शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:48 IST

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार शेतकऱ्यांचे जवळपास १५ ...

प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीने जिल्ह्यातील सुमारे ५३ हजार शेतकऱ्यांचे जवळपास १५ हजार हेक्टर ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग अशा पिकांचे नुकसान झाले. पंचनाम्यांतून हे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतचा अहवाल मंगळवारी जिल्हाधिकाºयांनी विभागीय आयुक्तांकडे पाठविला.यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती. जुलै-आॅगस्टदरम्यान तब्बल महिनाभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतातील ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग अशी उभी पिके पाण्यात राहून अक्षरश: कुजली. याबाबत विविध राजकीय पक्ष व संघटनांनी आवाज उठवत तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू होते; परंतु ते काम अद्याप पूर्ण झाले नव्हते. गतमहिन्यात जिल्हा दौºयावर आलेल्या विभागीय आयुक्तांनाही याबाबत विचारणा केल्यावर त्यांनीही कानावर हात ठेवत जिल्हा प्रशासनाकडे बोट दाखविले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांच्या मनात हे पंचनामे कधी पूर्ण होणार व त्याचा अहवाल शासनाकडे अहवाल शासनाकडे कधी जाणार? याबाबत साशंकता निर्माण झाली होती.मात्र याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाºयांकडून विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी पाठविला. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ हजार हेक्टरमधील ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग अशा पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये सुमारे ५३ हजार शेतकºयांचा समावेश आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून हा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतरच यावर पुढील कार्यवाही होणार आहे.