : त्यांनी न्यायहक्कांसाठी कोणत्याही दबावाची तमा बाळगली नाही. ज्या-ज्या वेळी अन्याय झाला, त्या-त्या वेळेस त्यांनी संघर्ष केला; पण धीर सोडला नाही. आज नाही तर उद्या आमचा हक्क आम्हाला नक्की मिळणार, या आशेतून मिळविला; पण थोडा उशीर का होईना? दालमिया कंपनीने ‘त्या’ १३७ कामगारांच्या मागणीचा सन्मान केलाच. ही व्यथा आहे, पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील दत्त साखर कारखान्यातील २७ वर्षे नेमणूक पत्राची प्रतीक्षा करणाºया रोजंदारी कामगारांची. प्रत्येकवेळी न्यायहक्कांसाठी बिरदेवाच्या माळावर संघर्षाची मशाल पेटविणाºया ‘त्या’ कामगारांसाठी हा सुवर्णक्षण होता.

‘दत्त’च्या कामगारांनी अनेक हंगाम यशस्वी केले. कामगारांच्या एकजुटीतील धोरणांत्मक निर्णयामुळे त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण झाला. हा इथल्या कामगारांच्या एकीचा विजय आहे. कारखान्याच्या इतिहासात ज्या काही घडामोडी घडल्या, त्यात कामगारांची भूमिका निर्णायक ठरली आहे. म्हणूनच १३७ कामगारांना दालमिया कंपनीने नेमणूक पत्र देऊन जो सन्मान केला, ते एकीचेच फलित आहे. कारखान्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे २३ वर्षे सन्मानाची प्रतीक्षा करणाºया कामगारांना सन्मान मिळाला, तो दालमिया कंपनीने राजकारणाला मूठमाती दिल्यामुळेच. त्यामुळे कित्येक वर्षांच्या भिजत घोंगड्याला ‘दालमिया’च्या सकारात्मक निर्णयाची ऊब मिळाली.कारखान्याच्या कामगारांनी अन्यायावेळी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अन्यायाला वाचा फोडली. अनेक संकटांशी सामना करीत कारखान्याच्या गळीत हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते; पण दत्तच्या कामगारांनी धीराने तोंड देत त्यावर मात केली. त्यामुळे कारखान्यावरील बिरदेवाच्या माळावर अफवांची कित्येक वादळे उठली तरी कारखान्याशी ऋणानुबंधाने जोडलेला कामगार कधीही डगमगला नाही.१९८९ मध्ये वेज बोर्डाच्या संधीतून सुटलेल्या व नंतरच्या काळात सत्तेच्या कारभारात ठरावीक भरती झाली; परंतु त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आधोरेखित होते. त्यानंतर नुसती आश्वासनं, उपासमारी व आर्थिक कोंडमाºयामुळे दिवाळखोरीसारखी नामुष्की पत्करावी लागली. २००६ मध्ये सहा वर्षांच्या भाडेतत्त्वाच्या दरम्यान रोजंदारी कामगारांची काही डाळ शिजलीच नाही.५२०१२ मध्ये दालमिया कंपनीने कोटीची उड्डाणे घेत दत्त कारखाना खरेदी केला. त्यावेळी कामगार संघटनेशी झालेल्या करारानुसार २७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कामगारांच्या लढ्याला यश आले. उशीर का होईना; पण दालमिया कंपनीने त्या कामगारांना न्याय दिल्याने रोजंदारीने कामगाराच्या काळवंडलेल्या चेहºयावर साखरेची चकाकी आली. दालमिया कंपनीचा सकारात्मक निर्णय व कामगारांच्या एकजुटीमुळे कामगारांचा जटील प्रश्न सुटल्याने कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत कंपनीकडून कामगार नक्कीच आशावादी आहेत.