शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

धोकादायक इमारती ‘जैसे थे’च

By admin | Updated: June 1, 2015 00:13 IST

ना संख्या वाढली ना धोका टळला : इमारती उतरविण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक

कोल्हापूर : इतर शहरांतील धोकादायक इमारतींची संख्या दरवर्षी वाढत असल्याचे चित्र आहे. मात्र, कोल्हापुुरात गेल्या तीन वर्षांत ९०च्या आसपासच हा आकडा स्थिर आहे. मालक-कूळ वाद व न्यायालयातील प्रकरणात अडकलेल्या इमारतीवगळता इतर इमारती उतरण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराची नेमणूक केल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात जाहीर प्रकटीकरण व जनरल सर्व्हे करून शहरातील धोकादायक इमारती निवडल्या जातात. २०११-१२ मध्ये या सर्व्हेतून ६४ तर २०१२-१३ मध्ये ६९ तर २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये ९० इमारती धोकादायक ठरल्या. या इमारतमालकांना व रहिवाशांना इमारत पाडा किंवा दुरुस्ती करून नवा स्ट्रक्चर आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने केलेल्या या सर्व्हेत शिवाजी पेठ, ताराबाई रोड, महाद्वार रोड, उत्तरेश्वर पेठ, रविवार पेठ, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी, कसबा बावडा येथील ९० इमारती धोकादायक आहेत. गांधी मैदान विभागीय कार्यालय - १८, शिवाजी मार्केट - ३९, राजारामपुरी - २६, ताराराणी मार्केट - ७ अशा विभागवार ९० इमारती धोकादायक ठरविल्या आहेत. इमारत मालकांनी तत्काळ रिस्ट्रक्चर आराखडा सादर करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.शहरातील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधितांना नोटिसा पाठविल्या आहेत. वादातील इमारती वगळता जीवितास धोकादायक ठरणाऱ्या इमारती उतरविण्याची मोहीम महापालिका हाती घेणार आहे. नोटीस पोहोचलेल्या मिळकतधारकांनी तत्काळ रिस्ट्रक्चर आॅडिट करून घ्यावे. - नेत्रदीप सरनोबत (शहर अभियंता, महापालिका)३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचा सर्व्हेमध्ये ७५ टक्के घरगुती वापराच्या इमारती पूर्णत्वाचा दाखला घेत नाहीत. शहरातील १ लाख १५ मिळक तींची पूर्ण माहिती महापालिकेने जमा करण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक इमारतींना फक्त नोटिसीच दिली जाते, प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही, असा आरोप बांधकाम विभागावर होत आहे, त्यामुळे यंदाच्या वर्षी महापालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे. ५० रुपये प्रति चौरस फुटांप्रमाणे पाडलेल्या इमारतींची आकारणी केली जाणार आहे. हे पैसे संबंधित मिळकतधारकांकडून घरफाळ्यातून वसूल केले जाणार आहेत.