शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांची क्रूर थट्टा : हसन मुश्रीफ ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:23 IST

कागल : शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल शासन रोज नवनवीन घोषणा करीत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी शून्य आहे.

ठळक मुद्देशासनाकडून रोज नवनवीन फक्त घोषणा; अंमलबजावणी मात्र शून्यतरीसुद्धा पोलीस गप्प का आहेत. कोणाची तरी बदनामी व्हावी यासाठी हा तपास दाबला तर जात नाही ना?

कागल : शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल शासन रोज नवनवीन घोषणा करीत आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी शून्य आहे. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकरी वर्गाची क्रूर थट्टा मांडली आहे, अशी टीका माजी जलसंपदा मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

कागल येथे निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, योजना जाहीर झाल्यापासून रोज नवनवीन नियम-निकष लावले गेले आहेत. कागदपत्रांची पूर्तता करता करता जिल्हा बॅँकांना नाकीनऊ आले आहे. कर्जमाफीचे प्रस्ताव देताना शेतकरी वर्ग घाईला आला आहे. शुक्रवारी सांगितले की, तत्काळ कागदपत्रांची पूर्तता करा. शनिवारी पैसे वर्ग केले जाणार आहेत. जिल्हा बॅँकेच्या कर्मचाºयांनी रात्रभर जागून ही कागदपत्रांची पूर्तता केली. शनिवारी तसेच रविवारी बॅँक सुरू ठेवण्याचेही नियोजन केले. पण, अजून एक रुपयाही वर्ग झाला नाही. शेतकरी वर्गाची अशी क्रूर थट्टा शासन करीत आहे. जिल्हा बॅँकेच्या जवळपास अडीच लाख खातेदार शेतकºयांनी कर्जमाफीचे प्रस्ताव शासनाला भरून दिले असून, जवळपास ६०० कोटींची ही कर्जमाफी अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत फक्त ६ कोटी रुपये कर्जमाफीसाठी आले आहेत. शेतकरी कर्जाचे स्वरूप स्पष्ट करून दिल्यामुळे एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षांशिवाय ऊस गळीत हंगामाप्रमाणे सप्टेंबर-आॅक्टोबर ही वार्षिक शेतीसाठीची कर्जे ग्राह्य धरण्यात आली आहेत.

अजून खावटी कर्जे मागील केंद्र सरकार-राज्य सरकारच्या कर्जमाफीत जिल्ह्यातून अपात्र ठरलेल्या शेतकºयांना सर्वोच्च न्यायालयाने कर्जमाफी देण्याचे आदेश दिले आहेत. ती कर्जे, व्याज तसेच आयकर न भरणारे अनेक संस्थांचे संचालक, पदाधिकारी या कर्जमाफीपासून वंचित आहेत. या साºयांना न्याय मिळायला हवा. सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष नागपूर अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.कागल नगरपालिका जळिताचे काय झाले ?मुश्रीफ यावेळी म्हणाले की, कागल नगरपालिका इमारतीला आग लागल्यानंतर सी.सी.टी.व्ही. कॅमेºयांच्या फुटेजमध्ये कोणीतरी दिसतो, असे स्पष्ट झाल्याचे म्हणतात. मग अजून तपास का लागत नाही? ‘फॉरेन्सीस लॅब’मध्ये चेहरा स्पष्ट होतो, तरीसुद्धा पोलीस गप्प का आहेत. कोणाची तरी बदनामी व्हावी यासाठी हा तपास दाबला तर जात नाही ना? असा थेट सवाल त्यांनी केला.