शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

नदीकाठाला महापुराचा धोका; शेतजमिनीला कवडीमोलचा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST

पोर्ले तर्फ ठाणे : नदीकाठच्या मळीभागातील जमीन म्हणजे जणू काही तांबडं सोनचं म्हणावे.कसदार आणि पिकाऊ जमीन म्हणूनचं त्याची वेगळी ...

पोर्ले तर्फ ठाणे : नदीकाठच्या मळीभागातील जमीन म्हणजे जणू काही तांबडं सोनचं म्हणावे.कसदार आणि पिकाऊ जमीन म्हणूनचं त्याची वेगळी ओळखं आहे; पण महापुराच्या वाढत्या प्रभावामुळे वर्षानुवर्ष नुकसानीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नदीकाठची शेती नको रे बाबा...म्हणण्याची वेळ संबंधित शेतकऱ्यांवर आली आहे. महापुराचा धोका प्रत्येक वर्षी नदीकाठाला बसत राहिला तर नदीकाठी ऊस पिकं घेणे अवघड बनत आहे. परिणामी भविष्यात मळी भागातील शेतजमिनीचे दर उतरणीला लागलेले असतील.

जोमदार पीक आणि भरघोस उत्पन्नासाठी मळीभागातील जमीन असावी असे म्हटले जाते आणि ते काही खोटे नाही. वैरणीसाठी राखीव असलेला नदीकाठच्या क्षेत्रात चांगल्या ऊस दरामुळे अलीकडे प्रामुख्याने ऊसपीक घेतले जातं आहे. या क्षेत्रातील ऊसाला चांगला उतारा असल्यामुळे त्यास सर्वच गुऱ्हाळघर आणि साखर कारखान्याकडून मोठी मागणी असते. जिल्ह्यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी मळीभागातील शेतीच्या बळावर प्रगती साधली आहे.

अनेक पाणी योजनांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जिरायत शेती मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आली आहे. या शेतीच्या बळावर जिल्ह्यातील शेतकरी प्रगती साधत असल्याने कोल्हापूर जिल्ह्याची ‘सधन जिल्हा’ म्हणून नकाशावर आधोरिखित आहे. उसाच्या जोरावर प्रगतिपथावर झेपावणाऱ्या जिल्ह्यातील शेतीविकासाला तीन वर्षांनी आलेल्या महापुराने 'खो' घातला आहे. २०१९ चा महापुराचा मुक्काम जादा असल्याने उसाचे प्रचंड नुकसान झाले होते तर २०२१ च्या महापुरात मातीमिश्रीत गाळयुक्त पाण्याने बुडीत क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेल्याने कुजून वाया जात आहे. यापूर्वी तीन महापूर चौदा वर्षीच्या फरकाने येणारे महापुराचे भाकित एका वर्ष आड आलेल्या महापुराने फोल ठरविले आहे.त्यामुळे प्रत्येक वर्षी सारखाचं पाऊस लागत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी चाखला आहे. महापुराच्या संकटाने होणारे पिकांचे नुकसान शासनाच्या भरपाईपुढे तोकडे आहे. कारण उत्पादनखर्च आणि मिळणारी भरपाई याचा ताळेबंद लावताना शेतकऱ्यांच्या डोक्यावरची केले उभारत आहे. हेच अर्थिक बाब शेतकऱ्यांसाठी चिंताजनक आहे.

चौकट

वारंवार नुकसानीने जगणं मुश्किल

नदीकाठच्या मळीभागातील शेतीत पिके घेणे अडचणीचे बनले आहे. तीन वर्षांत दोनदा महापुराच्या संकट आल्याने नदीकाठचा शेतकरी नुकसानी गहिवरून जात आहे

.एकेकाळी सोन्याचा भराव मिळणाऱ्या नदीकाठच्या जमिनीचे दर उतरणीला लागले आहे. अशातचं यापुढे वारंवार नुकसान शेतकऱ्याच्या वाट्याला आले, तर जगणेचं मुश्किल होऊन जाणार आहे.

चौकट

पुरामुळे गेलेला ऊस काढून प्रत्येक वर्षी लागण करावी लागते. कमी दिवसात अपेक्षित उंची नसल्यामुळे पुरात बुडलेला ऊस कुजून जातो. ऊस जाण्याने किंवा हुमणी रोगामुळे मळीभागात प्रत्येक वर्षी लागण करावी लागते. मशागत, मुलूखची महाग खते तसेच वर्षभर कष्ट करून ऊस वाढविला जातो; परंतु महापुराच्या धोक्याने हातातोडांशी आलेले ऊस पीक कुजून वाया जातं आहे. प्रत्येक वर्षीच्या संकटाने नदीकाठची शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे ऊस पिकवला तर पुराने वाया जातो. नाही पिकविला तर उपाशी राहावं लागते, अशी अवस्था नदीकाठच्या शेतकऱ्यांची झाली आहे.