शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

डी. वाय. पाटील ग्रुप शेती क्षेत्रात क्रांती करणारी पिढी घडवेल -शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विज्ञानावर आधारित शेती विकासाचा पाया रचणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूर राज्यात प्रगत झाले. आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : विज्ञानावर आधारित शेती विकासाचा पाया रचणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूर राज्यात प्रगत झाले. आता त्याच कोल्हापुरात डी. वाय. पाटील ग्रुपचे खासगी क्षेत्रातील राज्यातील पहिले कृषी विद्यापीठ स्थापन झाले, याचा सार्थ अभिमान आहे, हे विद्यापीठ शेती क्षेत्रात क्रांती घडवणारी नवीन पिढी तयार करेल, असा विश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केला.

तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे ऑनलाइन उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील होते. डी. वाय. ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री विश्वजित कदम व प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील यड्रावकर, आ. ऋतुराज पाटील, राजू आवळे, आ. जयंत आसगावकर, खा. संजय मंडलिक, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, हे मान्यवर सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित होते. यावेेळी विद्यापीठाचे उद्घाटन, शैक्षणिक संकूल इमारत कोनशिला, मुक्त गाेठा प्रकल्प, मुख्य प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन झाले.

राज्यातील हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनीच कोल्हापूरच्या मातीत विद्यापीठाचा शुभारंभ होण्याचा योग जुळून आला ही आनंददायी गोष्ट असल्याची भावना व्यक्त करून शरद पवार म्हणाले, शेवटच्या माणसापर्यंत बदल अनुभवायचा असल्यास शेतीचे अर्थकारण सुधारण्याशिवाय गत्यंतर नाही. शेतीवर अवलंबून असणाऱ्या ५८ टक्के लोकांची क्रयशक्ती सुधारली नाही तर देश संकटातून बाहेर येणार नाही, हे वास्तव आहे. चीन, बँकॉक, नेदरलॅण्डसारख्या शेतीक्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या देशांशी समन्वय साधा, काही अडचण आली तर मला सांगा मी मदत करेन, अशी ग्वाहीदेखील दिली. राज्यातील राहुरी, परभणी, अकोला, दापोली येथील चारही सरकारी कृषी विद्यापीठाने आतापर्यंत महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान दिले आहे. आता एकत्रित विद्यापीठ ही संकल्पना घेऊन डी. वाय. पाटील ग्रुपने यात पाऊल ठेवले आहे, हे स्तुत्य आहे. या विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करा.

-----------------------------

ए ग्रेडचे विद्यापीठ करू...

कृषी विद्यापीठ ही डी. वाय. ग्रुपची सातवी शाखा आहे. इतर संस्थांप्रमाणेच १६ हजार विद्यार्थी संख्या, नॅकचे ए ग्रेड मानांकन आणि आयसीआयची मान्यता मिळवणे हे आपले येथू्न पुढे ध्येय असणार आहे आणि त्यात नक्कीच यशदेखील येईल, असा विश्वास संजय डी. पाटील यांनी व्यक्त केला.

-----------------------------

संशोधनावर भर द्या

विद्यापीठात संशोधनावर भर देण्यास सांगताना पवार म्हणाले, उत्पादन वाढीसाठी बियाणांत नवनवीन संशोधन काळाची गरज आहे. अमेरिका, ब्राझीलसारख्या देशांत जीएम वाणावर एका बाजूला चळवळी होतात, तर दुसरीकडे त्याच बियाणांद्वारे उत्पादन वाढवून जगभर निर्यातही करतात. भारतात देखील हेच धोरण हवे. देशात संशोधन करणाऱ्या ८० संस्थांमध्ये पाच हजार शास्त्रज्ञ आहेत, त्यांचे संंशोधन बांधापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकाराची गरज आहे.

-----------------------------

पवार आणि पंतप्रधान

शरद पवार यांच्यासारख्या जाणत्या राजाला पंतप्रधानपदी बसलेले मला पाहायचे आहे. ते स्वप्न पूर्ण होऊ दे, अशी माझी देवाकडे प्रार्थना आहे, असा पुनरुच्चार माजी राज्यपाल डी. वाय. पाटील यांनी केला.

-----------------------------

फाेेटो : ०१ कोल्हापूर ०३

कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डाॅ. डी.वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाचे ऑनलाइन उद्घाटन गुरुवारी माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते व माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डावीकडून खा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, डॉ. संजय डी. पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व आ. राजूबाबा आवळे उपस्थित होते.