शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगार वेतन करारास तारीख पे तारीख

By admin | Updated: May 25, 2016 23:31 IST

हंगाम संपल्याने साखर कामगारांच्या वेतन कराराला ठेंगा मिळण्याची भीती : त्रिपक्षीय समितीची आज बैठक

प्रकाश पाटील --- कोपार्डे --साखर कामगार वेतन करारासाठी १४ मे रोजी त्रिपक्षीय समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र, यात प्रमुख सदस्यांची गैरहजेरी असल्याने २ जानेवारी २०१६ ला साखर कामगारांनी संपाची हाक देताच हा प्रश्न दोन महिन्यांत सोडविला जाईल, हे दिलेले आश्वासन हवेतच विरते काय? असा प्रश्न साखर कामगारांतून उपस्थित होत आहे. आता आज, गुरुवारी पुन्हा बैठक होणार असून, याकडे राज्यातील दीड लाख साखर कामगारांचे लक्ष लागले आहे.दर पाच वर्षांनी साखर कामगारांचा वेतन करार होतो. एप्रिल २0१४ मध्ये या वेतन कराराची मुदत संपली असून, याला दोन वर्षे उलटली तरी लक्ष दिले गेले नाही म्हणून राज्य साखर कामगार संघटनेने २ जानेवारी २0१६ ला संपाचा इशारा दिला. यावेळी शासन व कारखानदार खडबडून जागे झाले व सध्याच्या परिस्थितीत कारखाने बंद करणे परवडणारे नाही म्हणून संघटनेबरोबर चर्चा करून ९00 रुपये अंतरिम वाढ घ्या व तुमच्या इतर मागण्यांसह वेतनवाढीचा प्रश्न येत्या दोन महिन्यांत निकालात काढू, असे आश्वासन दिले.मात्र, यानंतर वेतन करारासाठी नेमलेल्या त्रिपक्षीय समितीतील कारखानदार, शासन व संघटना यांच्यावरील बैठकीचे आयोजन करून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहिले. तोपर्यंत साखर हंगाम संपल्याने आता संघटनेच्या हातात असणारे संपाचे हत्यार बोथट झाले आहे. मे महिन्यात वेतन कराराच्या पुनर्रचनेबाबत २ व १४ मे ला त्रिपक्षीय समितीच्या बैठका झाल्या असून, यात प्रमुखांचीच अनुपस्थिती राहिल्याने पुन्हा आज, गुरुवारी बैठक होणार आहे. आता या बैठकीकडे राज्यातील साखर कामगारांचे लक्ष लागून राहिले आहे.संघटना युद्धात जिंकली; तहात हरलीहंगाम सुरू असतानाच राज्य साखर कामगार संघटनेने वेतन कराराच्या अंमलबजावणीसाठी २ जानेवारीपासून संपाचा इशारा दिला. यावेळी शासन व कारखानदार खडबडून जागे झाले व ताबडतोब चर्चेला बसले. यावेळी संघटनेने ४0 टक्के वेतनवाढीची अट तरी पूर्ण करा, असे सांगितले. लगेचच कारखानदारांनी १ जानेवारीपासून ९00 रुपये अंतरिम वाढ लागू करतो व दोन महिन्यांत वेतन कराराचा प्रश्न निकालात काढतो, असे आश्वासन दिले. याला संघटना बळी पडली. केवळ चर्चेची गुऱ्हाळे सुरू झाली. आता कारखान्यांचे हंगाम संपल्याने कारखानदारांचा दगडाखालचा हात निघाला असून, वेतन कराराला पुढील हंगामापर्यंत टोलवाटोलवी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संघटना युद्धात जिंकली आणि तहात हरली, असेच झाल्याचे बोलले जात आहे.वेतन कराराची मुदत संपून सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या दरम्यान महागाईने किमान दुप्पट टप्पा गाठला आहे. जाणीवपूर्वक वेतन कराराला विलंब करून साखर कामगारांच्या हक्कांना धक्का द्यावयाचा असा प्रकार आहे. संघटनेने २ जानेवारीत संपाची हाक देताच ९00 रुपये अंतरिम वाढ दिली; पण तीही तब्बल दोन वर्षांनी.- आर. जी. नाळे, साखर कामगारराजकीय हेतूनेच शासनाचे दुर्लक्षराज्यातील सर्व साखर कारखाने राष्ट्रवादी व काँग्रेसच्या ताब्यात आहेत. वेतन कराराच्या समितीमध्येही राष्ट्रवादी व काँग्रेस नेत्यांची वर्णी असून, राज्य साखर कामगार संघटनेचे पदाधिकारीही याच पक्षाचे असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच शासन साखर कामगारांच्या वेतन कराराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.ऊसतोड मजुरांना मजुरीत वाढ; पण साखर कामगारांवर अन्यायहंगामाच्या सुरुवातीला ऊसतोड मजुरांच्या संघटनेने मजुरीसह कमिशनमध्ये वाढ करावी म्हणून कोयता बंद केला. शासनाने याबाबत दखल घेऊन मजुरीत १६ टक्के, तर कमिशनमध्ये १८.५ टक्के वाढ केली. मात्र, दोन वर्षे वेतन कराराची मुदत संपूनही त्यावर तोडगा निघत नाही, याला संघटनांची धरसोड वृत्तीच कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया साखर कामगार व्यक्त करीत आहेत.