शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

संस्थाचालक-शिक्षकांच्या वादावर अखेर पडदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:14 IST

कोल्हापूर : रुईकर काॅलनीतील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी जे काही आरोप व चुका झाल्या त्या दुरुस्त ...

कोल्हापूर : रुईकर काॅलनीतील जयभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांनी जे काही आरोप व चुका झाल्या त्या दुरुस्त करु. शिक्षकांना अपशब्द वापरले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका घेत संस्थेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांसोबत झालेल्या वादावर पडदा टाकला. यासंदर्भात शिक्षक आमदार जयंत आसगावकर व सर्व शिक्षक व नागरी संघटना कृती समिती आणि संबधित संस्थेचे संचालक यांची सोमवारी शिवाजी पार्कमधील मुख्याध्यापक भवनात बैठक घेतली. या बैठकीत जाधव यांनी दिलगिरी व्यक्त केली.

जाधव यांनी मद्यधुंद अवस्थेत मुख्याध्यापक संजय पाटील यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ व धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याविरोधात शनिवारी नागरी संघटना कृती समितीने मूक धरणे आंदोलन केले होते. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी शिक्षक आमदार आसगावकर यांनी सोमवारी मुख्याध्यापक भवनमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीत शिक्षकांच्यावतीने मुख्याध्यापक पाटील यांनी एकूण ३८ आरोप लेखी स्वरुपात सादर केले होते. त्यावर संस्थेचे अध्यक्ष जाधव यांनी प्रथम मला याबाबत येथे काहीच बोलायचे नाही. मी जे काय म्हणणे आहे, ते चौकशी समितीसमोर सादर करेन, असे उत्तर दिले. त्यावर रमेश मोरे, मुख्याध्यापक पाटील व अन्य शिक्षकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. यावेळी हस्तक्षेप करत आमदार आसगावकर यांनी हे काही न्यायालय नाही. परंतु, माणुसकीच्या नात्याने व संस्था वाचली पाहिजे आणि कोल्हापूरचे नाव राज्यात कुठे खराब होऊ नये याकरिता ही बैठक बोलावल्याचे जाधव यांना सुनावले. त्यानंतर जाधव यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यावर समाधान न झाल्यामुळे शिक्षक व कृती समितीने चौकशी समिती नेमावी, त्यात सर्व सदस्यांचा समावेश असावा, अशी भूमिका घेतली. त्यानंतर सर्वमान्य अशी एस. डी. लाड यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांची समिती स्थापन करण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, प्राथमिक शिक्षण प्रशासन अधिकारी एस. के. यादव, कृती समितीचे अशोक पोवार, संभाजीराव जगदाळे, संस्थाचालक संघटनेचे वसंतराव देशमुख, शिक्षक संघटनेचे एस. डी. लाड, दादा लाड, भरत रसाळे, चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते.

चौकट

जिल्हा तक्रारमुक्त झाला पाहिजे, याकरिता अशाप्रकारे बैठक बोलविण्याचा उपक्रम प्रथमच राबविला. दोन्ही बाजू समजून चौकशी समिती स्थापन केली.

- जयंत आसगावकर, शिक्षक आमदार