शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

दलित अत्याचारप्रश्नी विधिमंडळावर धडक

By admin | Updated: May 13, 2014 00:47 IST

रामदास आठवले : वाढते अत्याचार हा महाराष्ट्राला कलंक

कोल्हापूर : पुरोगामी विचाराच्या राज्यात दलितांवरील अत्याचार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गृहमंत्री अत्याचार कमी झाल्याचा डांगोरा पिटत दिशाभूल करत आहेत. दलितांवरील वाढते अत्याचार हा महाराष्टÑाला लागलेला कलंक असल्याची खंत ‘रिपाइं’(आठवले गट)चे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या अत्याचारांचा निषेध करण्यासाठी ‘रिपाइं’ युवक आघाडीच्या वतीने २ जूनला विधिमंडळावर धडक देण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. दलित अत्याचारविरोधी शांतता समितीची स्थापना करावी, अशी मागणी करत राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला ३५ ते ३६ जागांवर निश्चित यश मिळणार असून, केंद्रात ‘एनडीए’चे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज (सोमवार) ‘रिपाइं’च्या चिंतन शिबिरासाठी कोल्हापुरात आले असता खा. आठवले बोलत होते. आठवले म्हणाले, राज्यात २०१३ मध्ये दलितांवर १६३३ ठिकाणी अत्याचार झाले, तरीही गेल्यावर्षीपेक्षा अत्याचार कमी झाल्याचा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील करत आहेत. अत्याचारांच्या संख्येपेक्षा ते होऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने काय केले? सर्वच गावे व मराठा समाज दोषी नाही. मूठभर जातीयवादी विष पेरण्याचे काम करतात. येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांची भेट घेऊन अत्याचार वाढत असल्याचे पुरावे देणार आहे. अशा घटना टाळण्यासाठी प्रत्येक गावात दलित अत्याचारविरोधी शांतता समिती स्थापना केली पाहिजे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याला अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व स्वतंत्र यंत्रणा द्यावी. जेणेकरून अशा घटना स्थानिक पातळीवरच मिटवण्यात यश येऊ शकेल. रामदेवबाबांनी दलितांबद्दल वापरलेली भाषा चुकीची होती, पण त्यांना दलितांचा अपमान करायचा नव्हता. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तरीही विविध ठिकाणी त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी. दलित नेत्यांच्या एकीकरणासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत. इतर गट महायुतीत आले तर त्यांचे स्वागतच करू, असेही आठवले यांनी सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात आपणाला निश्चित स्थान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, गौतम भालेराव, उत्तम कांबळे, पी. के. जैन, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)