शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

दबंगगिरीने वाळू तस्कर हादरले

By admin | Updated: February 2, 2015 23:45 IST

आटपाडीत कारवाई जोरात : आजअखेर ८३ लाखांचा दंड वसूल

आटपाडी : आटपाडी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जानेवारी महिन्यात १९ वाळू तस्करांवर कारवाई करून ७ लाख ७५ हजार ८७१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. एप्रिल २०१४ ते जानेवारी २०१५ पर्यंत तब्बल ८३ वाहनांवर कारवाई करून ३२ लाख ७१ हजार ५४१ रुपयांचा विक्रमी दंड वसूूल केला आहे. महसूल विभागाच्या या दबंग कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.या वर्षाच्या पहिल्या महिन्यातच प्रत्येक सुटीच्यादिवशी २४ तास कार्यरत राहणाऱ्या पथकांमुळे वाळू तस्करांवर विक्रमी कारवाई करण्यात या विभागाला यश आले आहे. माणगंगा नदीसह तालुक्यातील ओढे, तलावांसह तालुक्याबाहेरून आणलेल्या चोरट्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे.जानेवारी महिन्यात वाळू तस्करी करणाऱ्यांकडून या विभागाने दंडासह रॉयल्टी आणि उपकरांसह वसूल केलेली रक्कम अशी- संदीप माने (सांगोला, जि. सोलापूर) १ लाख ३३ हजार ३१० रुपये, विठ्ठल आबा सरगर (रा. कोळे, ता. सांगोला) ३० हजार, विक्रम राऊत ५० हजार, गुणवंत भीमराव करांडे (बोंबेवाडी) -३० हजार, गणेश बाळासाहेब पवार (बोंबेवाडी)- ३० हजार, सुनील बालटे (आटपाडी) ३० हजार, हर्षवर्धन गायली (सांगोला) - ९९ हजार ९६५ रुपये, संजय बुधावले (दिघंची) - ३० हजार, बापू चव्हाण (पांढरेवाडी) - ३० हजार, विकास चंद्रकांत विभूते (बोंबेवाडी)- ३० हजार, संभाजी रंगराव दमामे (आष्टा) - ९९ हजार ९६५, राजेंद्र लक्ष्मण यमगर (बनपुरी) -३० हजार, मनोज माणिक गायकवाड (शेटफळे) - ३० हजार, गोरख दाजी सरगर (करगणी) -३० हजार, अनिल वसंत चव्हाण (आटपाडी) -२१ हजार ४३८, दीपक भोसले (आटपाडी) - २१ हजार ४३८, राजेंद्र मोरे (दिघंची) - १९ हजार ७५५. असा एकूण ७ लाख २९ हजार ६४५ रुपये दंड, ४५ हजार ५६१ रुपये रॉयल्टी आणि ६५५ रुपये उपकर मिळून एकूण ७ लाख ७५ हजार ८७१ रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे. तहसीलदार जोगेंद्र कट्यारे यांच्यासह अव्वल कारकून एस. ए. शिंदे, मंडल अधिकारी अतुल सोनवणे, एस. एन. करांडे, बी. पी. यादव, जे. के. बागवान, नीलेश भांबुरे, गावकामगार तलाठी माणिकराव देशमुख, बी. जे. लांडगे यांनी ही कारवाई केली. (वार्ताहर)७० ब्रास वाळू जप्तवाळू तस्करी करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाचे कर्मचारी कारवाई करीत असताना आता बांधकामांवर वापरण्यात येणाऱ्या चोरट्या वाळूवरही या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. विविध बांधकामांवरील अशी ७० ब्रास वाळू जप्त करून ती तहसील कार्यालयाच्या आवारात आणण्यात आली आहे. या वाळूचा लिलाव करण्यासाठी जिल्हाधिकारी कुशवाह यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे.