शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

संस्थाचालक-शिक्षकांच्या वादावर अखेर पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST

कोल्हापूर : रुईकर काॅलनीतील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी जे काही आरोप व चुका झाल्या त्या दुरुस्त ...

कोल्हापूर : रुईकर काॅलनीतील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी जे काही आरोप व चुका झाल्या त्या दुरुस्त करु. शिक्षकांना अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका घेत संस्थेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांसोबत झालेल्या वादावर पडदा टाकला. यासंदर्भात शिक्षक आमदार जयंत आसगावकर व सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समिती आणि संबधित संस्थेचे संचालक यांची सोमवारी शिवाजी पार्कमधील मुख्याध्यापक भवनात बैठक घेतली. या बैठकीत जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली.

जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत मुख्याध्यापक संजय पाटील यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याविरोधात शनिवारी नागरी संघटना कृती समितीने मूक धरणे आंदोलन केले होते. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी शिक्षक आमदार आसगावकर यांनी सोमवारी मुख्याध्यापक भवनमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीत शिक्षकांच्यावतीने मुख्याध्यापक पाटील यांनी एकूण ३८ आरोप लेखी स्वरुपात सादर केले होते. त्यावर संस्थेचे अध्यक्ष जाधव यांनी प्रथम मला याबाबत येथे काहीच बोलायचे नाही. मी जे काय म्हणणे आहे, ते चौकशी समितीसमोर सादर करेन, असे उत्तर दिले. त्यावर रमेश मोरे, मुख्याध्यापक पाटील व अन्य शिक्षकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. यावेळी हस्तक्षेप करत आमदार आसगावकर यांनी हे काही न्यायालय नाही. परंतु, माणुसकीच्या नात्याने व संस्था वाचली पाहिजे आणि कोल्हापूरचे नाव राज्यात कुठे खराब होऊ नये याकरिता ही बैठक बोलावल्याचे जाधव यांना सुनावले. त्यानंतर जाधव यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यावर समाधान न झाल्यामुळे शिक्षक व कृती समितीने चौकशी समिती नेमावी, त्यात सर्व सदस्यांचा समावेश असावा, अशी भूमिका घेतली. त्यानंतर सर्वमान्य अशी एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती स्थापन करण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षण प्रशासन अधिकारी एस. के. यादव, कृती समितीचे अशोक पोवार, संभाजीराव जगदाळे, संस्थाचालक संघटनेचे वसंतराव देशमुख, शिक्षक संघटनेचे एस. डी. लाड, दादा लाड, भरत रसाळे, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते.

चौकट

जिल्हा तक्रारमुक्त झाला पाहिजे, याकरिता अशाप्रकारे बैठक बोलविण्याचा उपक्रम प्रथमच राबविला. दोन्ही बाजू समजून चौकशी समिती स्थापन केली.

- जयंत आसगावकर, शिक्षक आमदार