शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत; वडेट्टीवार
3
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
4
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
5
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
6
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
8
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
9
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
10
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
11
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
12
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
13
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
14
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
15
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
16
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
17
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
18
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
19
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
20
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य

यंदाचा गळीत हंगाम रडवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST

कोल्हापूर : गतवर्षीप्रमाणे यंदाचाही गळीत हंगाम शेतकरी आणि साखर कारखानदारांना रडवणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. महापुरामुळे नुकसान ...

कोल्हापूर : गतवर्षीप्रमाणे यंदाचाही गळीत हंगाम शेतकरी आणि साखर कारखानदारांना रडवणार असल्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. महापुरामुळे नुकसान झाले असलेतरी मुळातच उसाची उच्चांकी लागवड झाली असल्याने गाळपचे मोठे आव्हान कारखान्यांसमोर असणार आहे, तर एफआरपीवरून शेतकरी नेत्यांनी आताच शस्त्रे परजल्याने ऊस पट्ट्यात आंदोलनाचे नगारे वाजू लागले आहेत. हंगाम तोंडावर आल्यानंतर याची तीव्रताही वाढण्याचे संकेत आताच मिळत असल्याने कारखान्याच्या धुराड्याआधीच आंदोलनाचे धुराडे पेटू लागले आहेत.

कृषी विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात १ लाख ६८ हजार १४९ हेक्टर उसाचे क्षेत्र आहे. ७० हजार हेक्टर क्षेत्र खोडव्याचे आहे. म्हणजेच जवळपास २ लाख ३८ हजार हेक्टरवर उसाचे पीक आहे. यावर्षी २०१९ प्रमाणेच महापूर आल्याने यातील नदीकाठावरील जवळपास ४० हजार हेक्टरवरील ऊस पिकाचे नुकसान झाले. उर्वरित ठिकाणी उसाचे पीक चांगले आहे; पण गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने उसाच्या वाढीवर परिणाम झाला असून, उतारा घटणार आहे.

अशा परिस्थितीत आहे त्या पिकाला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असणे रास्त आहे, पण याला पहिला तडा देण्याचे काम कृषिमूल्य आयोगाने केले. उत्पादन खर्च हजाराच्या पटीत वाढला असताना एफआरपी मात्र टनाला ५० रुपयांनी वाढल्याने शेतकरी संतापला आहे. ही आग पेटत असतानाच केंद्र सरकार व निति आयोगाने एफआरपी तीन टप्प्यात देण्याची शिफारस करून आगीत तेल ओतण्याचे काम केल्याने ऊस पट्ट्यातील शेतकऱ्याच्या संतापात भर पडली आहे.

यावरून स्वाभिमानी, आंदोलन अंकुश आणि जयशिवराय या शेतकरी संघटनांनी सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केल्याने गळीत हंगाम सुरू होण्यास दोन महिने उरले असतानाच आंदोलनाचे बार उडू लागले आहेत. एफआरपी देण्यासाठी ६०:२०:२० हा फॉर्म्युला केंद्र सरकारने मांडला आहे. त्यानुसार ऊस तुटल्याच्या १४ दिवसांत ६० टक्के तर उर्वरित २० टक्के हंगाम संपल्यानंतर आणि कारखान्यांच्या सोईनुसार देण्याची मुभा ठेवण्यात आली आहे. यावर संघटनांनी आक्षेप घेत रान पेटवण्यास सुरुवात केली आहे. मिळणाऱ्या बिलातून पीककर्जाचे हफ्तेदेखील फिटणार नसल्याचे सांगत आरपारच्या लढाईची तयारी सुरू केली आहे.

चौकट

ऊसतोडणी मजुरांचे संकट

यंदाही ऊसतोडणी मजुरांचे संकट कायम राहण्याची चिन्हे आहेत. मराठवाड्यात दमदार पाऊस सुरू असल्याने ॲडव्हान्स घेऊन जाणाऱ्या कारखान्यांच्या अधिकाऱ्यांना मजुरांकडून नकारघंटा मिळत आहे. त्यामुळे भरमसाठ ऊस तोडायचा कसा, याची चिंता कारखान्यांना लागली आहे. त्यात वाढलेल्या साखरसाठ्याच्या तुलनेत उठाव नसल्याने आणि साखर दरामुळे कारखान्यांना शॉर्ट मार्जिनची चिंता सतावू लागली आहे.

चौकट

वाहतूकदाराकडून भाडेवाढीची मागणी

डिझेल दरामध्ये वाढ झाल्याने ओढणीच्या दरात वाढ करावी अशी वाहतूकदारांची मागणी आहे. तोडणी आणि ओढणी धरून सरासरी ६०० ते ७०० रुपये प्रतिटनप्रमाणे शेतकऱ्यांच्या बिलातून कपात होते. आता वाहतूकदारांनी दुप्पटीने वाढ मागितल्याने तोडणी-ओढणी खर्चातील वाढीची शेतकऱ्यांवर टांगती तलवार आहे.