शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांची क्रूर थट्टा : हसन मुश्रीफ ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:23 IST

कागल : शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल शासन रोज नवनवीन घोषणा करीत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी शून्य आहे.

ठळक मुद्देशासनाकडून रोज नवनवीन फक्त घोषणा; अंमलबजावणी मात्र शून्यतरीसुद्धा पोलीस गप्प का आहेत. कोणाची तरी बदनामी व्हावी यासाठी हा तपास दाबला तर जात नाही ना?

कागल : शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल शासन रोज नवनवीन घोषणा करीत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी शून्य आहे. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकरी वर्गाची क्रूर थट्टा मांडली आहे, अशी टीका माजी जलसंपदा मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

कागल येथे निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, योजना जाहीर झाल्यापासून रोज नवनवीन नियम-निकष लावले गेले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करता करता जिल्हा बॅँकांना नाकीनऊ आले आहे. कर्जमाफीचे प्रस्ताव देताना शेतकरी वर्ग घाईला आला आहे. शुक्रवारी सांगितले की, तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करा. शनिवारी पैसे वर्ग केले जाणार आहेत. जिल्हा बॅँकेच्या कर्मचाºयांनी रात्रभर जागून ही कागदपत्रांची पूर्तता केली. शनिवारी तसेच रविवारी बॅँक सुरू ठेवण्याचेही नियोजन केले. पण, अजून एक रुपयाही वर्ग झाला नाही. शेतकरी वर्गाची अशी क्रूर थट्टा शासन करीत आहे. जिल्हा बॅँकेच्या जवळपास अडीच लाख खातेदार शेतकºयांनी कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाला भरून दिले असून, जवळपास ६०० कोटींची ही कर्जमाफी अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत फक्त ६ कोटी रुपये कर्जमाफीसाठी आले आहेत. शेतकरी कर्जाचे स्वरूप स्पष्ट करून दिल्यामुळे एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षांशिवाय ऊस गळीत हंगामाप्रमाणे सप्टेंबर-आॅक्टोबर ही वार्षिक शेतीसाठीची कर्जे ग्राह्य धरण्यात आली आहेत.

अजून खावटी कर्जे मागील केंद्र सरकार-राज्य सरकारच्या कर्जमाफीत जिल्ह्यातून अपात्र ठरलेल्या शेतकºयांना सर्वोच्च न्यायालयाने कर्जमाफी देण्याचे आदेश दिले आहेत. ती कर्जे, व्याज तसेच आयकर न भरणारे अनेक संस्थांचे संचालक, पदाधिकारी या कर्जमाफीपासून वंचित आहेत. या साºयांना न्याय मिळायला हवा. सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष नागपूर अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.कागल नगरपालिका जळिताचे काय झाले ?मुश्रीफ यावेळी म्हणाले की, कागल नगरपालिका इमारतीला आग लागल्यानंतर सी.सी.टी.व्ही. कॅमेºयांच्या फुटेजमध्ये कोणीतरी दिसतो, असे स्पष्ट झाल्याचे म्हणतात. मग अजून तपास का लागत नाही? ‘फॉरेन्सीस लॅब’मध्ये चेहरा स्पष्ट होतो, तरीसुद्धा पोलीस गप्प का आहेत. कोणाची तरी बदनामी व्हावी यासाठी हा तपास दाबला तर जात नाही ना? असा थेट सवाल त्यांनी केला.