शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘दत्त दालमिया’च्या कामगारांचा वनवास संपला : ‘त्या’ १३७ कामगारांच्या मागणीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:30 IST

पोर्ले तर्फ ठाणे : त्यांनी न्यायहक्कांसाठी कोणत्याही दबावाची तमा बाळगली नाही. ज्या-ज्या वेळी अन्याय झाला

ठळक मुद्दे२७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लढ्याला यश; नेमणूक पत्रे प्रदान दालमिया कंपनीचा सकारात्मक निर्णय व कामगारांच्या एकजुटीमुळे कामगारांचा जटील प्रश्न

सरदार चौगुले।पोर्ले तर्फ ठाणे : त्यांनी न्यायहक्कांसाठी कोणत्याही दबावाची तमा बाळगली नाही. ज्या-ज्या वेळी अन्याय झाला, त्या-त्या वेळेस त्यांनी संघर्ष केला; पण धीर सोडला नाही. आज नाही तर उद्या आमचा हक्क आम्हाला नक्की मिळणार, या आशेतून मिळविला; पण थोडा उशीर का होईना? दालमिया कंपनीने ‘त्या’ १३७ कामगारांच्या मागणीचा सन्मान केलाच. ही व्यथा आहे, पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले-पोर्ले येथील दत्त साखर कारखान्यातील २७ वर्षे नेमणूक पत्राची प्रतीक्षा करणाºया रोजंदारी कामगारांची. प्रत्येकवेळी न्यायहक्कांसाठी बिरदेवाच्या माळावर संघर्षाची मशाल पेटविणाºया ‘त्या’ कामगारांसाठी हा सुवर्णक्षण होता.

‘दत्त’च्या कामगारांनी अनेक हंगाम यशस्वी केले. कामगारांच्या एकजुटीतील धोरणांत्मक निर्णयामुळे त्यांच्या जीवनात गोडवा निर्माण झाला. हा इथल्या कामगारांच्या एकीचा विजय आहे. कारखान्याच्या इतिहासात ज्या काही घडामोडी घडल्या, त्यात कामगारांची भूमिका निर्णायक ठरली आहे. म्हणूनच १३७ कामगारांना दालमिया कंपनीने नेमणूक पत्र देऊन जो सन्मान केला, ते एकीचेच फलित आहे. कारखान्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे २३ वर्षे सन्मानाची प्रतीक्षा करणाºया कामगारांना सन्मान मिळाला, तो दालमिया कंपनीने राजकारणाला मूठमाती दिल्यामुळेच. त्यामुळे कित्येक वर्षांच्या भिजत घोंगड्याला ‘दालमिया’च्या सकारात्मक निर्णयाची ऊब मिळाली.कारखान्याच्या कामगारांनी अन्यायावेळी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अन्यायाला वाचा फोडली. अनेक संकटांशी सामना करीत कारखान्याच्या गळीत हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते; पण दत्तच्या कामगारांनी धीराने तोंड देत त्यावर मात केली. त्यामुळे कारखान्यावरील बिरदेवाच्या माळावर अफवांची कित्येक वादळे उठली तरी कारखान्याशी ऋणानुबंधाने जोडलेला कामगार कधीही डगमगला नाही.१९८९ मध्ये वेज बोर्डाच्या संधीतून सुटलेल्या व नंतरच्या काळात सत्तेच्या कारभारात ठरावीक भरती झाली; परंतु त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आधोरेखित होते. त्यानंतर नुसती आश्वासनं, उपासमारी व आर्थिक कोंडमाºयामुळे दिवाळखोरीसारखी नामुष्की पत्करावी लागली. २००६ मध्ये सहा वर्षांच्या भाडेतत्त्वाच्या दरम्यान रोजंदारी कामगारांची काही डाळ शिजलीच नाही.५२०१२ मध्ये दालमिया कंपनीने कोटीची उड्डाणे घेत दत्त कारखाना खरेदी केला. त्यावेळी कामगार संघटनेशी झालेल्या करारानुसार २७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कामगारांच्या लढ्याला यश आले. उशीर का होईना; पण दालमिया कंपनीने त्या कामगारांना न्याय दिल्याने रोजंदारीने कामगाराच्या काळवंडलेल्या चेहºयावर साखरेची चकाकी आली. दालमिया कंपनीचा सकारात्मक निर्णय व कामगारांच्या एकजुटीमुळे कामगारांचा जटील प्रश्न सुटल्याने कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत कंपनीकडून कामगार नक्कीच आशावादी आहेत.