शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

सुसंस्कृत लोक राजकारणापासून लांब

By admin | Updated: October 9, 2014 00:46 IST

भालचंद्र नेमाडे : श्रमिक प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान; प्रादेशिक, राष्ट्रीय, वैश्विक मूल्यांची केली उकल

कोल्हापूर : प्रगत म्हणविणाऱ्या राष्ट्रात जनतेशी साधर्म्य असलेलाच नेता त्यांचे नेतृत्व करतो. मात्र, आपल्या देशात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक कमी असतानाही ६० टक्के गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकच निवडून येतात. त्यामुळेच सुसंस्कृत लोक राजकारणापासून लांब जात आहेत. लोकशाहीची ही बदलत जाणारी मूल्ये एक दिवस देशाला हिटलरशाहीकडे घेऊन जातील, असे सूचक वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज, बुधवारी येथे केले.दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात श्रमिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘प्रादेशिक ते जागतिक’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. गोविंद पानसरे होते. प्रा. रणवीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रतिभा भालचंद्र नेमाडे यांचे मेघा पानसरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्रमिक प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित पुस्तकांचा संच नेमाडे यांना भेट देण्यात आला.महाभारत, रामायण, आर्य, ‘मुंडा’ आदिवासी, टिपू सुलतान, ईस्ट इंडिया कंपनी, कान्होजी आंग्रे, अल्लाउद्दीन खिलजी ते युरोपातील तत्त्वज्ञ, आदींचे दाखले देत, भालचंद्र नेमाडे यांनी प्रादेशिक, राष्ट्रीय व वैश्विक मूल्ये अत्यंत साध्या व सोप्या उदाहरणांसह समजावून दिली. नेमाडे म्हणाले, प्रादेशिक मूल्यांमध्ये नैतिकता असते. मानवतेला टिकवून ठेवण्याची ताकद असते. ती ताकद राष्ट्रीय मूल्यांमध्ये असत नाही. सोयीचा राष्ट्रवाद पेरून, खोट्या इतिहासाच्या आधारेच राष्ट्राची निर्मिती होते. भौगालिक विविधतेनुसार मानसिक व शारिरीक विविधता निर्माण होते. त्यामुळे प्रादेशिकतेनुसार लोकांचा आचार, विचार, आचरण यांत फरक पडतो. स्वातंत्र्य व समता ही एकत्र नांदूच शकत नाहीत. हद्दी व मर्यादांवरच लोकांचे भाषिक, प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा वैश्विक असणे अवलंबून असते. माणसाने कमीत कमी प्रादेशिक असावे. पायाशी प्रादेशिक जमिनीचा तुकडा असल्यानंतरच वैश्विक होता येते. (प्रतिनिधी)जोहार..! नेमाडे यांनी ‘जोहार’ म्हणत बोलण्यास सुरुवात केली. ‘जोहार’ हा शब्द किमान ६० हजार वर्षांपासून बोलीभाषेत प्रचलित आहे. रामराम, नमस्कार, आदी शब्द तीन हजार वर्षांपेक्षा अधिक पूर्वीचे नाहीत. च, झ, छ, आदी दंतिक अक्षरे फक्त मराठीतच आहेत. यांचा उच्चार ज्यांना येत नाही ते अमराठी आहेत हे सहज ओळखता येते. महाराष्ट्रातील ‘मुंडा’ या आदिवासी जमातीला ६० हजार वर्षांचा इतिहास असल्याची माहिती नेमाडे यांनी देताच सभागृह स्तंभित झाले.