शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

दलित अत्याचारप्रश्नी विधिमंडळावर धडक

By admin | Updated: May 13, 2014 00:47 IST

रामदास आठवले : वाढते अत्याचार हा महाराष्ट्राला कलंक

कोल्हापूर : पुरोगामी विचाराच्या राज्यात दलितांवरील अत्याचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गृहमंत्री अत्याचार कमी झाल्याचा डांगोरा पिटत दिशाभूल करत आहेत. दलितांवरील वाढते अत्याचार हा महाराष्टÑाला लागलेला कलंक असल्याची खंत ‘रिपाइं’(आठवले गट)चे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी ‘रिपाइं’ युवक आघाडीच्या वतीने २ जूनला विधिमंडळावर धडक देण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. दलित अत्याचारविरोधी शांतता समितीची स्थापना करावी, अशी मागणी करत राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला ३५ ते ३६ जागांवर निश्चित यश मिळणार असून, केंद्रात ‘एनडीए’चे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज (सोमवार) ‘रिपाइं’च्या चिंतन शिबिरासाठी कोल्हापुरात आले असता खा. आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, राज्यात २०१३ मध्ये दलितांवर १६३३ ठिकाणी अत्याचार झाले, तरीही गेल्यावर्षीपेक्षा अत्याचार कमी झाल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील करत आहेत. अत्याचारांच्या संख्येपेक्षा ते होऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने काय केले? सर्वच गावे व मराठा समाज दोषी नाही. मूठभर जातीयवादी विष पेरण्याचे काम करतात. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन अत्याचार वाढत असल्याचे पुरावे देणार आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक गावात दलित अत्याचारविरोधी शांतता समिती स्थापना केली पाहिजे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व स्वतंत्र यंत्रणा द्यावी. जेणेकरून अशा घटना स्थानिक पातळीवरच मिटवण्यात यश येऊ शकेल. रामदेवबाबांनी दलितांबद्दल वापरलेली भाषा चुकीची होती, पण त्यांना दलितांचा अपमान करायचा नव्हता. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तरीही विविध ठिकाणी त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. दलित नेत्यांच्या एकीकरणासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. इतर गट महायुतीत आले तर त्यांचे स्वागतच करू, असेही आठवले यांनी सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात आपणाला निश्चित स्थान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, गौतम भालेराव, उत्तम कांबळे, पी. के. जैन, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)