शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

दलित अत्याचारप्रश्नी विधिमंडळावर धडक

By admin | Updated: May 13, 2014 00:47 IST

रामदास आठवले : वाढते अत्याचार हा महाराष्ट्राला कलंक

कोल्हापूर : पुरोगामी विचाराच्या राज्यात दलितांवरील अत्याचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गृहमंत्री अत्याचार कमी झाल्याचा डांगोरा पिटत दिशाभूल करत आहेत. दलितांवरील वाढते अत्याचार हा महाराष्टÑाला लागलेला कलंक असल्याची खंत ‘रिपाइं’(आठवले गट)चे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी ‘रिपाइं’ युवक आघाडीच्या वतीने २ जूनला विधिमंडळावर धडक देण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. दलित अत्याचारविरोधी शांतता समितीची स्थापना करावी, अशी मागणी करत राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला ३५ ते ३६ जागांवर निश्चित यश मिळणार असून, केंद्रात ‘एनडीए’चे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज (सोमवार) ‘रिपाइं’च्या चिंतन शिबिरासाठी कोल्हापुरात आले असता खा. आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, राज्यात २०१३ मध्ये दलितांवर १६३३ ठिकाणी अत्याचार झाले, तरीही गेल्यावर्षीपेक्षा अत्याचार कमी झाल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील करत आहेत. अत्याचारांच्या संख्येपेक्षा ते होऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने काय केले? सर्वच गावे व मराठा समाज दोषी नाही. मूठभर जातीयवादी विष पेरण्याचे काम करतात. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन अत्याचार वाढत असल्याचे पुरावे देणार आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक गावात दलित अत्याचारविरोधी शांतता समिती स्थापना केली पाहिजे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व स्वतंत्र यंत्रणा द्यावी. जेणेकरून अशा घटना स्थानिक पातळीवरच मिटवण्यात यश येऊ शकेल. रामदेवबाबांनी दलितांबद्दल वापरलेली भाषा चुकीची होती, पण त्यांना दलितांचा अपमान करायचा नव्हता. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तरीही विविध ठिकाणी त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. दलित नेत्यांच्या एकीकरणासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. इतर गट महायुतीत आले तर त्यांचे स्वागतच करू, असेही आठवले यांनी सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात आपणाला निश्चित स्थान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, गौतम भालेराव, उत्तम कांबळे, पी. के. जैन, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)