शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

बापरे... ! मार्चअखेरलाच कोल्हापूरचा पारा ४० अंशांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत असताना दुसऱ्या बाजूला आग ओकणाऱ्या सूर्यामुळे कोल्हापूरकर कासावीस झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : एका बाजूला कोरोनाचा कहर वाढत असताना दुसऱ्या बाजूला आग ओकणाऱ्या सूर्यामुळे कोल्हापूरकर कासावीस झाले आहेत. मंगळवारी दुपारी तापमानाने या हंगामातील सर्वोच्च ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. मार्च अखेरलाच तापमानाने चाळिशी गाठण्याची ही पहिलीच वेळ ठरली असून, गतवर्षीपेक्षा ही वाढ ५ ते ६ अंश सेल्सिअसने जास्त आहे. एप्रिल महिन्यात तर सूर्य आग ओकणार असल्याचे हवामानाचे आकडे सांगत आहेत. साधारणपणे ४३ ते ४४ अंशांपर्यंत पारा जाण्याची शक्यता असून आताच घाम फुटण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर हे घाटमाथ्यावर असल्याने मुळातच याला गारव्याचे वरदान लाभले आहे; पण गेल्या पाच-सहा वर्षांत गारव्याचे रूपांतर हळूहळू वणव्यात होऊ लागले आहे. कितीही तापले तरी कोल्हापूरचे तापमान ४० पर्यंतच जाऊन थांबायचे, हेदेखील एप्रिल मे महिन्यात. गेल्या वर्षी मे महिन्यात ४१ ते ४२ तापमानाचा कडाका अनुभवावा लागला. यावर्षी मात्र मार्च संपण्याआधीच तापमानाने चाळिशी गाठली. मंगळवारी दुपारी तीन वाजता तापमान ४० अंशांवर जाऊन पोहोचले. पाच वाजेपर्यंत ते ३८ पर्यंत खाली आले. आज, बुधवारीदेखील हीच अवस्था राहणार आहे. सकाळी १० वाजता ३० अंशांपासून पारा पुढे सरकत एक वाजेेपर्यंत ३८, दोनपर्यंत ३९ आणि ३ वाजता ४० असा पारा चढता राहिला.

------------------------------------------

झाडांची सावली हवीहवीशी

उष्मा एवढा वाढला आहे की, झाडाची सावली आली आणि वाऱ्याची मंद जरी झुळूक आली तरी जिवाची घालमेल काहीशी कमी होत आहे. घशाला कोरड पडल्याने गारवा शोधण्यासाठी आइस्क्रीमसह थंड पेये व फ्रुट सॅलड खाण्यासाठी गर्दी वाढली आहे. डोक्यावर टोपी, हॅट, रुमाल यांशिवाय उन्हात फिरणे अवघड झाले असून अंग भाजून काढणाऱ्या झळांमुळे घामाच्या धारा वाहत आहेत.

------------------------------------------

मार्चअखेर तापलेलीच

गेल्या वर्षी मार्चअखेरला तापमानाचा पारा कमाल ३४, तर किमान २४ अंश सेल्सिअस इतका होता. संपूर्ण महिना तो कमी-अधिक प्रमाणात तसाच होता. या वर्षी मात्र तापमानात एकदम पाच ते सहा अंशांनी वाढत होत पारा ३५, ३६ असे करीत वेगाने ४०पर्यंत झेपावला आहे.

------------------------------------------

उष्णतेची प्रचंड लाट येणार

साधारणपणे २५ एप्रिलपर्यंत सूर्य आग ओकणार आहे. त्यानंतर मे महिन्यात पारा ३८ ते ३९ पर्यंत खाली येणार आहे. एप्रिल महिन्यात ५, ६, ७, ८ अशा चार दिवसांत तर उष्णतेची प्रचंड लाट येणार असून पारा ४३ ते ४४ अंशांवर राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने धास्ती वाढली आहे. मेमध्ये पारा कमी होणार आहे, एवढाच काय तो दिलासा आहे.