शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांची क्रूर थट्टा : हसन मुश्रीफ ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:23 IST

कागल : शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल शासन रोज नवनवीन घोषणा करीत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी शून्य आहे.

ठळक मुद्देशासनाकडून रोज नवनवीन फक्त घोषणा; अंमलबजावणी मात्र शून्यतरीसुद्धा पोलीस गप्प का आहेत. कोणाची तरी बदनामी व्हावी यासाठी हा तपास दाबला तर जात नाही ना?

कागल : शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल शासन रोज नवनवीन घोषणा करीत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी शून्य आहे. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकरी वर्गाची क्रूर थट्टा मांडली आहे, अशी टीका माजी जलसंपदा मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

कागल येथे निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, योजना जाहीर झाल्यापासून रोज नवनवीन नियम-निकष लावले गेले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करता करता जिल्हा बॅँकांना नाकीनऊ आले आहे. कर्जमाफीचे प्रस्ताव देताना शेतकरी वर्ग घाईला आला आहे. शुक्रवारी सांगितले की, तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करा. शनिवारी पैसे वर्ग केले जाणार आहेत. जिल्हा बॅँकेच्या कर्मचाºयांनी रात्रभर जागून ही कागदपत्रांची पूर्तता केली. शनिवारी तसेच रविवारी बॅँक सुरू ठेवण्याचेही नियोजन केले. पण, अजून एक रुपयाही वर्ग झाला नाही. शेतकरी वर्गाची अशी क्रूर थट्टा शासन करीत आहे. जिल्हा बॅँकेच्या जवळपास अडीच लाख खातेदार शेतकºयांनी कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाला भरून दिले असून, जवळपास ६०० कोटींची ही कर्जमाफी अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत फक्त ६ कोटी रुपये कर्जमाफीसाठी आले आहेत. शेतकरी कर्जाचे स्वरूप स्पष्ट करून दिल्यामुळे एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षांशिवाय ऊस गळीत हंगामाप्रमाणे सप्टेंबर-आॅक्टोबर ही वार्षिक शेतीसाठीची कर्जे ग्राह्य धरण्यात आली आहेत.

अजून खावटी कर्जे मागील केंद्र सरकार-राज्य सरकारच्या कर्जमाफीत जिल्ह्यातून अपात्र ठरलेल्या शेतकºयांना सर्वोच्च न्यायालयाने कर्जमाफी देण्याचे आदेश दिले आहेत. ती कर्जे, व्याज तसेच आयकर न भरणारे अनेक संस्थांचे संचालक, पदाधिकारी या कर्जमाफीपासून वंचित आहेत. या साºयांना न्याय मिळायला हवा. सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष नागपूर अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.कागल नगरपालिका जळिताचे काय झाले ?मुश्रीफ यावेळी म्हणाले की, कागल नगरपालिका इमारतीला आग लागल्यानंतर सी.सी.टी.व्ही. कॅमेºयांच्या फुटेजमध्ये कोणीतरी दिसतो, असे स्पष्ट झाल्याचे म्हणतात. मग अजून तपास का लागत नाही? ‘फॉरेन्सीस लॅब’मध्ये चेहरा स्पष्ट होतो, तरीसुद्धा पोलीस गप्प का आहेत. कोणाची तरी बदनामी व्हावी यासाठी हा तपास दाबला तर जात नाही ना? असा थेट सवाल त्यांनी केला.