शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

सुसंस्कृत लोक राजकारणापासून लांब

By admin | Updated: October 9, 2014 00:46 IST

भालचंद्र नेमाडे : श्रमिक प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान; प्रादेशिक, राष्ट्रीय, वैश्विक मूल्यांची केली उकल

कोल्हापूर : प्रगत म्हणविणाऱ्या राष्ट्रात जनतेशी साधर्म्य असलेलाच नेता त्यांचे नेतृत्व करतो. मात्र, आपल्या देशात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कमी असतानाही ६० टक्के गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच निवडून येतात. त्यामुळेच सुसंस्कृत लोक राजकारणापासून लांब जात आहेत. लोकशाहीची ही बदलत जाणारी मूल्ये एक दिवस देशाला हिटलरशाहीकडे घेऊन जातील, असे सूचक वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज, बुधवारी येथे केले.दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘प्रादेशिक ते जागतिक’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. गोविंद पानसरे होते. प्रा. रणवीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिभा भालचंद्र नेमाडे यांचे मेघा पानसरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्रमिक प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित पुस्तकांचा संच नेमाडे यांना भेट देण्यात आला.महाभारत, रामायण, आर्य, ‘मुंडा’ आदिवासी, टिपू सुलतान, ईस्ट इंडिया कंपनी, कान्होजी आंग्रे, अल्लाउद्दीन खिलजी ते युरोपातील तत्त्वज्ञ, आदींचे दाखले देत, भालचंद्र नेमाडे यांनी प्रादेशिक, राष्ट्रीय व वैश्विक मूल्ये अत्यंत साध्या व सोप्या उदाहरणांसह समजावून दिली. नेमाडे म्हणाले, प्रादेशिक मूल्यांमध्ये नैतिकता असते. मानवतेला टिकवून ठेवण्याची ताकद असते. ती ताकद राष्ट्रीय मूल्यांमध्ये असत नाही. सोयीचा राष्ट्रवाद पेरून, खोट्या इतिहासाच्या आधारेच राष्ट्राची निर्मिती होते. भौगालिक विविधतेनुसार मानसिक व शारिरीक विविधता निर्माण होते. त्यामुळे प्रादेशिकतेनुसार लोकांचा आचार, विचार, आचरण यांत फरक पडतो. स्वातंत्र्य व समता ही एकत्र नांदूच शकत नाहीत. हद्दी व मर्यादांवरच लोकांचे भाषिक, प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा वैश्विक असणे अवलंबून असते. माणसाने कमीत कमी प्रादेशिक असावे. पायाशी प्रादेशिक जमिनीचा तुकडा असल्यानंतरच वैश्विक होता येते. (प्रतिनिधी)जोहार..! नेमाडे यांनी ‘जोहार’ म्हणत बोलण्यास सुरुवात केली. ‘जोहार’ हा शब्द किमान ६० हजार वर्षांपासून बोलीभाषेत प्रचलित आहे. रामराम, नमस्कार, आदी शब्द तीन हजार वर्षांपेक्षा अधिक पूर्वीचे नाहीत. च, झ, छ, आदी दंतिक अक्षरे फक्त मराठीतच आहेत. यांचा उच्चार ज्यांना येत नाही ते अमराठी आहेत हे सहज ओळखता येते. महाराष्ट्रातील ‘मुंडा’ या आदिवासी जमातीला ६० हजार वर्षांचा इतिहास असल्याची माहिती नेमाडे यांनी देताच सभागृह स्तंभित झाले.