शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

‘दान पावलं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 23:40 IST

इंद्रजित देशमुख माउलींनी सांगितलेल्या दैवी गुणांमधील दान हा गुण अंगी असणं हे खूप मोठ्या सामर्थ्याचं लक्षण आहे. कारण दान ...

इंद्रजित देशमुखमाउलींनी सांगितलेल्या दैवी गुणांमधील दान हा गुण अंगी असणं हे खूप मोठ्या सामर्थ्याचं लक्षण आहे. कारण दान करायला अंत:करण खूप विशाल असावं लागतं. अंत:करणाने संकुचित असले की दान करता येत नाही. म्हणजेच अंत:करणाच्या विशालपणाचे मूळ दान या सहसंवेदी व सहजीवी भाविकतेत लपलेलं आहे. या दातृत्वदर्शी भूमिकेतील कायिक योगदानाचा स्वभाव व्यक्त करताना आमचे तुकोबाराय म्हणतात की,‘जे का रंजले गांजले।त्यासी म्हणे जो आपुले।तोचि साधू ओळखावा।देव तेथेचि जाणावा।।’तुकोबारायांनी या अभंगातून व्यक्त केलेल्या या आपले म्हणण्याच्या स्नेहापाठीमागे स्वत:च्या सगळ्या आवेश आणि अभिनिवेष यांना बाजूला सारून निव्वळ आणि निव्वळ दुसऱ्यासाठी योगदानाचं समर्पण करणं अपेक्षित आहे. या समर्पणाद्वारे ज्याने सगळ्यांना आपलं संबोधलं आहे तोच खरा साधू किंवा तोच खरा देव असतो असं महाराजांना म्हणायचं आहे. या आपले म्हणण्यातील प्रामाणिकतेसाठी कोणत्याच साधनाची किंवा संपन्नतेची गरज असत नाही, गरज असते ती फक्त अंगीभूत स्नेहाची आणि त्या स्नेहाच्या पाझरण्याची.औरंगजेबाचा दाराशुको नावाचा एक भाऊ होता. तो खूप मोठा दाता होता. दारात आलेल्या प्रत्येक याचकाचं तो फुल ना फुलाची पाकळी देऊन समाधान करीत होता. ज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे‘जेथे संपत्ती आणि दया।दोन्ही वस्ती आली एकचि ठाया।तेथे जाण धनंजया।विभूती माझी’असं त्यांचं जगणं होतं. आपल्याजवळ नुसती संपत्ती असून उपयोगाचं नाही तर त्या संपत्तीबरोबर दयाही असली पाहिजे आणि त्या संपत्तीचं विनियोजन करताना दयाभूत अंत:करणाने त्यातील काही भाग गरज असणाºया याचकांना दान दिला पाहिजे तरच त्या संपत्तीच्या धारकतेत खरं समाधान नांदू शकतं, अन्यथा नाही असं त्याचं मत होतं. या विचारावर आणि त्याच विचारानुसार आचारावर ठाम असलेल्या दाराशुकोनं सगळ्यांचं भलं चिंतन्यासाठी कधीच कुठल्याच याचकाला आपल्या दारातून मोकळ्या हातानं परत पाठविलं नव्हतं. पण, सत्तापिपासूवृत्तीने भारावलेल्या अनाठायी राजकीय महत्त्वाकांक्षेत सरळमार्गी दाराशुकोला कैदेत जावं लागलं आणि त्यातून त्याला देहदंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. देहदंडाची शिक्षा देण्यासाठी त्याला वधस्तंभाकडे नेलं जात असताना सभोवताली प्रचंड गर्दी आसवे ढाळीत उभी होती. कारण आजवर त्या जनतेने बादशाही साम्राज्यवादाला चिकटून निव्वळ सत्ता आणि सत्ताविस्तार करणारे खूप बादशहा पाहिले होते; पण आपल्या जनतेच्या पायवाटी स्वत:चं हृदय अंथरूण जनतेच्या जीवनवाटेवर सुख पसरू पाहणारा दाराशुकोसारखा अनोखा राजा पाहिला नव्हता. भारतीय विशाल तत्त्वज्ञान आणि त्याच्या उपांगांचा सखोल अभ्यास असणारा दाराशुको मरण आणि मरणाची भीती याबद्दल कधीच बेदखल होऊन आत्मरंगात रंगून गेला होता. आता जगावं असं अजिबात वाटत होतं, पण जगलो असतो म्हणजेच हा देह हयात राहिला असता तर या देहाच्या माध्यमातून अजूनही खूप काही दान करता आलं असतं याचं शल्य मात्र त्याच्या चेहºयावर जाणवत होतं. इतक्यात त्या प्रचंड गर्दीतून कुणीतरी ओरडलं की, ‘ऐ दारा तू सारी उम्र देते आया और आज फकीर बन गया। बोलो आज क्या दोगे हमारे लिये?’ त्या गर्दीतून आलेला तो आवाज ऐकून दाराशुको थोडं थबकला. त्यावेळी कुणाला काही द्यावं असं त्याच्याकडे अजिबात काही नव्हतं. दिला तर देता येईल असा फक्त देह त्याच्याजवळ होता; मात्र तोही या राजसत्तेने देहदंडासाठी ताब्यात घेतला होता. हे सगळं विचित्र वातावरण असताना रक्तात भिनलेली दानत अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जोपासू पाहणाºया दाराशुकोने स्वत:च्या कमरेवर असणारे एकमेव कटीवस्त्र काढलं आणि त्या आवाजाच्या दिशेनं भिरकावलं आणि सांगितलं ‘ये लो मै ये भी दे सकता हूँ!’दाराशुकोची आभाळाला खाली झुकायला लावणारी आणि सागराला मर्यादेची सीमा आणि खोली दाखवू पाहणारी ही असीम दानत पाहून समोर उपस्थित प्रचंड जमावाच्या अंगावर स्तब्धतेचा एकच रोमांच उभा राहिला आणि जनता दाराशुकोचा जयजयकार करू लागली. सत्तेसाठी धडपडून मेलेल्यांना इतिहास ज्या आदराने जोपासत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने इतिहास अशा दानशूरांना आजवर पूजत आहे. त्याचं एकच कारण आहे की, त्यांनी त्यांच्या काळात जे योगदान दिलंय ते दान सर्वकालीन अमूल्य दान आहे. कारण त्यांनी दिलेल्या तत्कालीन योगदानाची तुलना आजच्या कशाशीच होऊ शकत नाही. या सगळ्यांची दानत पाहून आम्हीही थोड्या अधिक प्रमाणात योगदान देण्याचा प्रयत्न करावा असं वाटायला हवं. कधीतरी कुणाला तरी दान देण्याच्या हेतूने आमचे हात पुढे करायला शिकलं पाहिजे. इतरांकडून घेत राहिलो तर फक्तसुखी होऊ आणि इतरांना देत राहिलो तर समाधानी होऊ, अपेक्षा आहे सगळेचजण आपल्याला जमेल अशा ज्या-त्या क्षेत्रात जमेल तितके योगदान देऊया आणि खूप खूप समाधानी होऊया.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत)