शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील गळीत हंगाम डिसेंबरपासून

By admin | Updated: October 4, 2016 01:08 IST

सीमाभागात १५ नोव्हेंबरपासून : उसाचे उत्पादन कमी असल्याने मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय

विश्वास पाटील -- कोल्हापूर -राज्यातील साखर कारखान्यांची धुराडी आता १ डिसेंबरनंतरच पेटणार असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. राज्यात उसाचे उत्पादन यंदा कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रतिवर्षी १ आॅक्टोबरपासून हंगाम सुरू होत असे. यंदा तब्बल दोन महिने तो पुढे गेला आहे.यंदा ऊस कमी असल्यामुळे हंगाम १५ नोव्हेंबरनंतरच सुरू व्हावा, अशी साखर कारखानदारांची मागणी होती. कारण दिवाळी २ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे हा सण झाल्यावरच ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या येतात. परतीचा पाऊस अजूनही सुरू आहे. तो अजून किती दिवस सुरू राहील, याचा अंदाज नाही. नोव्हेंबरपासून हंगाम सुरू झाला तरी तो फेब्रुवारी अखेरपर्यंत चालू शकेल, असा अंदाज आहे. परंतु, सीमाभागातील कारखान्यांचा हंगाम लवकर सुरू करण्यास परवानगी द्या वी, अशी मागणी होती. त्याचीही दखल घेण्यात आली. जे कारखाने सीमाभागातील आहेत, त्यांना सहकारमंत्री व साखर आयुक्तांच्या परवानगीनंतर १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुख्यत: कोल्हापूर व सांगली जिल्'ांतील कारखान्यांना हंगाम लवकर सुरू करण्यास मुभा मिळू शकेल.गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात सुमारे दोन कोटी टनांची घट आहे. दुष्काळामुळे पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक काढले आणि जे होते त्याची पाण्याअभावी पुरेशी वाढ न झाल्याने हा फटका बसला आहे. जे पीक आहे, त्यातही खोडव्याचे प्रमाण जास्त आहे. पाऊस पडल्यानंतरच त्याची वाढ सुरू झाली आहे. त्यामुळे हंगाम लवकर सुरू झाल्यास त्याच्या उत्पादनावरही परिणाम होईल असा विचार झाला. राज्याची प्रतिदिन गाळप क्षमता पाच लाख ६० हजारांपर्यंत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ५५० लाख टन उसाचे गाळप करायचे झाल्यासही १०० दिवस पुरेसे आहेत. याचा अर्थच असा आहे की, यंदाचा हंगाम सरासरी ३० दिवसांपासून १०० दिवसांपर्यंतच चालू शकणार आहे. त्यामुळे तो जरी एक डिसेंबरपासून सुरु झाला तरी चांगला उतारा असलेल्या काळातच गाळप होवू शकेल याचाही विचार झाला.बैठकीत आमदार अजित पवार यांनी एक डिसेंबर ही तारीख जाहीर केल्यावर मुख्यमंत्र्यांनीही त्यास लगेच संमती दिली असल्याचे सांगण्यात आले. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या कार्यबाहुल्यामुळे रात्री आठनंतर सुरू झाली. त्यास मुख्यमंत्री फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार अजित पवार, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, कार्यकारी संचालक संजीव बाबर, साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आदी मान्यवर उपस्थित होते.ऊस परिषदेचे काय ?हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २५ आॅक्टोबरला जयसिंगपूरला ऊस परिषद घेतली आहे. परंतु, त्यानंतर तब्बल महिन्याभराने हंगाम सुरू होणार असल्याने ऊस परिषदही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.२०१६-१७ चे संभाव्य गाळपऊस गाळप : ५०० लाख टनसाखर उत्पादन : ६० लाख टनसरासरी हंगाम दिवस : ३० ते ९०२०१५-१६ चा हंगामहंगाम घेतलेले कारखाने : १७७ऊस गाळप : ७४३.२८ लाख टनसाखर उत्पादन : ८४.०० लाख टनसरासरी साखर उतारा : ११.३१