शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण काशी करवीरनगरीला लाभलाय श्रीकृष्णाचा पदस्पर्श, करवीर महात्म्य ग्रंथात उल्लेख

By संदीप आडनाईक | Updated: August 26, 2024 13:54 IST

श्रीकृष्ण बाललीलेशी संबंधित गावांचा समावेश

संदीप आडनाईककोल्हापूर : करवीर नगरीला दक्षिण काशी अशी धार्मिक ओळख असून, श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. या ठिकाणी श्रीकृष्णाच्या नुसत्या येण्याचेच नाही, तर येथे देवकी मातेला कृष्ण बाललीलाही पाहायला मिळाल्या होत्या. त्याची ठिकाणे आजही कोल्हापुरात आढळतात. या सर्वांचे वर्णन कोल्हापूरचे महात्म सांगणाऱ्या करवीर महात्म्य या पवित्र ग्रंथात असल्याची माहिती कोल्हापुरातील मूर्ती आणि मंदिर अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी माहिती दिलीय.

श्रीकृष्णाबरोबर त्यांना जन्म देणारे देवकी आणि वासुदेवही कोल्हापुरात आले होते. देवकीने श्रीकृष्णाला त्याच्या बाललीला अनुभवण्याविषयीची इच्छा व्यक्त केली, म्हणूनच श्रीकृष्णाने करवीर क्षेत्रात गोकुळ, वृंदावन, मथुरा, द्वारका आदी क्षेत्रांची निर्मिती केली आणि तेथे बाललीलांचे दर्शन माता-पितांना करून दिले, असा श्रीकृष्णाच्या आयुष्यातील प्रसंग करवीर महात्म्य या ग्रंथात आहे. कोल्हापूर ही करवीर काशी आहे, त्याचे महत्त्व श्रीकृष्णाने जाणले होते.

करवीर महात्म्य या संस्कृत ग्रंथात ३६ व्या अध्यायात अगस्ती मुनी आणि लोपामुद्रा यांच्यातील चर्चेमधून कोल्हापूरातील या क्षेत्राचे महात्म्य सांगितलेले आहे. जिल्ह्यातील पन्हाळगड (ब्रह्मगिरी), विशाळगड (मचुकुंदाची गुंफा), गोकुळ शिरगाव (गोकुळ श्रीगाव), वाशी (वसुदेव ग्राम) ही श्रीकृष्णाशी संबंधित असणाऱ्या गावांचा उल्लेख ग्रंथात आढळतो. त्या त्या ठिकाणी श्रीकृष्णाची मंदिरेही पाहायला मिळतात. त्यामुळे करवीर भूमीचे पावित्र्य आणि महत्त्व वाढलेले आहे.

 

  • पन्हाळा : भगवान श्रीकृष्ण हे कालयवनाच्या वधासाठी द्वारकेहून दक्षिणेकडे आले होते. तेव्हा ते करवीर भूमीतील ब्रह्मगिरी पर्वतावर आले होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या पायाच्या आघाताने तो पर्वत खाली दबला गेला. हा ब्रह्मगिरी पर्वत म्हणजेच आत्ताचा पन्हाळा होय. या भौगोलिक घटनेचे देखील वर्णन करवीर महात्म्य ग्रंथात पाहायला मिळते.
  • पंचगंगा : करवीर क्षेत्रातील आठ महत्त्वाच्या नद्यांचे महात्म्य आणि त्यांचे खगोलशास्त्रीय वर्णन श्रीकृष्णाच्या मुखातून झाले आहे. भोगावती, पंचनदी, मंदाकिनी, सुनीरा, स्वर्गतरंगिणी, पयोवहा, पापहरा आणि पयोष्णी या आठ नावांचा उच्चार करून पंचगंगेत स्नान केल्यास त्या नरास कधीही नरकाची भीती नाही. असा उल्लेख असलेल्या अगस्तीमुनी आणि लोपामुद्रा यांच्यातील संवादाचे वर्णन या ग्रंथात आहे.
  • गोकुळ शिरगाव : कोल्हापुरातील गोकुळ श्रीगाव म्हणजेच गोकुळ शिरगाव हे श्रीकृष्णाच्या करवीर भेटीतील महत्त्वाचे स्थान मानले जाते. मातापित्यांच्या समाधानासाठी, त्यांच्या तृप्ततेसाठी श्री कृष्णाने येथे यमुना नदीचा प्रवाह आणला. तिच्या तीरावर श्रीकृष्णाने आपल्या बाललीलांचे दर्शन घडवले होते. हा डोह आजही पहायला मिळतो. उद्योगनगरी गोकुळ शिरगावच्या पश्चिम दिशेला कृष्णाचे मंदिरही आहे.
  • हुतात्मा पार्क : कोल्हापूरच्या मध्यवस्तीतील हुतात्मा पार्क परिसरात उद्यानात पूर्वीच्या जयंती आणि गोमती या नद्यांचा संगम आहे. त्यावर संगमेश्वराचे एक मंदिरही आहे. हे ठिकाण म्हणजेच करवीरची द्वारका मानली जाते.
  • गिरगाव : कोल्हापुरातील कळंबापासून पुढे असलेल्या कात्यायनी देवी डोंगरावर असणारे गिरगाव हे ठिकाण म्हणजे श्रीकृष्णाशी संबंधित असणारे करवीर नगरीतील वृंदावन होय. गिरगाव पर्वत म्हणजेच श्रीकृष्णाने आपल्या बोटांवर उचलून धरलेला गोवर्धन पर्वत आहे.
  • वाशी : श्रीकृष्णाचे पिता वासुदेवांचे गाव अर्थात वसुदेव ग्राम म्हणजेच कोल्हापुरातील आत्ताचे वाशी होय.
  • नंदवाळ : ज्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या अनेक बाललीला घडल्या, ते नंद राजाची राजधानी असलेले नंदग्राम म्हणजेच आत्ताचे नंदवाळ आहे.
टॅग्स :kolhapurकोल्हापूर